शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : आंबेनळी अपघात : मृत बसचालकावरील गुन्ह्याने संतापाची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:52 IST

पोलादपूर-आंबेनळी (जि. रायगड) अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंतदेसाई यांना वाचवण्यासाठी बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंद केला असल्याचा आरोप करत ३० मृत कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबिय दापोली कोकणात कृषी विद्यापीठावर धडकले.

ठळक मुद्देआंबेनळी अपघात : मृत बसचालकावरील गुन्ह्याने संतापाची भावनामृतांचे नातेवाईक कृषी विद्यापीठावर धडकले

दापोली : पोलादपूर-आंबेनळी (जि. रायगड) अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंतदेसाई यांना वाचवण्यासाठी बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंद केला असल्याचा आरोप करत ३० मृत कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबिय दापोली कोकणात कृषी विद्यापीठावर धडकले.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनात बुधवारी मृतांचे नातेवाईक धडकले. कृषी विद्यापीठाच्या चौकशी समितीने शासनाला दिलेल्या अहवालामुळेच प्रशांतवर गुन्हा नोंदविला गेला आहे का? या प्रकरणात प्रकाश सावंतदेसाई दोषी असून त्यांच्यावर करवाई व्हावी, अशी मागणीसुद्धा करण्यात आली.सावंतदेसाई यांची सीआयडी चौकशी व नार्को टेस्ट करण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाने यापूर्वीच दिले होते, परंतु याबद्दल कोणतीही हालचाल नाही. बस सावंतदेसाई चालवत असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा अपघात प्रकरणात पोलिसांनी वाहनचालक प्रशांत भांबिड यांच्यावर नोंदविलेला गुन्हा हा कुटुंबियांना अमान्य आहे.

आपला मुलगा असं करुच शकत नाही. पोलिसांनी कोणाच्या तरी दबावापोटी गुन्हा नोंदविला आहे. प्रशांतवर गुन्हा नोंदवून आमच्या कुटुंबावर पोलिसांनी अन्याय केला आहे. पोलिसांनी तपास नि:पक्षपातीपणे केला नाही. ही फाइल बंद करण्यासाठीच प्रशांतवर गुन्हा नोंदवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.आधीपासूनच सावंतदेसाई यांच्यावर आपला संशय आहे. असे असताना पोलिसांनी तब्बल ५ महिन्यानी मृत चालकावर गुन्हा नोंदविल्याने याप्रकरणाने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. या प्रकरणातील गूढ अजून वाढले आहे.दि. २८ जुलै २०१८ मध्ये पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या बसला अपघात झाला, त्या अपघातात ३० कर्मचारी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी पाच महिन्यानंतर मृत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेनळी घाटातील बस अपघात हा अपघात नव्हे तर घातपात होता, असा संशय आहे. पोलिस तपास योग्य दिशेने झाला नाही. तपास योग्य दिशेने झाल्यास सत्य बाहेर येईल, असे या नातेवाईकांनी सांगितले.हे नातेवाईक बुधवारी दापोली कोकण कृषी विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण यांच्या केबिनमध्ये धडकले व त्यांच्याशी चर्चा केली. प्रकाश सावंत देसाई यांची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे.

ही मागणी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मान्य केली आहे, परंतु पोलादपूर पोलिसांनी मृत वाहनचालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंदवून प्रशांतवर अन्याय केला आहे. आम्हा सगळ्यांना न्याय हवा आहे. याप्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

टॅग्स :Dapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरीBus Driverबसचालक