शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात १७२८ जणांना श्वानदंश, भटक्याची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 13:37 IST

रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़.

ठळक मुद्दे गल्लोगल्ली दहशत, अँटी रेबीज व्हॅक्सीनचे उत्पादन कमी, नसबंदीची गरजअँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीचे उत्पादनही कमी प्रमाणात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़ .

एकाच गावामध्ये एकाच दिवशी १० ते १५ जणांचा श्वानांनी चावा घेतल्याचे समोर आले असले तरीही श्वानदंशामुळे कोणीही दगावल्याची नोंद जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे नाही़.जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विंचूदंश, शेतीच्या कामावेळी सर्पदंशाच्या अनेक घटना दरवर्षी घडत असतात़ जिल्हाभरात दरवर्षी श्वानांची संख्या वाढत चालली आहे़ श्वानांची गणना दर पाच वर्षांनी होत असते़ सन २०१२ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली होती़

मात्र, त्यानंतर गणना करण्याची वेळ आली तरीही ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही़ जिल्हाभरात लाखो भटके श्वान असून, पाळीव श्वानांपेक्षा कित्येक पटीत उनाड, भटक्या श्वानांची आहे़ त्यामुळे आता या श्वानांच्या नसबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गल्लीबोळामध्ये उनाड, भटके श्वान मोठ्या संख्येने दिसून येतात़ रात्रीच्या वेळी तर ये-जा करणारे पादचारी, दुचाकीस्वार यांच्यावर श्वानांनी हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत़. त्यामुळे जिल्ह्यात या वर्षभरात १७२८ जणांचा श्वानांनी चावा घेतला आहे़.

यामध्ये शाळकरी मुलांसह आबालवृध्दांचाही समावेश आहे़ या जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येतात़ श्वान चावल्यानंतर त्यावर देण्यात येणाऱ्या अँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीचे उत्पादनही सध्या कमी प्रमाणात होत असल्याचे समजते.

राज्यभरातील जिल्हा परिषद आरोग्य विभागांकडून मागणी करुनही त्यांना वेळेवर या लसीचा पुरवठा शासनाकडून केला जात नाही़ त्यामुळे भविष्यात श्वानदंशावरील लस कमी पडल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़श्वानांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्यातालुका                 रुग्ण

  1. मंडणगड             ८६
  2. दापोली              २०२
  3. खेड                  १२९
  4. गुहागर             १२९
  5. चिपळूण           ३०९
  6. संगमेश्वर          १६४
  7. रत्नागिरी           ४८६
  8. लांजा                    ८८
  9. राजापूर               १३५एकूण                 १७२८नसबंदीही त्रासदायकचश्वानांची नसबंदी झाली पाहिजे, हा पर्याय सहज पुढे आणला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यावर अंमलबजावणी करणे अत्यंत अवघड असल्याने त्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यातील नियमानुसार नसबंदीनंतर श्वानांची चार दिवसांची देखभाल करणे बंधनकारक आहे, ही अटच त्रासदायक आहे. 

जिल्ह्यात श्वानांमुळे शहरासह ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ कारण दररोज श्वान चावल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत़ दरवर्षी जिल्ह्यात १० ते १५ हजार अँटी रेबीज व्हॅक्सीन या लसीची आवश्यकता असते़ त्यासाठी तीन महिन्याला पुरेल, असा लसीचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ठेवण्यात येतो़ त्यासाठी शासनाकडे मागणीही करण्यात येते़- डॉ़ अनिरुध्द आठल्ये,जिल्हा आरोग्य अधिकारी़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdogकुत्रा