शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

रत्नागिरीत दर महिन्याला ५० परवाने होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वाहतूक नियम तोडला म्हणून केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वाहतूक नियम तोडला म्हणून केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर अनेक वेळा वाहन चालवण्याचा परवाना रद्दही केला जातो. वाहतुकीमध्ये नियमितपणा असावा आणि त्यातून कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक शाखा अधिक काटेकोरपणे कार्यरत आहे. म्हणूनच चालू वर्षी नऊ महिन्यात ४९४ म्हणजेच दर महिन्याला सुमारे ५० जणांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आला आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दारू पिऊन वाहन चालविणे अशांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो.

वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल अनेकवेळा दंड भरून घेतला जातो. परंतु विशिष्ट ६ नियमांचे पालन न करता गाडी चालवली तर वाहनचालकांचा परवाना रद्द केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात २०१९ साली ६१०, २०२० साली ३७६ व २०२१(ऑगस्ट) ४९४ जणांचे परवाने रद्द झाले आहेत. गाडीच्या वेग मर्यादेवर, अवैध वाहतूक प्रवासी, माल वाहतूक मधून प्रवासी वाहतूक या सर्व गोष्टींवर वाहतूक शाखेची व परिवहन विभागाची बारीक नजर असते. घालून दिलेल्या नियमांचे पालन नाही केले कारवाई केली जाते.

अशी होते कारवाई...

ज्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते अशा वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला जातो. हा प्रस्ताव परिवहन कार्यालयात पाठविला जातो. परिवहन विभागाकडून या वाहनचालकाचे समुुपदेशपही केले जाते. वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो. कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्याचा अधिकार हा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे. व्यक्ती सातत्याने एक चूक सारखी करते आहे का, हेही तपासले जाते.

हे नियम माेडल्यास परवान्याचे निलंबन

- वाहन चालविताना सिग्नल तोडला तर कारवाई नक्की होते.

- दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलून गाडी चालविणे.

- अतिगतीने गाडी चालविणे, माल वाहतूक गाडीत प्रवासी वाहतूक करणे व अवैध प्रवासी वाहतूक करणे हे सर्व नियम तर वाहन चालविताना तोडले तर वाहनचालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते. या सर्व गोष्टींवर वाहतूक शाखेची बारीक नजर असते.

तीन महिने रद्द

वाहनचालक जर गाडी चालवताना मोबाइईलचा वापर करताना आढळला तर त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द केला जातो. काही व्यक्ती सातत्याने जर गुन्हा करत असतील तर अशांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविला जातो. गाडी चालवतानाचे ६ नियम आहेत ते पाळले नाही तर अशांचे लायसन्स वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते.

नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे

गाडी चालविताना घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच गाडी चालवावी. तसेच जर कोणी व्यक्ती नियमांचे उल्लघंन करत असेल अशांचा परवाना तीन महिन्यासाठी रद्द केला जातो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी महिन्याभरात केलेेल्या केसेसचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवला जातो. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे.

- शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक