शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

राजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीच, राजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:49 IST

राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देराजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीचराजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात- भाजपच्या बंडखोराची माघार

राजापूर : राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.जुलै महिन्याच्या १५ तारखेला ही निवडणूक होत आहे. त्यामध्ये काँग्रेस आघाडीकडून प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर व भाजपकडून त्यांचे पालिकेतील एकमेव नगरसेवक गोविंद चव्हाण रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरु आहे. त्यांचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या प्रभागात प्रचारकार्यात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेकडून आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचे पदाधिकारी प्रचारात उतरले असतानाच काँग्रेस आघाडीकडून विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे माजी युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव व दोन्ही पक्षांचे पदाधिकारी किल्ला लढवत आहेत.भाजपमधून बंडखोरी केलेल्या शीतल पटेल यांच्या माघारीनंतर भाजपच्या तंबूतून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला असून, आता भाजपचे कार्यकर्तेदेखील प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र, उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये जे नाट्य घडले होते, ते पाहता दुभंगलेली मने पुन्हा सांधली जाऊन या पक्षाकडून एकसंघ प्रचार होईल का? हादेखील तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे.नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे हे मागील एक दशक नगरसेवक म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी पालिकेत सभापतीपदे भूषवली आहेत. यावेळी ते उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच नगराध्यक्ष पदाचा अतिरीक्त कार्यभार त्यांच्याकडे आला.

आपल्या मागील कार्यकालात शहरवासीयांसाठी त्यांनी चांगले योगदान दिले आहे. पाण्याच्या प्रश्नासह रस्ते व अन्य मूलभूत सुविधा याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. पक्षाचे प्रतोद म्हणूनही ते कार्यरत होते.मागील वेळीही मेळेकर यांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. पण, ते पराभूत झाले होते. शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन संधी दिली आहे. भाजप उमेदवार गोविंद चव्हाण हे पालिकेतील एकमेव नगरसेवक असून, पाणी सभापती म्हणून कार्यरत आहेत.

कडाक्याचा उन्हाळा असताना शहरात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी स्वत: खबरदारी घेतली होती. या कामांच्या जोरावर हे तिन्ही उमेदवार आपले नशीब आजमावत असून, खरा सामना हा शिवसेना विरुध्द काँग्रेस आघाडी असाच रंगणार आहे.निवडणुकीत शहरातील विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारांकडुन भर देण्यात आला आहे. शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न, रस्ते, वीज, घनकचरा व्यवस्थापन यासहित अनेक समस्या मागील अनेक वर्षे भेडसावत असून, त्या सोडविण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत ते उमेदवारांकडून सांगितले जात आहे.आता काही दिवस शिल्लक असून, कोणत्याही उमेदवाराची पहिली फेरी अजून पूर्ण झालेली नाही. शिवाय मागील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने त्याचादेखील अडथळा सर्व उमेदवारांना बसत आहे. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींसह सोशल मीडियाचाही प्रचारासाठी वापर होत आहे.साळवी - खलिफे यांची प्रतिष्ठा पणालाही निवडणूक शिवसेनेचे आमदार राजन साळवी व काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. राजापूर नगर परिषदेत सतरापैकी शिवसेनेचे सर्वाधिक आठ नगरसेवक असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणणे मोठी जबाबदारी आमदार साळवी व त्यांच्या सहकाºयांवर येऊन पडली आहे.भाजपची नेतेमंडळी येणार ?भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड व कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार निरंजन डावखरे येणार असल्याची चर्चा आहे. आमदार राजन साळवी हे पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले असून, सुट्टीच्या काळात राजापुरात प्रचारासाठी दाखल होणार आहेत. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षRatnagiriरत्नागिरी