शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी : सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:42 IST

कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंदशेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांवर पायपीटची वेळ

देवरूख : कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक बंद असल्यामुळे सांगवे, तुळसणी, फणसट गावातील शेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत बांधकाम विभागाने पुलाची डागडुजी तातडीने करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आले आहे.संगमेश्वर तालुक्यातील सांगवे, तुळसणी, फणसट हा ग्रामीण भाग आहे. या तीन गावांचा तालुक्याशी संपर्क राहावा, वाहतुकीसाठी सोयीचा मार्ग व्हावा, यासाठी सांगवे येथील सप्तलिंगी नदीवर पूल होणे गरजेचे होते. येथीलच सामाजिक कार्यकर्ते मेजर सीताराम लक्ष्मण शेलार यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी पूल मंजूर झाला होता.

पुलाचे बांधकाम होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. या मार्गावरून सध्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने हा पूल धोकादायक बनला होता. गतवर्षी पावसाळ्यात पुलाच्या डाव्या बाजूचा भराव वाहून गेल्याने त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. परिणामी काही दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली होती.या पुलाच्या डागडुजीसाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी १० लाख रूपये मंजूर केले होते. या निधीतून पुलाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण पुलाची डागडुजी करणे अथवा पूल नव्याने बांधणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांनी संबंधीत विभागाकडे वारंवार पत्रव्यवहाराबरोबरच पाठपुरावा केला. मात्र, बांधकाम विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.याचाच फटका पुन्हा सोमवारपासून सांगवेवासियांना बसत आहे. पुलाचा पिलर खालील बाजूने ढासळला आहे. ही बाब काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आणि एकच खळबळ उडाली. या मार्गावरून अवजड वाहनांचीही ये- जा सुरू असते. कोणताही अनर्थ घडू नये, याकरिता खबरदारी म्हणून पुलावरून होणारी वाहतूक सोमवारपासूनच बंद ठेवण्यात आली आहे.या परिसरातील विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी देवरूख येथे येतात. मात्र बसफेऱ्या या सांगवे मुस्लीम मोहल्ल्यापर्यंत सुरू आहेत. परिणामी सांगवेसह तुळसणी, फणसट येथील विद्यार्थी, ग्रामस्थांना ७ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला पुलाच्या बांधकामाबाबत पत्र दिले आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या ठिकाणाहून वाहन जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. या पुलाचे काम ढासळत असताना लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी