शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरी : मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायत विभाजनासाठी भास्कर जाधव यांचा विधानसभेत औचित्याचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:38 IST

गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली.

ठळक मुद्देवारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावीवारेली गाव अत्यंत डोंगराळ भागात मूर्तवडे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी वारेली ग्रामस्थांना 19 किलोमीटरचा प्रवास

रत्नागिरी :  गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली.नागपूर अधिवेशनाच्या आज पाचव्या दिवशी औचित्याचे मुद्दे मांडण्याच्या काळात जाधव यांनी आपल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील हा विषय मांडून त्यास वाचा फोडली. हा मुद्दा सादर करताना ते म्हणाले की, "वारेली हे गाव अत्यंत डोंगराळ भागात वसलेले असून तेथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीशी संबंधित कामांसाठी मूर्तवडे या गावात असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी 19 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.

पायवाटेने जावे लागल्यास मोठा डोंगर चढ-उतार करून ये-जा करावी लागते. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आणि पायपीट करावी लागल्याने खूप हाल होतात. ही समस्या लक्षात घेता आणि सद्यस्थितीतील लोकसंख्येचा विचार करता या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी."या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेलीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी यापूर्वी अनेकदा ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. परंतु, त्याची दखल न घेतल्याने आज त्यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे आवाज उठवला. त्यामुळे आता या प्रक्रियेला चालना मिळून वारेलीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७