शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

रत्नागिरी : सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:42 IST

कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंदशेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांवर पायपीटची वेळ

देवरूख : कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक बंद असल्यामुळे सांगवे, तुळसणी, फणसट गावातील शेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत बांधकाम विभागाने पुलाची डागडुजी तातडीने करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आले आहे.संगमेश्वर तालुक्यातील सांगवे, तुळसणी, फणसट हा ग्रामीण भाग आहे. या तीन गावांचा तालुक्याशी संपर्क राहावा, वाहतुकीसाठी सोयीचा मार्ग व्हावा, यासाठी सांगवे येथील सप्तलिंगी नदीवर पूल होणे गरजेचे होते. येथीलच सामाजिक कार्यकर्ते मेजर सीताराम लक्ष्मण शेलार यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी पूल मंजूर झाला होता.

पुलाचे बांधकाम होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. या मार्गावरून सध्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने हा पूल धोकादायक बनला होता. गतवर्षी पावसाळ्यात पुलाच्या डाव्या बाजूचा भराव वाहून गेल्याने त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. परिणामी काही दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली होती.या पुलाच्या डागडुजीसाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी १० लाख रूपये मंजूर केले होते. या निधीतून पुलाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण पुलाची डागडुजी करणे अथवा पूल नव्याने बांधणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांनी संबंधीत विभागाकडे वारंवार पत्रव्यवहाराबरोबरच पाठपुरावा केला. मात्र, बांधकाम विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.याचाच फटका पुन्हा सोमवारपासून सांगवेवासियांना बसत आहे. पुलाचा पिलर खालील बाजूने ढासळला आहे. ही बाब काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आणि एकच खळबळ उडाली. या मार्गावरून अवजड वाहनांचीही ये- जा सुरू असते. कोणताही अनर्थ घडू नये, याकरिता खबरदारी म्हणून पुलावरून होणारी वाहतूक सोमवारपासूनच बंद ठेवण्यात आली आहे.या परिसरातील विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी देवरूख येथे येतात. मात्र बसफेऱ्या या सांगवे मुस्लीम मोहल्ल्यापर्यंत सुरू आहेत. परिणामी सांगवेसह तुळसणी, फणसट येथील विद्यार्थी, ग्रामस्थांना ७ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला पुलाच्या बांधकामाबाबत पत्र दिले आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या ठिकाणाहून वाहन जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. या पुलाचे काम ढासळत असताना लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी