शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रत्नागिरी :  अंत्योदय, प्राधान्य कार्डधारकांची दिवाळी गोड, आता चणाडाळ, उडीदडाळ बरोबरच साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:07 IST

दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी ह्यगोडह्ण होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाली असून चणाडाळ तसेच उडीदडाळीची मागणीही प् करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देअंत्योदय, प्राधान्य कार्डधारकांची दिवाळी गोडधान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाली असून चणाडाळ तसेच उडीदडाळीची मागणीही प् करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी मंगळवारी दिली.गेल्या सोमवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी ही घोषणा केली असून तसा शासन अध्यादेशही काढण्यात आला आहे. आत्तापर्यंत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति कुटुंब एक किलो साखर मिळत होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच रास्त दर धान्य दुकानांवर ३५ रूपये किलो दराने तूरडाळही उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यातच आता दिवाळी जवळ आल्याने राज्याच्या पुरवठा विभागाने पुन्हा प्रति कुटुंब एक किलो चणाडाळ तसेच उडीद डाळ ३५ रूपये किलो दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दिवाळीसाठी आॅक्टोबर महिन्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांबरोबरच प्राधान्य गटालाही साखर मिळणार आहे. दिवाळीपुर्वीच जिल्हा पुरवठा विभागाकडे या महिन्यातच साखर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी का होईना पण प्राधान्य कुटुंबाला साखर मिळणार असल्याने दिवाळी गोड होणार आहे.तसेच पुरवठा मंत्री बापट यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता चणाडाळ आणि उडीदडाळही या महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ४२,२९७ तसेच प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबे २,३७,२४७ इतकी आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपुवी चणाडाळ आणि उडीद डाळ रेशनदुकानांवर उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकी २७९५ क्विंटलची मागणी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत धान्य जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याचे डॉ. फड यांनी सांगितले.जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक ४२,२९७ इतके आहेत. आत्तापर्यंत या शिधापत्रिकावरील कुटुंबासाठी प्रति किलो साखर रेशनदुकानावर दिली जाते. मात्र, केवळ दिवाळीसाठी एक महिन्याकरिता प्राधान्य कुटुंबाला एक किलो साखर दिली जाणार आहे. मात्र, यापुढे या दोन्ही शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ, चणाडाळ तसेच उडीदडाळ प्रतिकिलो ३५ रूपये दराने एक किलो डाळ मिळणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी