शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

रत्नागिरी : शिक्षक भरतीवर बंदी, डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:54 IST

शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातले डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमक बनले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील डी. एड्., बी. एड्.धारक आता नागपूर विधिमंडळासमोर १७ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्देशिक्षक भरतीवर बंदी, डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमकस्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, नागपुरात १७ रोजी आंदोलन

रत्नागिरी : शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातले डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमक बनले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील डी. एड्., बी. एड्.धारक आता नागपूर विधिमंडळासमोर १७ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार आहेत.मागील आठ वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे आगामी काही महिन्यांतच त्यावरील बंदी उठवून भरती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. कोकणातील डोंगराळ परिस्थितीचा विचार करून या भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधील डी. एड्., बी. एड्.धारकांकडून होत आहे.सन २०१०पूर्वी झालेल्या शिक्षक भरतीत स्थानिकांना आरक्षण होते. तशाच पद्धतीची भरती झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील डी. एड्., बी. एड्.धारकाला न्याय मिळणार आहे, अशी भूमिका कोकण डी. एड्., बी. एड्.धारक असोसिएशनने घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, संकेत गुरसाळे, भीवसेन मसुरकर यांनी सांगितले.कोकणातल्या जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीत परजिल्ह्यातील उमेदवारांची निवड होते आणि तीन वर्षानंतर पुन्हा हे उमेदवार आपापल्या जिल्ह्यात रवाना होतात. त्यामुळे कोकणातील शाळा पुन्हा शिक्षकांविना ओस पडतात. दरवर्षी ५०० ते ६०० शिक्षक हे जिल्हाबदली करून जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्थानिकांना आगामी भरतीत प्राधान्य मिळणे गरजेचे आहे.

\परजिल्ह्यातील शिक्षकांना येथील कोकणी बोलीभाषेत शिकवता येत नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवारांची भरती झाल्यास या सर्व समस्यांवर मात करता येणे शक्य असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यासाठी स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनासाठी जिल्ह्यात बैठकाही घेण्यात आल्या आहेत.जिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसानशिक्षकांच्या जिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि भरतीत ७० टक्के आरक्षण हे स्थानिकांना देण्यात यावे, यासाठी सन २०१०पासून स्थानिकांचा लढा सुरू आहे. आजपर्यंत अनेकवेळा यासाठी मोर्चे, उपोषणे करण्यात आली. परंतु, कोकणातील स्थानिकांना आजमितीस न्याय मिळालेला नाही. यासाठी आता थेट नागपूर येथील अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकणातील डी. एड्., बी. एड्.धारकांनी घेतला आहे.लोकप्रतिनिधीचा पाठिंबाशिक्षक भरतीत कोकणावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ही बाब कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील डी. एड्., बी. एड्. धारकांनी येथील आमदार, खासदारांच्या निदर्शनाला आणून दिली आहे. ही समस्या सभागृहात मांडण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांना निवेदनेही देण्यात आली आहेत. त्यामुळे या पाचही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी नागपुरातील धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीRatnagiriरत्नागिरी