शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रत्नागिरी : कोकण ग्रीन बेल्ट जाहीर करावा, मागणी धरू लागली जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 14:45 IST

कोकणचा हापूस जीआय मानांकनाच्या प्रतीक्षेत असल्याने कोकण हा ग्रीन बेल्ट झोन जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्दे कोकण ग्रीन बेल्ट जाहीर करावा, मागणी धरू लागली जोर कोकणचा हापूस जीआय मानांकनाच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी : हवामानात होणाऱ्या बदलामुळे आंबा उत्पादनात दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. बदलामुळे बुरशी, तुडतुडा, थ्रीप्ससारख्या रोगाचा प्रादुर्भाव बळावत असताना त्यासाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक कीटकनाशकांचे अंश फळात उतरतात. त्यामुळे युरोप, अमेरिका, जपान हे देश आंबा नाकारत आहेत. कोकणचा हापूस जीआय मानांकनाच्या प्रतीक्षेत असल्याने कोकण हा ग्रीन बेल्ट झोन जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.हंगामापूर्वी आंबा पीक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी संजीवकांचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. त्याचे परिणाम झाडाच्या आयुर्मानावर होत आहेत. शिवाय शासनाने काही रासायनिक कीटकनाशकांवर बंदी आणण्यात आली असली तरी अद्याप त्या कीटकनाशकांची विक्री आणि वापर राजरोसपणे सुरू आहे.

रासायनिक कीटकनाशकांचा सुरूवातीला पंधरा ते वीस दिवस प्रभाव असतो, कालांतराने दुसर्‍यादा कराव्या लागणार्‍या फवारणीसाठी वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांचा प्रभाव सहा ते सात दिवस राहतो. कीटकनाशकांचे दर महागडे असल्याने आंबा उत्पादनाच्या खर्चात भरमसाठ वाढत होते.यावर पर्याय म्हणून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. जीवामृत, गांडूळ खत किंवा अन्य सेंद्रिय खते विविध पिकांसाठी शेतकरी वापरत आहेत. मात्र आंब्यावर जेव्हा हवामानातील बदलामुळे परिणाम होतात, त्यावर रासायनिक कीटकनाशके वापरली जातात. त्याऐवजी सेंद्रिय कीटकनाशकांच्या संशोधनावर भर दिला जाणे गरजेचे आहे.कोकणातील निसर्गाचा अभ्यास करून सेंद्रिय कीटकनाशकांचा पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. शासनाने कृषी विद्यापिठाच्या माध्यमातून संशोधन करून आयुर्वेदिक औषधे तयार करणे गरजेचे आहे.साक्यावर फवारणी रसायन संशोधनाची आवश्यकताहापूसने जगाच्या पाठीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. परंतु रासायनिक कीटकनाशकांच्या मार्‍यामुळे आंब्यामध्ये त्याचा प्रभाव राहात असल्याने परदेशातून तो नाकारला जात आहे. हापूस आंब्यात होणार्‍या साक्यावर आयआयएचआर बंगळुरूचे शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र यांनी आयुर्वेदिक औषध तयार केले आहे.

बाट तयार होण्याच्या स्थितीला आंबा देठासह या औषधाच्या द्रावणात बुडविला तर साका नष्ट होतो. छोट्या झाडांना हा प्रयोग शक्य आहे. मात्र, कोकणातील उंच झाडांसाठी फवारणी हाच उत्तम पर्याय आहे. फवारणी करून साका नष्ट करता येईल, असे संशोधन होणे गरजेचे आहे.

सारंगपूरप्रमाणे कोकण ग्रीन बेल्टउत्तरप्रदेशमध्ये सारंगपूर ग्रीन बेल्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे कोकण ग्रीन बेल्ट झोन जाहीर केल्यास भविष्यात कोकणातील शेतकर्‍याच्या व्यथा कमी होतील. कोकण कृषी विद्यापीठातच त्याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. शासनाने आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करून शेतकर्‍याना परवडतील, यासाठी अनुदानावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सेंद्रिय पध्दतीनेच आंबा पिकविला तर त्याला जागतिक स्तरावरून मागणी वाढेल आणि कोकणच्या सर्वसामान्य शेतकर्‍याचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होईल.समिश्र लागवडरत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाल्यापासून फळलागवडीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. लागवडीवेळी शेतकर्‍यानी आंबा, काजू पिकाची लागवड केली. मात्र, मोठ्या प्रमाणावर लागवड करताना एकाच प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, कीटकांचा प्रभाव रोखण्यासाठी समिश्र लागवडीचे तंत्र जोपासणे गरजेचे आहे. अनेक प्रयोगशील शेतकरी आंबा बागेतून आंतरपिक उत्पादन घेत आहेत. त्यासाठी कृषी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील शेतकर्‍याना वेळोवळी मार्गदर्शनही करण्यात येत आहे.शासकीय योजना, त्यांची अंमलबजावणी करण्यात जिल्ह्याचा कृषी विभाग अग्रेसर आहे. त्यामुळेच शेतीखालील क्षेत्र वाढत आहे. उत्पादित माल, उत्पादनावरील परिणाम यामुळे शेतकर्‍यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याचीही आवश्यकता आहे. 

निर्णयाची गरजकोकण ग्रीन बेल्ट झोन जाहीर करून सेंद्रीय औषधांचे तत्काळ संशोधन करणे गरजेचे आहे. सेंद्रीय पध्दतीने कोकणात पिकवलेल्या आंब्याला जागतिकस्तरावरून नक्कीच मागणी वाढेल, शिवाय येथील शेतकरी सधन होण्यासाठी मदत होईल. कोकणचा हापूस व येथील शेतकरी यांचा अभ्यास करून शेतकर्‍यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याचीही आवश्यकता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.- सलील दामले,शेतकरी, कोळंबे

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी