शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

रत्नागिरी : सामुदायिक सोहळ्यात शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:00 IST

धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १२.३५ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यावेळी कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह यावेळी होणार आहेत.

ठळक मुद्दे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकार पटवर्धन प्रशालेच्या आवारात सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे आयोजन मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, पोशाख, भोजन व्यवस्था

रत्नागिरी : धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १२.३५ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यावेळी कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह यावेळी होणार आहेत.धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या धार्मिक व धर्मादाय स्वरूपाच्या न्यासाकडे शिल्लक निधीतील काही निधीचा वापर समाजकल्याण, सामजिक उपक्रमाकरिता करता येतो. त्यातूनच सर्व धर्मियांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या २५ प्रतिनिधींची नोंदणीकृत सामुदायिक विवाह सोहळा समिती तयार झाली आहे.

या सामुदायिक विवाहाची जबाबदारी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त ए. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समिती उचलणार आहे. यासाठी आवश्यक असणारे मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, पोशाख, भोजन व्यवस्था विविध संस्था तसेच व्यक्ती करणार आहेत. वधू - वरांना घरापासून विवाहस्थळापर्यंत आणण्यासाठीचा प्रवास खर्च समिती उचलणार आहे.सामाजाची गरज म्हणून असे सामुदायिक विवाह होणे गरजेचे असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने उत्तम पाऊल उचलले आहे. या सोहळ्याला धर्मादाय कार्यालयाच्या सहआयुक्त निवेदिता पवार तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त अमोल कुलकर्णी तसेच सामुदायिक विवाह समितीतर्फे करण्यात आले आहे.वारेमाप खर्च...लग्नसोहळा सध्याच्या काळात प्रतिष्ठेचा समजला जात असल्याने वधू आणि परपक्षांकडून या सोहळ्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. मुलीच्या वडिलांची ऐपत नसल्याने प्रसंगी घर, जमीन गहाण ठेवून मुलीचे लग्न करून देतात. या घटना थांबाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्न