शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

रत्नागिरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 13:31 IST

इतर पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत किवा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर निर्णय घेतला जाईल.

रत्नागिरी : रलागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणूक साठी काही काळापूर्वी स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीशी काँग्रेसने नाते तोडले आहे. रत्नागिरीनगराध्यक्ष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ५ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इतर पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत किवा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड विजय भोसले यांनी लोकमतशी बोलताना दिली.

शहर विकास आघाडीत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबत विचारता काही कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी शहर विकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस होता. आता काँग्रेस शहर विकास आघाडीत नाही. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत त्या पक्षांकडून चर्चेचा प्रस्ताव आल्यास व चर्चा झाल्यास पक्ष नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय होईल असेही भोसले म्हणाले.

राज्यात विकास आघाडीचे सरकार आल्याने इतर निवडणुकीत सुद्धा हाच फॉर्म्युला राबवण्यात येत असल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोलापूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत सुद्धा हाच फॉर्म्युला राबवला जात आहे. त्यामुळे रत्नागिरीत नगराध्यक्षाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस इतर पक्षांना सोबत घेणार हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.