शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रत्नागिरी : चिपळूण पंचायत समितीत पाणी पेटले, टँकर नादुरुस्त असल्यावरुन पाणीपुरवठा नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:08 IST

ऐन पाणीटंचाईच्या काळात तालुक्यातील ९ गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे दाखले तहसील कार्यालयातून पंचायत समितीकडे पाठविण्यात आले असूनही केवळ टँकर नादुरुस्त असल्याच्या कारणावरुन ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे संतप्त झालेले टेरवचे माजी उपसरपंच किशोर कदम यांनी पंचायत समिती आवारात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देचिपळूण पंचायत समितीत पाणी पेटले, टँकर नादुरुस्त टँकर नादुरुस्त असल्यावरुन पाणीपुरवठा नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त

चिपळूण : ऐन पाणीटंचाईच्या काळात तालुक्यातील ९ गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे दाखले तहसील कार्यालयातून पंचायत समितीकडे पाठविण्यात आले असूनही केवळ टँकर नादुरुस्त असल्याच्या कारणावरुन ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे संतप्त झालेले टेरवचे माजी उपसरपंच किशोर कदम यांनी पंचायत समिती आवारात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना बोलावल्यामुळे काहीकाळ पंचायत समितीत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.चिपळूण तालुक्यातील ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे संबंधित गावातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी सातत्याने पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात व प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. तरीही अद्याप या गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. टेरव येथील टँकरच्या मागणीसाठी माजी उपसरपंच कदम हे पंचायत समितीकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

गुुरुवारी ते पाणीपुरवठा विभागात गेले असता, त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर ते गटविकास अधिकाऱ्यांना भेटले. यावेळी त्यांच्याशीही ते चढ्या आवाजात बोलत होते.

त्यामुळे कदम यांचा उद्वेग पाहून गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फोन करुन पोलिसांना बोलावले. यावेळी दोन पोलीस पंचायत समितीत आले. मात्र, त्यांच्यासमोरही किशोर कदम यांची आगपाखड सुरुच होती.ऐन दुपारी पाणी पुरवठ्यावरुन पंचायत समितीचे वातावरण चांगलेच तापले होते. उन्हाच्या झळांबरोबरच या वादाच्या झळाही पाहायला मिळत होत्या. नादुरुस्त टँकर व चालकांचा अभाव असल्यामुळे दाखले हातात असूनही पाणीपुरवठा केला जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गटविकास अधिकारी सरिता पवार यांच्या कारभाराबद्दलही यावेळी काहींनी नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी