शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

राजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीच, राजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:49 IST

राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देराजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीचराजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात- भाजपच्या बंडखोराची माघार

राजापूर : राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.जुलै महिन्याच्या १५ तारखेला ही निवडणूक होत आहे. त्यामध्ये काँग्रेस आघाडीकडून प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर व भाजपकडून त्यांचे पालिकेतील एकमेव नगरसेवक गोविंद चव्हाण रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरु आहे. त्यांचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या प्रभागात प्रचारकार्यात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेकडून आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचे पदाधिकारी प्रचारात उतरले असतानाच काँग्रेस आघाडीकडून विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे माजी युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव व दोन्ही पक्षांचे पदाधिकारी किल्ला लढवत आहेत.भाजपमधून बंडखोरी केलेल्या शीतल पटेल यांच्या माघारीनंतर भाजपच्या तंबूतून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला असून, आता भाजपचे कार्यकर्तेदेखील प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र, उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये जे नाट्य घडले होते, ते पाहता दुभंगलेली मने पुन्हा सांधली जाऊन या पक्षाकडून एकसंघ प्रचार होईल का? हादेखील तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे.नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे हे मागील एक दशक नगरसेवक म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी पालिकेत सभापतीपदे भूषवली आहेत. यावेळी ते उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच नगराध्यक्ष पदाचा अतिरीक्त कार्यभार त्यांच्याकडे आला.

आपल्या मागील कार्यकालात शहरवासीयांसाठी त्यांनी चांगले योगदान दिले आहे. पाण्याच्या प्रश्नासह रस्ते व अन्य मूलभूत सुविधा याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. पक्षाचे प्रतोद म्हणूनही ते कार्यरत होते.मागील वेळीही मेळेकर यांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. पण, ते पराभूत झाले होते. शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन संधी दिली आहे. भाजप उमेदवार गोविंद चव्हाण हे पालिकेतील एकमेव नगरसेवक असून, पाणी सभापती म्हणून कार्यरत आहेत.

कडाक्याचा उन्हाळा असताना शहरात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी स्वत: खबरदारी घेतली होती. या कामांच्या जोरावर हे तिन्ही उमेदवार आपले नशीब आजमावत असून, खरा सामना हा शिवसेना विरुध्द काँग्रेस आघाडी असाच रंगणार आहे.निवडणुकीत शहरातील विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारांकडुन भर देण्यात आला आहे. शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न, रस्ते, वीज, घनकचरा व्यवस्थापन यासहित अनेक समस्या मागील अनेक वर्षे भेडसावत असून, त्या सोडविण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत ते उमेदवारांकडून सांगितले जात आहे.आता काही दिवस शिल्लक असून, कोणत्याही उमेदवाराची पहिली फेरी अजून पूर्ण झालेली नाही. शिवाय मागील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने त्याचादेखील अडथळा सर्व उमेदवारांना बसत आहे. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींसह सोशल मीडियाचाही प्रचारासाठी वापर होत आहे.साळवी - खलिफे यांची प्रतिष्ठा पणालाही निवडणूक शिवसेनेचे आमदार राजन साळवी व काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. राजापूर नगर परिषदेत सतरापैकी शिवसेनेचे सर्वाधिक आठ नगरसेवक असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणणे मोठी जबाबदारी आमदार साळवी व त्यांच्या सहकाºयांवर येऊन पडली आहे.भाजपची नेतेमंडळी येणार ?भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड व कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार निरंजन डावखरे येणार असल्याची चर्चा आहे. आमदार राजन साळवी हे पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले असून, सुट्टीच्या काळात राजापुरात प्रचारासाठी दाखल होणार आहेत. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षRatnagiriरत्नागिरी