शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरी : त्या बॅगेत आढळून आले धातूचे पान, श्वान पथक, एटीएस पथकाला केले पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:34 IST

कोकण रेल्वे मार्गावरुन गोव्याकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या निळ्या रंगाच्या बॅगेत धातूचे पान असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देत्या बॅगेत आढळून आले धातूचे पान, श्वान पथक, एटीएस पथकाला केले पाचारण रेल्वे स्टेशन आवारात भितीचे वातावरण

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरुन गोव्याकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या निळ्या रंगाच्या बॅगेत धातूचे पान असल्याचे आढळून आले आहे.कुर्ला टर्मिनस (मुंबई) येथून सकाळी ११.४० वाजता सुटणाऱ्यां नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये एक अनोळखी बॅग असल्याची माहिती आरपीएफच्या जवानांना देण्यात आली. चिपळूण रेल्वे स्थानकावर सायंकाळी ६.३० वाजता गाडी थांबल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी ती बॅग ताब्यात घेतली.

सुरुवातीला या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशी व चिपळूण स्थानकावर असलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. बॅगेत संशयास्पद वस्तू असल्याची शक्यता आहे असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशी शांत झाले.या दरम्यान रेल्वेमध्ये ही बॅग नक्की कोणी ठेवली याचा शोध सुरु झाला. त्यासाठी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी ते गोवापर्यंत नाकाबंदी करण्यात आली. नेत्रावती एक्सप्रेसमधून वालोपे रेल्वे स्टेशन आवारात ही बॅग ठेवली. त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शितल जानवे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व इतर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.सकाळी १० नंतर रत्नागिरी बॉम्ब शोध व नाश पथक, एटीएस (दहशतवादी विरोधी पथक), श्वान पथक, घरडा केमिकल संशोधन केंद्राचे पथक दाखल झाले. या निळ्या बॅगमध्ये नेमकी कोणती संशयास्पद वस्तू आहे याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध पथकांद्वारे तपास सुरु होता. मात्र या बॅगमध्ये सिल्व्हर कोटिन असलेल्या काचेच्या पेटीत अँटी पिस (धातूचे पान) आढळून आले. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Bombsस्फोटकेRatnagiriरत्नागिरी