शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रत्नागिरी जिल्ह्यात १७२८ जणांना श्वानदंश, भटक्याची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 13:37 IST

रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़.

ठळक मुद्दे गल्लोगल्ली दहशत, अँटी रेबीज व्हॅक्सीनचे उत्पादन कमी, नसबंदीची गरजअँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीचे उत्पादनही कमी प्रमाणात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़ .

एकाच गावामध्ये एकाच दिवशी १० ते १५ जणांचा श्वानांनी चावा घेतल्याचे समोर आले असले तरीही श्वानदंशामुळे कोणीही दगावल्याची नोंद जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे नाही़.जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विंचूदंश, शेतीच्या कामावेळी सर्पदंशाच्या अनेक घटना दरवर्षी घडत असतात़ जिल्हाभरात दरवर्षी श्वानांची संख्या वाढत चालली आहे़ श्वानांची गणना दर पाच वर्षांनी होत असते़ सन २०१२ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली होती़

मात्र, त्यानंतर गणना करण्याची वेळ आली तरीही ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही़ जिल्हाभरात लाखो भटके श्वान असून, पाळीव श्वानांपेक्षा कित्येक पटीत उनाड, भटक्या श्वानांची आहे़ त्यामुळे आता या श्वानांच्या नसबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गल्लीबोळामध्ये उनाड, भटके श्वान मोठ्या संख्येने दिसून येतात़ रात्रीच्या वेळी तर ये-जा करणारे पादचारी, दुचाकीस्वार यांच्यावर श्वानांनी हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत़. त्यामुळे जिल्ह्यात या वर्षभरात १७२८ जणांचा श्वानांनी चावा घेतला आहे़.

यामध्ये शाळकरी मुलांसह आबालवृध्दांचाही समावेश आहे़ या जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येतात़ श्वान चावल्यानंतर त्यावर देण्यात येणाऱ्या अँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीचे उत्पादनही सध्या कमी प्रमाणात होत असल्याचे समजते.

राज्यभरातील जिल्हा परिषद आरोग्य विभागांकडून मागणी करुनही त्यांना वेळेवर या लसीचा पुरवठा शासनाकडून केला जात नाही़ त्यामुळे भविष्यात श्वानदंशावरील लस कमी पडल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़श्वानांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्यातालुका                 रुग्ण

  1. मंडणगड             ८६
  2. दापोली              २०२
  3. खेड                  १२९
  4. गुहागर             १२९
  5. चिपळूण           ३०९
  6. संगमेश्वर          १६४
  7. रत्नागिरी           ४८६
  8. लांजा                    ८८
  9. राजापूर               १३५एकूण                 १७२८नसबंदीही त्रासदायकचश्वानांची नसबंदी झाली पाहिजे, हा पर्याय सहज पुढे आणला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यावर अंमलबजावणी करणे अत्यंत अवघड असल्याने त्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यातील नियमानुसार नसबंदीनंतर श्वानांची चार दिवसांची देखभाल करणे बंधनकारक आहे, ही अटच त्रासदायक आहे. 

जिल्ह्यात श्वानांमुळे शहरासह ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ कारण दररोज श्वान चावल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत़ दरवर्षी जिल्ह्यात १० ते १५ हजार अँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीची आवश्यकता असते़ त्यासाठी तीन महिन्याला पुरेल, असा लसीचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ठेवण्यात येतो़ त्यासाठी शासनाकडे मागणीही करण्यात येते़- डॉ़ अनिरुध्द आठल्ये,जिल्हा आरोग्य अधिकारी़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdogकुत्रा