शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तब्बल तीन महिन्यांनी रत्नागिरीची डाळ शिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:29 IST

तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि गणेशोत्सव संपल्यानंतर राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ३५ रूपयात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा झाल्यानंतर चार महिन्यांनी प्रत्येक रेशन काडार्साठी एक किलो याप्रमाणे तूरडाळ जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देतब्बल तीन महिन्यांनी रत्नागिरीची डाळ शिजलीरास्त दराची तूरडाळ, लवकरच रेशन दुकानांमधून वितरण

रत्नागिरी : तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि गणेशोत्सव संपल्यानंतर राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ३५ रूपयात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा झाल्यानंतर चार महिन्यांनी प्रत्येक रेशन काडार्साठी एक किलो याप्रमाणे तूरडाळ जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यासाठी पुरवठा विभागाला तीन महिन्यांची ८,३८९ क्विंटल तूरडाळ प्राप्त झाली आहे. एप्रिलपासून डाळीच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेचा गणेशोत्सवही कोरडाच गेला. राज्याच्या पुरवठा विभागाकडून एप्रिल महिन्यात रास्तदर दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना ३५ रुपए दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती.

घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात ही डाळ जून महिन्यात आली. शिधापत्रिकेप्रमाणे अर्धा किलो डाळ वितरीत करण्याचा निर्णय असला तरी अपुरा पुरवठा झाल्याने काहींना २०० ग्रॅम डाळ वितरीत करावी लागली.त्यातच दापोली येथे ३५ऐवजी ५५ रुपए किलो दराने डाळ विकल्याने गोंधळ अधिकच वाढला. हे दर कमी करून मिळावा, यासाठी आमदार संजय कदम यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. आता पुरवठा विभागाच्या जुलै महिन्याच्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी २८३५ क्विंटल तूरडाळ उपलब्ध झाली आहे. मात्र, ही तूरडाळही गणेशोत्सवानंतर आली आहे.प्रतिशिधापत्रिका एक किलो ३५ रुपए दराने देण्याची सूचना पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. याचबरोबर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या मागणीनुसार या दोन महिन्यांसाठी प्रत्येकी २७७७ क्विंटल तूरडाळही पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे श्वेत शिधापत्रिकाधारकांनाही ही डाळ खरेदी करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात ही डाळ मिळाली असती तर सण आणखी उत्साहात गेले असते, असे शिधाधारकांचे म्हणणे आहे.ऐन गणेशोत्सवात शिधापत्रिकाधारकांसाठी रास्तदर धान्य दुकानांमध्ये तूरडाळ उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आता दसरा आणि दिवाळीसाठी डाळ उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दसरा - दिवाळीत तूरडाळीप्रमाणे साखरही मिळाल्यास हे सण गोड होतील, अशी आशा व्यक्त होत आहे.मागणीपेक्षा अधिक उपलब्धजून महिन्यात तूरडाळीची अपुरा पुरवठा झाला होता. तसेच दापोलीला ही डाळ ५५ रूपयाने खरेदी करावी लागली होती. त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांना ही डाळ या दराने घ्यावी लागली, त्यांच्याकरिता फरकाची डाळही यात समाविष्ट करण्यात आल्याने जुलैच्या मागणीपेक्षा अधिक डाळ यावेळी उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी