शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रत्नागिरी :  अंत्योदय, प्राधान्य कार्डधारकांची दिवाळी गोड, आता चणाडाळ, उडीदडाळ बरोबरच साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:07 IST

दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी ह्यगोडह्ण होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाली असून चणाडाळ तसेच उडीदडाळीची मागणीही प् करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देअंत्योदय, प्राधान्य कार्डधारकांची दिवाळी गोडधान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाली असून चणाडाळ तसेच उडीदडाळीची मागणीही प् करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी मंगळवारी दिली.गेल्या सोमवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी ही घोषणा केली असून तसा शासन अध्यादेशही काढण्यात आला आहे. आत्तापर्यंत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति कुटुंब एक किलो साखर मिळत होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच रास्त दर धान्य दुकानांवर ३५ रूपये किलो दराने तूरडाळही उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यातच आता दिवाळी जवळ आल्याने राज्याच्या पुरवठा विभागाने पुन्हा प्रति कुटुंब एक किलो चणाडाळ तसेच उडीद डाळ ३५ रूपये किलो दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दिवाळीसाठी आॅक्टोबर महिन्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांबरोबरच प्राधान्य गटालाही साखर मिळणार आहे. दिवाळीपुर्वीच जिल्हा पुरवठा विभागाकडे या महिन्यातच साखर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी का होईना पण प्राधान्य कुटुंबाला साखर मिळणार असल्याने दिवाळी गोड होणार आहे.तसेच पुरवठा मंत्री बापट यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता चणाडाळ आणि उडीदडाळही या महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ४२,२९७ तसेच प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबे २,३७,२४७ इतकी आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपुवी चणाडाळ आणि उडीद डाळ रेशनदुकानांवर उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकी २७९५ क्विंटलची मागणी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत धान्य जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याचे डॉ. फड यांनी सांगितले.जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक ४२,२९७ इतके आहेत. आत्तापर्यंत या शिधापत्रिकावरील कुटुंबासाठी प्रति किलो साखर रेशनदुकानावर दिली जाते. मात्र, केवळ दिवाळीसाठी एक महिन्याकरिता प्राधान्य कुटुंबाला एक किलो साखर दिली जाणार आहे. मात्र, यापुढे या दोन्ही शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ, चणाडाळ तसेच उडीदडाळ प्रतिकिलो ३५ रूपये दराने एक किलो डाळ मिळणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी