शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत दर महिन्याला ५० परवाने होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वाहतूक नियम तोडला म्हणून केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वाहतूक नियम तोडला म्हणून केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर अनेक वेळा वाहन चालवण्याचा परवाना रद्दही केला जातो. वाहतुकीमध्ये नियमितपणा असावा आणि त्यातून कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक शाखा अधिक काटेकोरपणे कार्यरत आहे. म्हणूनच चालू वर्षी नऊ महिन्यात ४९४ म्हणजेच दर महिन्याला सुमारे ५० जणांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आला आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दारू पिऊन वाहन चालविणे अशांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो.

वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल अनेकवेळा दंड भरून घेतला जातो. परंतु विशिष्ट ६ नियमांचे पालन न करता गाडी चालवली तर वाहनचालकांचा परवाना रद्द केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात २०१९ साली ६१०, २०२० साली ३७६ व २०२१(ऑगस्ट) ४९४ जणांचे परवाने रद्द झाले आहेत. गाडीच्या वेग मर्यादेवर, अवैध वाहतूक प्रवासी, माल वाहतूक मधून प्रवासी वाहतूक या सर्व गोष्टींवर वाहतूक शाखेची व परिवहन विभागाची बारीक नजर असते. घालून दिलेल्या नियमांचे पालन नाही केले कारवाई केली जाते.

अशी होते कारवाई...

ज्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते अशा वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला जातो. हा प्रस्ताव परिवहन कार्यालयात पाठविला जातो. परिवहन विभागाकडून या वाहनचालकाचे समुुपदेशपही केले जाते. वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो. कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्याचा अधिकार हा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे. व्यक्ती सातत्याने एक चूक सारखी करते आहे का, हेही तपासले जाते.

हे नियम माेडल्यास परवान्याचे निलंबन

- वाहन चालविताना सिग्नल तोडला तर कारवाई नक्की होते.

- दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलून गाडी चालविणे.

- अतिगतीने गाडी चालविणे, माल वाहतूक गाडीत प्रवासी वाहतूक करणे व अवैध प्रवासी वाहतूक करणे हे सर्व नियम तर वाहन चालविताना तोडले तर वाहनचालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते. या सर्व गोष्टींवर वाहतूक शाखेची बारीक नजर असते.

तीन महिने रद्द

वाहनचालक जर गाडी चालवताना मोबाइईलचा वापर करताना आढळला तर त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द केला जातो. काही व्यक्ती सातत्याने जर गुन्हा करत असतील तर अशांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविला जातो. गाडी चालवतानाचे ६ नियम आहेत ते पाळले नाही तर अशांचे लायसन्स वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते.

नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे

गाडी चालविताना घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच गाडी चालवावी. तसेच जर कोणी व्यक्ती नियमांचे उल्लघंन करत असेल अशांचा परवाना तीन महिन्यासाठी रद्द केला जातो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी महिन्याभरात केलेेल्या केसेसचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवला जातो. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे.

- शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक