शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीच, राजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:49 IST

राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देराजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीचराजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात- भाजपच्या बंडखोराची माघार

राजापूर : राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.जुलै महिन्याच्या १५ तारखेला ही निवडणूक होत आहे. त्यामध्ये काँग्रेस आघाडीकडून प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर व भाजपकडून त्यांचे पालिकेतील एकमेव नगरसेवक गोविंद चव्हाण रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरु आहे. त्यांचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या प्रभागात प्रचारकार्यात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेकडून आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचे पदाधिकारी प्रचारात उतरले असतानाच काँग्रेस आघाडीकडून विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे माजी युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव व दोन्ही पक्षांचे पदाधिकारी किल्ला लढवत आहेत.भाजपमधून बंडखोरी केलेल्या शीतल पटेल यांच्या माघारीनंतर भाजपच्या तंबूतून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला असून, आता भाजपचे कार्यकर्तेदेखील प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र, उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये जे नाट्य घडले होते, ते पाहता दुभंगलेली मने पुन्हा सांधली जाऊन या पक्षाकडून एकसंघ प्रचार होईल का? हादेखील तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे.नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे हे मागील एक दशक नगरसेवक म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी पालिकेत सभापतीपदे भूषवली आहेत. यावेळी ते उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच नगराध्यक्ष पदाचा अतिरीक्त कार्यभार त्यांच्याकडे आला.

आपल्या मागील कार्यकालात शहरवासीयांसाठी त्यांनी चांगले योगदान दिले आहे. पाण्याच्या प्रश्नासह रस्ते व अन्य मूलभूत सुविधा याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. पक्षाचे प्रतोद म्हणूनही ते कार्यरत होते.मागील वेळीही मेळेकर यांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. पण, ते पराभूत झाले होते. शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन संधी दिली आहे. भाजप उमेदवार गोविंद चव्हाण हे पालिकेतील एकमेव नगरसेवक असून, पाणी सभापती म्हणून कार्यरत आहेत.

कडाक्याचा उन्हाळा असताना शहरात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी स्वत: खबरदारी घेतली होती. या कामांच्या जोरावर हे तिन्ही उमेदवार आपले नशीब आजमावत असून, खरा सामना हा शिवसेना विरुध्द काँग्रेस आघाडी असाच रंगणार आहे.निवडणुकीत शहरातील विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारांकडुन भर देण्यात आला आहे. शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न, रस्ते, वीज, घनकचरा व्यवस्थापन यासहित अनेक समस्या मागील अनेक वर्षे भेडसावत असून, त्या सोडविण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत ते उमेदवारांकडून सांगितले जात आहे.आता काही दिवस शिल्लक असून, कोणत्याही उमेदवाराची पहिली फेरी अजून पूर्ण झालेली नाही. शिवाय मागील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने त्याचादेखील अडथळा सर्व उमेदवारांना बसत आहे. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींसह सोशल मीडियाचाही प्रचारासाठी वापर होत आहे.साळवी - खलिफे यांची प्रतिष्ठा पणालाही निवडणूक शिवसेनेचे आमदार राजन साळवी व काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. राजापूर नगर परिषदेत सतरापैकी शिवसेनेचे सर्वाधिक आठ नगरसेवक असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणणे मोठी जबाबदारी आमदार साळवी व त्यांच्या सहकाºयांवर येऊन पडली आहे.भाजपची नेतेमंडळी येणार ?भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड व कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार निरंजन डावखरे येणार असल्याची चर्चा आहे. आमदार राजन साळवी हे पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले असून, सुट्टीच्या काळात राजापुरात प्रचारासाठी दाखल होणार आहेत. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षRatnagiriरत्नागिरी