शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल तीन महिन्यांनी रत्नागिरीची डाळ शिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:29 IST

तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि गणेशोत्सव संपल्यानंतर राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ३५ रूपयात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा झाल्यानंतर चार महिन्यांनी प्रत्येक रेशन काडार्साठी एक किलो याप्रमाणे तूरडाळ जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देतब्बल तीन महिन्यांनी रत्नागिरीची डाळ शिजलीरास्त दराची तूरडाळ, लवकरच रेशन दुकानांमधून वितरण

रत्नागिरी : तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि गणेशोत्सव संपल्यानंतर राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ३५ रूपयात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा झाल्यानंतर चार महिन्यांनी प्रत्येक रेशन काडार्साठी एक किलो याप्रमाणे तूरडाळ जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यासाठी पुरवठा विभागाला तीन महिन्यांची ८,३८९ क्विंटल तूरडाळ प्राप्त झाली आहे. एप्रिलपासून डाळीच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेचा गणेशोत्सवही कोरडाच गेला. राज्याच्या पुरवठा विभागाकडून एप्रिल महिन्यात रास्तदर दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना ३५ रुपए दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती.

घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात ही डाळ जून महिन्यात आली. शिधापत्रिकेप्रमाणे अर्धा किलो डाळ वितरीत करण्याचा निर्णय असला तरी अपुरा पुरवठा झाल्याने काहींना २०० ग्रॅम डाळ वितरीत करावी लागली.त्यातच दापोली येथे ३५ऐवजी ५५ रुपए किलो दराने डाळ विकल्याने गोंधळ अधिकच वाढला. हे दर कमी करून मिळावा, यासाठी आमदार संजय कदम यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. आता पुरवठा विभागाच्या जुलै महिन्याच्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी २८३५ क्विंटल तूरडाळ उपलब्ध झाली आहे. मात्र, ही तूरडाळही गणेशोत्सवानंतर आली आहे.प्रतिशिधापत्रिका एक किलो ३५ रुपए दराने देण्याची सूचना पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. याचबरोबर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या मागणीनुसार या दोन महिन्यांसाठी प्रत्येकी २७७७ क्विंटल तूरडाळही पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे श्वेत शिधापत्रिकाधारकांनाही ही डाळ खरेदी करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात ही डाळ मिळाली असती तर सण आणखी उत्साहात गेले असते, असे शिधाधारकांचे म्हणणे आहे.ऐन गणेशोत्सवात शिधापत्रिकाधारकांसाठी रास्तदर धान्य दुकानांमध्ये तूरडाळ उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आता दसरा आणि दिवाळीसाठी डाळ उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दसरा - दिवाळीत तूरडाळीप्रमाणे साखरही मिळाल्यास हे सण गोड होतील, अशी आशा व्यक्त होत आहे.मागणीपेक्षा अधिक उपलब्धजून महिन्यात तूरडाळीची अपुरा पुरवठा झाला होता. तसेच दापोलीला ही डाळ ५५ रूपयाने खरेदी करावी लागली होती. त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांना ही डाळ या दराने घ्यावी लागली, त्यांच्याकरिता फरकाची डाळही यात समाविष्ट करण्यात आल्याने जुलैच्या मागणीपेक्षा अधिक डाळ यावेळी उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी