शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

रत्नागिरी : मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायत विभाजनासाठी भास्कर जाधव यांचा विधानसभेत औचित्याचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:38 IST

गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली.

ठळक मुद्देवारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावीवारेली गाव अत्यंत डोंगराळ भागात मूर्तवडे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी वारेली ग्रामस्थांना 19 किलोमीटरचा प्रवास

रत्नागिरी :  गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली.नागपूर अधिवेशनाच्या आज पाचव्या दिवशी औचित्याचे मुद्दे मांडण्याच्या काळात जाधव यांनी आपल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील हा विषय मांडून त्यास वाचा फोडली. हा मुद्दा सादर करताना ते म्हणाले की, "वारेली हे गाव अत्यंत डोंगराळ भागात वसलेले असून तेथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीशी संबंधित कामांसाठी मूर्तवडे या गावात असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी 19 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.

पायवाटेने जावे लागल्यास मोठा डोंगर चढ-उतार करून ये-जा करावी लागते. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आणि पायपीट करावी लागल्याने खूप हाल होतात. ही समस्या लक्षात घेता आणि सद्यस्थितीतील लोकसंख्येचा विचार करता या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी."या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेलीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी यापूर्वी अनेकदा ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. परंतु, त्याची दखल न घेतल्याने आज त्यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे आवाज उठवला. त्यामुळे आता या प्रक्रियेला चालना मिळून वारेलीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७