शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

रत्नागिरीत दर महिन्याला ५० परवाने होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वाहतूक नियम तोडला म्हणून केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वाहतूक नियम तोडला म्हणून केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर अनेक वेळा वाहन चालवण्याचा परवाना रद्दही केला जातो. वाहतुकीमध्ये नियमितपणा असावा आणि त्यातून कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक शाखा अधिक काटेकोरपणे कार्यरत आहे. म्हणूनच चालू वर्षी नऊ महिन्यात ४९४ म्हणजेच दर महिन्याला सुमारे ५० जणांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आला आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दारू पिऊन वाहन चालविणे अशांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो.

वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल अनेकवेळा दंड भरून घेतला जातो. परंतु विशिष्ट ६ नियमांचे पालन न करता गाडी चालवली तर वाहनचालकांचा परवाना रद्द केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात २०१९ साली ६१०, २०२० साली ३७६ व २०२१(ऑगस्ट) ४९४ जणांचे परवाने रद्द झाले आहेत. गाडीच्या वेग मर्यादेवर, अवैध वाहतूक प्रवासी, माल वाहतूक मधून प्रवासी वाहतूक या सर्व गोष्टींवर वाहतूक शाखेची व परिवहन विभागाची बारीक नजर असते. घालून दिलेल्या नियमांचे पालन नाही केले कारवाई केली जाते.

अशी होते कारवाई...

ज्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते अशा वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला जातो. हा प्रस्ताव परिवहन कार्यालयात पाठविला जातो. परिवहन विभागाकडून या वाहनचालकाचे समुुपदेशपही केले जाते. वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो. कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्याचा अधिकार हा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे. व्यक्ती सातत्याने एक चूक सारखी करते आहे का, हेही तपासले जाते.

हे नियम माेडल्यास परवान्याचे निलंबन

- वाहन चालविताना सिग्नल तोडला तर कारवाई नक्की होते.

- दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलून गाडी चालविणे.

- अतिगतीने गाडी चालविणे, माल वाहतूक गाडीत प्रवासी वाहतूक करणे व अवैध प्रवासी वाहतूक करणे हे सर्व नियम तर वाहन चालविताना तोडले तर वाहनचालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते. या सर्व गोष्टींवर वाहतूक शाखेची बारीक नजर असते.

तीन महिने रद्द

वाहनचालक जर गाडी चालवताना मोबाइईलचा वापर करताना आढळला तर त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द केला जातो. काही व्यक्ती सातत्याने जर गुन्हा करत असतील तर अशांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविला जातो. गाडी चालवतानाचे ६ नियम आहेत ते पाळले नाही तर अशांचे लायसन्स वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते.

नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे

गाडी चालविताना घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच गाडी चालवावी. तसेच जर कोणी व्यक्ती नियमांचे उल्लघंन करत असेल अशांचा परवाना तीन महिन्यासाठी रद्द केला जातो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी महिन्याभरात केलेेल्या केसेसचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवला जातो. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे.

- शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक