शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रत्नागिरी : शिक्षक भरतीवर बंदी, डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:54 IST

शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातले डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमक बनले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील डी. एड्., बी. एड्.धारक आता नागपूर विधिमंडळासमोर १७ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्देशिक्षक भरतीवर बंदी, डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमकस्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, नागपुरात १७ रोजी आंदोलन

रत्नागिरी : शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातले डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमक बनले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील डी. एड्., बी. एड्.धारक आता नागपूर विधिमंडळासमोर १७ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार आहेत.मागील आठ वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे आगामी काही महिन्यांतच त्यावरील बंदी उठवून भरती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. कोकणातील डोंगराळ परिस्थितीचा विचार करून या भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधील डी. एड्., बी. एड्.धारकांकडून होत आहे.सन २०१०पूर्वी झालेल्या शिक्षक भरतीत स्थानिकांना आरक्षण होते. तशाच पद्धतीची भरती झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील डी. एड्., बी. एड्.धारकाला न्याय मिळणार आहे, अशी भूमिका कोकण डी. एड्., बी. एड्.धारक असोसिएशनने घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, संकेत गुरसाळे, भीवसेन मसुरकर यांनी सांगितले.कोकणातल्या जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीत परजिल्ह्यातील उमेदवारांची निवड होते आणि तीन वर्षानंतर पुन्हा हे उमेदवार आपापल्या जिल्ह्यात रवाना होतात. त्यामुळे कोकणातील शाळा पुन्हा शिक्षकांविना ओस पडतात. दरवर्षी ५०० ते ६०० शिक्षक हे जिल्हाबदली करून जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्थानिकांना आगामी भरतीत प्राधान्य मिळणे गरजेचे आहे.

\परजिल्ह्यातील शिक्षकांना येथील कोकणी बोलीभाषेत शिकवता येत नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवारांची भरती झाल्यास या सर्व समस्यांवर मात करता येणे शक्य असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यासाठी स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनासाठी जिल्ह्यात बैठकाही घेण्यात आल्या आहेत.जिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसानशिक्षकांच्या जिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि भरतीत ७० टक्के आरक्षण हे स्थानिकांना देण्यात यावे, यासाठी सन २०१०पासून स्थानिकांचा लढा सुरू आहे. आजपर्यंत अनेकवेळा यासाठी मोर्चे, उपोषणे करण्यात आली. परंतु, कोकणातील स्थानिकांना आजमितीस न्याय मिळालेला नाही. यासाठी आता थेट नागपूर येथील अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकणातील डी. एड्., बी. एड्.धारकांनी घेतला आहे.लोकप्रतिनिधीचा पाठिंबाशिक्षक भरतीत कोकणावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ही बाब कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील डी. एड्., बी. एड्. धारकांनी येथील आमदार, खासदारांच्या निदर्शनाला आणून दिली आहे. ही समस्या सभागृहात मांडण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांना निवेदनेही देण्यात आली आहेत. त्यामुळे या पाचही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी नागपुरातील धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीRatnagiriरत्नागिरी