शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रत्नागिरी : चिपळूणचा रेल्वे कारखाना लवकरच : सुरेश प्रभू यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:39 IST

चिपळूण तालुका हा विचारवंतांचा तालुका आहे. याठिकाणी लवकरच रेल्वेचा कारखाना होणार आहे. २५ वर्षात कोकण रेल्वेत जी कामे झाली नव्हती, ती कामे गेल्या काही महिन्यात आपण मार्गी लावली आहेत. कोकणच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य व विमान वाहतूक व्यवस्थामंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

ठळक मुद्देउज्ज्वल योजनेंतर्गत सावर्डे येथे कार्यक्रममहिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून संधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध.कोणत्याही योजनेत अडथळा आल्यास आपणाकडे संपर्क करा  : प्रभू

चिपळूण : चिपळूण तालुका हा विचारवंतांचा तालुका आहे. याठिकाणी लवकरच रेल्वेचा कारखाना होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करताना देशातील ९० टक्के लोकांनी माझे स्वागत केले. २५ वर्षात कोकण रेल्वेत जी कामे झाली नव्हती, ती कामे गेल्या काही महिन्यात आपण मार्गी लावली आहेत.

कोकणातील माणसाने आतापर्यंत आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार केला आहे. कोकणच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य व विमान वाहतूक व्यवस्थामंत्री सुरेश प्रभू यांनी केले.सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात शुक्रवारी लाभार्थीधारक महिलांना उज्ज्वल योजनेंंतर्गत एलपीजी गॅस आणि शेगडी वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रभू बोलत होते. ग्रामीण भागातील महिलांना जेवण बनवताना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी उज्ज्वल योजनेद्वारे सर्वांना गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.ते पुढे म्हणाले की, महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून संधी मिळवून देण्यासाठी आपण कटिबध्द राहूया. उज्ज्वल दिवस येण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवन बदलले पाहिजे. सरकारबरोबर स्वयंसेवी संघटनांनीही काम केले पाहिजे. हा दिवस पंतप्रधानांनी नव्या युगाची सुरुवात म्हणून साजरा केला आहे.

शासनाच्या कोणत्याही योजनेत अडथळा आल्यास आपणाकडे संपर्क साधावा. त्यात कोणीही दोषी आढळल्यास त्यावर कडक कारवाई करु, असेही केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले.

या कार्यक्रमाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, उमा प्रभू, प्रमोद अधटराव, एलपीजीचे जनरल मॅनेजर पी. के. कोठारे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयकुमार फड, उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई, सभापती पूजा निकम, डॉ. सुभाष देव, राजश्री विश्वासराव, गिरीष कोल्हटकर, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, तहसीलदार व पुरवठा खात्यातील अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक पी. के. कोठारे यांनी केले. सूत्रसंचालन सलीम मोडक यांनी केले.राजकारण माध्यमदेशाच्या विकासासाठी झगडायचे आहे. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी मी उभा आहे. त्यांच्या विकासासाठी राजकारण हे एक माध्यम आहे. केवळ राजकारणी म्हणून घेणाऱ्यांपैकी मी नाही. मागच्यावेळी मी लोकसभेसाठी उभा राहिलो नाही. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानुसार मी एका खात्याची जबाबदारी स्वीकारली. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूRatnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे