शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

रत्नागिरी : १६६पैकी ५० शिक्षकांचे समायोजन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:50 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील १६६ शिक्षक  अतिरिक्त ठरले आहेत़  मात्र, लवकरच केवळ ५० शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देआठवडाभरात प्रक्रिया पूर्ण, रिक्त शाळांना मिळणार शिक्षकशाळा बंद झाल्याने परिणाम 

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील १६६ शिक्षक  अतिरिक्त ठरले आहेत़  मात्र, लवकरच केवळ ५० शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. 

नोकरीनिमित्ताने शहराकडे जाणाºयांची संख्या मोठी असल्याने या सर्वांचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या २६२१ प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये सुमारे ७५०० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. जिल्ह्यातील ० ते १०  पटसंख्येच्या सुमारे ६५० शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेने काही शाळा बंद करुन तेथील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले आहे.

या शाळा बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. त्यामुळे अगोदरच शिक्षकांची ओरड सुरु आहे. त्यातच १६६ शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी या शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ५० शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिक्त शाळांमध्ये शिक्षक मिळणार आहेत. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी