शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

रत्नागिरी : आंबेनळी अपघात : मृत बसचालकावरील गुन्ह्याने संतापाची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:52 IST

पोलादपूर-आंबेनळी (जि. रायगड) अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंतदेसाई यांना वाचवण्यासाठी बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंद केला असल्याचा आरोप करत ३० मृत कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबिय दापोली कोकणात कृषी विद्यापीठावर धडकले.

ठळक मुद्देआंबेनळी अपघात : मृत बसचालकावरील गुन्ह्याने संतापाची भावनामृतांचे नातेवाईक कृषी विद्यापीठावर धडकले

दापोली : पोलादपूर-आंबेनळी (जि. रायगड) अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंतदेसाई यांना वाचवण्यासाठी बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंद केला असल्याचा आरोप करत ३० मृत कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबिय दापोली कोकणात कृषी विद्यापीठावर धडकले.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनात बुधवारी मृतांचे नातेवाईक धडकले. कृषी विद्यापीठाच्या चौकशी समितीने शासनाला दिलेल्या अहवालामुळेच प्रशांतवर गुन्हा नोंदविला गेला आहे का? या प्रकरणात प्रकाश सावंतदेसाई दोषी असून त्यांच्यावर करवाई व्हावी, अशी मागणीसुद्धा करण्यात आली.सावंतदेसाई यांची सीआयडी चौकशी व नार्को टेस्ट करण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाने यापूर्वीच दिले होते, परंतु याबद्दल कोणतीही हालचाल नाही. बस सावंतदेसाई चालवत असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा अपघात प्रकरणात पोलिसांनी वाहनचालक प्रशांत भांबिड यांच्यावर नोंदविलेला गुन्हा हा कुटुंबियांना अमान्य आहे.

आपला मुलगा असं करुच शकत नाही. पोलिसांनी कोणाच्या तरी दबावापोटी गुन्हा नोंदविला आहे. प्रशांतवर गुन्हा नोंदवून आमच्या कुटुंबावर पोलिसांनी अन्याय केला आहे. पोलिसांनी तपास नि:पक्षपातीपणे केला नाही. ही फाइल बंद करण्यासाठीच प्रशांतवर गुन्हा नोंदवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.आधीपासूनच सावंतदेसाई यांच्यावर आपला संशय आहे. असे असताना पोलिसांनी तब्बल ५ महिन्यानी मृत चालकावर गुन्हा नोंदविल्याने याप्रकरणाने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. या प्रकरणातील गूढ अजून वाढले आहे.दि. २८ जुलै २०१८ मध्ये पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या बसला अपघात झाला, त्या अपघातात ३० कर्मचारी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी पाच महिन्यानंतर मृत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेनळी घाटातील बस अपघात हा अपघात नव्हे तर घातपात होता, असा संशय आहे. पोलिस तपास योग्य दिशेने झाला नाही. तपास योग्य दिशेने झाल्यास सत्य बाहेर येईल, असे या नातेवाईकांनी सांगितले.हे नातेवाईक बुधवारी दापोली कोकण कृषी विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण यांच्या केबिनमध्ये धडकले व त्यांच्याशी चर्चा केली. प्रकाश सावंत देसाई यांची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे.

ही मागणी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मान्य केली आहे, परंतु पोलादपूर पोलिसांनी मृत वाहनचालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंदवून प्रशांतवर अन्याय केला आहे. आम्हा सगळ्यांना न्याय हवा आहे. याप्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

टॅग्स :Dapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरीBus Driverबसचालक