शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभागाला तब्बल २ कोटींचा तोटा

By admin | Updated: April 17, 2016 23:55 IST

परिवहन महामंडळ : खासगी वाहतुकीने एस. टी.चे कंबरडे मोडले

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला (२०१५-१६)मध्ये २८० कोटी १२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. ग्रामीण भागातील वाडीवस्तीवर पोहोचलेल्या एस. टी.ला ‘जीवनवाहिनी’ म्हणून संबोधले जाते. खासगी वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचा तिकडे अधिक ओढा आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीशी एस. टी.ला सातत्याने स्पर्धा करावी लागत आहे. गतवर्षी रत्नागिरी विभागाला २८३ कोटी १ लाख ४९ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी रत्नागिरी विभागाला तब्बल २ कोटी १७ लाखांचा तोटा झाला आहे.अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी महामंडळाने पोलीस, परिवहन कार्यालयामार्फत व्यापक मोहीम राबविली होती. तरीही रत्नागिरी विभागाला आर्थिक तोटा सोसावा लागत आहे. रत्नागिरी विभागामध्ये आठशे गाड्या असून, दररोज २ लाख २५ हजार किलोमीटर इतकी वाहतूक करण्यात येते. त्यासाठी प्रतिदिन किमान ५३ हजार लीटर डिझेलचा वापर होतो. विभागात एकूण १७३८ चालक असून, १५५५ वाहक कार्यरत आहेत. दररोज नऊ हजार फेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरु आहे. खासगी वाहतुकीचा एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम होत असला, तरी रत्नागिरी विभागातर्फे ‘मागेल त्याला गाडी’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. तसेच ‘प्रवासी वाढवा’ अभियानांतर्गत अधिकाधिक प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसराई यामुळे एस. टी.ला अधिकचे उत्पन्न प्राप्त होत आहे. कोकण रेल्वेची सेवा ठप्प झाल्यास एस. टी.चे सहाय्य घेण्यात येते. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी संबोधली जाणारी एस. टी. वाडीवस्तीवर जावून पोहोचली आहे. अनेकवेळा कमी भारमानातही एस. टी. वाडीवस्तीवर जात असल्यामुळे महामंडळाचे नुकसान होते. इंधनदरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरीही महामंडळाची त्यामानाने तिकीटवाढ न झाल्याने परिणामी एस. टी.च्या उत्पन्नात घट झाली आहे. यापूर्वी दि. २२ आॅगस्ट २०१४ रोजी नियमीत भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इंधनाचे दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले होते. मात्र, दिवाळीच्या सुटीत सहलीसाठी व पर्यटनासाठी जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेतातोटा भरुन काढण्यासाठी वीस दिवसांकरिता हंगामी भाडेवाढ दि. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेच्या अंमलबजावणीला दिनांक १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. याद्वारे प्रत्येक तिकीटामागे एक रूपयाची वाढ करण्यात आली आहे. यावर्षी उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी रत्नागिरी विभाग नेमकी काय उपाययोजना करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)हंगामापुरता.. : गर्दीच्या हंगामात तोटा होतो कमी...एस. टी.चे बिघडलेले वेळापत्रक आणि अन्य कारणांमुळे एस. टी.कडील प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळला आहे. खासगी वाहतूकदारांना एस. टी.वरील नाराजीचा चांगलाच फायदा मिळाला आहे. गर्दीच्या हंगामात एस. टी.ने जादा गाड्या सोडल्या की, रत्नागिरी विभागाला होणारा तोटा तेवढ्यापुरता कमी होतो. मात्र, त्यानंतर वर्षभरातील अन्य हंगामात पुन्हा हा तोटा वाढतो.मानसिकताच नाहीएस. टी. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची महामंडळ फायद्यात यावे, अशी मानसिकता नसल्यानेच तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी आपल्याकडे वळावा, यासाठी कोणताही प्रयत्न न करणारे कर्मचारी प्रवाशांना सौजन्याची वागणूकही देत नसल्याने प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळला आहे.