शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महाकृषी संचार योजनेला ‘रेंज’

By admin | Updated: October 25, 2015 23:31 IST

भारत संचार निगम : १ नोव्हेंबरपासून ‘थ्री इन वन’ ग्राहकांच्या सेवेत

रत्नागिरी : कृषी विभाग आणि भारतीय दूरसंचार निगम अर्थात बीएसएनएल यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली महाकृषी संचार योजना २१ आॅक्टोबरला बंद झाली असली तरी येत्या १ नोव्हेंबरपासून ही योजना नव्या आकर्षक रूपात पुन्हा ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. आत्तापर्यंत आलेल्या तीन योजनांचे एकत्रीकरण असे या योजनेचे स्वरूप असल्याचे बीएसएनएल सुत्रांकडून सांगण्यात आले. कंपनीपासून दूर चाललेल्या ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनी विविध योजनांचा अवलंब करत आहे.कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यामधील संवाद वाढावा, त्यांच्यात कमी खर्चात व सवलतीच्या दरात समन्वय साधला जावा, या हेतूने मोबाईल टू मोबाईल ही ‘महाकृषी संचार’ योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाण्यांची उपलब्धता व गुणवत्तेबाबत येणाऱ्या अडचणी तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती तत्काळ व कमी खर्चात मिळावी यासाठी ‘क्लोज युजर ग्रुप’ (सीयुजी) भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यासाठी विनामूल्य सुविधा, नेटवर्क आणि गुणवत्ता यांचा विचार करून बीएसएनएलची निवड करण्यात आली आहे. आत्तापर्यंत तीन टप्प्यांत कृषीसंचार योजना सुरू करण्यात आली. या तीनही वेळा ही योजना यशस्वी झाल्याने आता या तीनही योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना नव्या स्वरुपात येत आहे. पहिल्या तीन व आता नव्या योजनेतील शेतकरी एकमेकांशी मोफत बोलू शकणार आहेत. मात्र, लाभाचे व रिचार्जचे स्वरूप या योजनेत बदलले जाणार आहे. एक नोव्हेंबरला हा नवा प्लॅन सुरु होणार असून, ३१ मार्चपर्यंत शेतकरी सीम खरेदी करू शकतील. नव्या स्वरूपानुसार सर्व प्रीपेड ग्राहकांना १४१ तर पोस्टपेड ग्राहकांना १२४ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. यात सर्व ग्रुपमधील ग्राहक एकमेकांशी अनलिमिटेड मोफत संभाषण करू शकणार आहेत, अशी माहिती बीएसएनएलच्या सुत्रांनी दिली आहे.तसेच बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ४०० एमबी इंटरनेट डाटा मोफत तसेच ४५० कॉल्स मोफत मिळणार आहेत. तर इतरांसाठी ५० कॉल मोफत मिळणार आहेत. बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ४०० तर इतरांसाठी १०० संदेश देखील यात मिळणार आहेत. त्यामुळे तीन योजनांचे एकत्रीकरण असलेली ‘थ्री इन वन’ महाकृषी संचार योजना येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने नवी सुरू केलेली योजना शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट ठरणार आहे. (प्रतिनिधी)फायदा : विविध कंपन्यांनी शेतकऱ्यांना वगळलेविविध मोबाईल कंपन्यांनी विविध ग्रुप योजना सुरू केल्या. मात्र, शेतकरी हा एकमेव घटक यातून वगळला होता. त्यामुळे बीएसएनएल व शासनाच्या कृषी विभाग यांच्या सहकार्याने फक्त शेतकऱ्यांसाठी ‘कृषीसंचार’ ही योजना सुरू केली आहे. याअंतर्गत अनेक सुविधा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे याआधीच्याही तीनही योजना लोकप्रिय झाल्या आहेत. आतापर्यंत ९९, १०८, १०९, १२८ रुपये मासिक भाडे असलेली ही योजना बीएसएनएलने तीन टप्प्यात सुरु केली आहे. यामुळे या योजनेचे लाभार्थी शेतकरी व अधिकारी एकमेकांशी मोफत बोलत आहेत. फक्त या तीन टप्प्यांतील ग्राहक आपला ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये मोफत संभाषण करू शकत नव्हते. मात्र, नव्या योजनेत एका ग्रुपमधील सदस्य दुसऱ्या ग्रुपमधील सदस्याशी मोफत संभाषण करू शकतील.बीएसएनएलच्या सर्व योजनांपेक्षा सर्वाधिक लोकप्रिय आणि मागणी असणारी अशी ही ‘कृषी महासंचार योजना’ आहे. यात आता सर्व योजनांचे एकत्रीकरण झाल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेचे नवे स्वरूप ग्राहकांना कमी खर्च करायला लावणारे आणि ग्राहक वाढवण्यास मदत करेल.