शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सामुदायिक सोहळ्यात शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:00 IST

धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १२.३५ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यावेळी कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह यावेळी होणार आहेत.

ठळक मुद्दे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकार पटवर्धन प्रशालेच्या आवारात सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे आयोजन मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, पोशाख, भोजन व्यवस्था

रत्नागिरी : धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १२.३५ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यावेळी कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह यावेळी होणार आहेत.धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या धार्मिक व धर्मादाय स्वरूपाच्या न्यासाकडे शिल्लक निधीतील काही निधीचा वापर समाजकल्याण, सामजिक उपक्रमाकरिता करता येतो. त्यातूनच सर्व धर्मियांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या २५ प्रतिनिधींची नोंदणीकृत सामुदायिक विवाह सोहळा समिती तयार झाली आहे.

या सामुदायिक विवाहाची जबाबदारी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त ए. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समिती उचलणार आहे. यासाठी आवश्यक असणारे मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, पोशाख, भोजन व्यवस्था विविध संस्था तसेच व्यक्ती करणार आहेत. वधू - वरांना घरापासून विवाहस्थळापर्यंत आणण्यासाठीचा प्रवास खर्च समिती उचलणार आहे.सामाजाची गरज म्हणून असे सामुदायिक विवाह होणे गरजेचे असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने उत्तम पाऊल उचलले आहे. या सोहळ्याला धर्मादाय कार्यालयाच्या सहआयुक्त निवेदिता पवार तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त अमोल कुलकर्णी तसेच सामुदायिक विवाह समितीतर्फे करण्यात आले आहे.वारेमाप खर्च...लग्नसोहळा सध्याच्या काळात प्रतिष्ठेचा समजला जात असल्याने वधू आणि परपक्षांकडून या सोहळ्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. मुलीच्या वडिलांची ऐपत नसल्याने प्रसंगी घर, जमीन गहाण ठेवून मुलीचे लग्न करून देतात. या घटना थांबाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्न