शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यात ७ शाळा शून्य शिक्षकी, शिक्षण विभाग तोंडघशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:53 IST

शिक्षकांच्या बदल्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे आजच्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनीच समोर आणल्याने शिक्षण विभाग तोंडघशी पडला. चिपळूणातील प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेतून विद्यार्थी अन्य शाळेत हलविण्याचा निर्णय झाल्याने गेल्या ही शाळा वाचविण्याचा चाललेला प्रयत्न अखेर फोल ठरला.

ठळक मुद्देराजापूर तालुक्यात ७ शाळा शून्य शिक्षकी, शिक्षण विभाग तोंडघशीचिंचनाका शाळेतून विद्यार्थी हलविण्याचा निर्णय

रत्नागिरी : शिक्षकांच्या बदल्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे  जिल्हा परिषद स्थायी समिती पदाधिकाऱ्यांनीच समोर आणल्याने शिक्षण विभाग तोंडघशी पडला. चिपळूणातील प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेतून विद्यार्थी अन्य शाळेत हलविण्याचा निर्णय झाल्याने गेल्या ही शाळा वाचविण्याचा चाललेला प्रयत्न अखेर फोल ठरला.गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांच्या बदल्या गाजत होत्या़ समानीकरणाच्या मुद्यावर या बदल्या करण्यात आल्या होत्या़ मात्र, या बदल्या झाल्यानंतर गोंधळ उडाला होता़ या बदल्या करताना सुगम-दुर्गम शाळांचा मुद्दा सुरुवातीला पुढे आला होता़ तोही शासनाने मान्य न करताच या बदल्या केल्या़ त्यानंतर झालेल्या शिक्षक बदल्यांमध्येही घोळ झाल्याचे उघड झाले़. त्यामुळे शिक्षक संघटना तसेच अनेक शिक्षकांनी त्यावर आक्षेप घेतला होता़.

जिल्हा परिषद प्रशासनानेही या बदल्यानंतर एकही शाळा शून्य शिक्षकी राहणार नाही, असा दावा केला होता़ मात्र, अन्यायग्रस्त शिक्षकांचे समुपदेशन दोनच दिवसांपूर्वी झाले़ त्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे समोर आले आहे़. शिक्षण विभागाने शिक्षक बदल्यानंतर शून्य शिक्षकी एकही राहणार नाही, असा केलेला दावाही फोल ठरला आहे़. 

चिपळूण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेचा विषय गेले अडीच वर्षे स्थायी समितीच्या सभेत गाजत होता़. ही शाळा १०० वर्षापूर्वीची ऐतिहासिक शाळा असल्याने ती सुरुच ठेवावी, अशी मागणी विरोध पक्षनेते विक्रांत जाधव यांनी अनेकदा केली होती़ मात्र, या शाळेच्या आॅडिट अहवालामध्ये ती धोकादायक असून विद्यार्थ्यांच्या जिवितेस धोका असल्याचे म्हटले आहे़,  शाळा व्यवस्थापन समितीने ही शाळा धोकादायक नसल्याचा अहवाल दिला आहे़ तरीही मुलांच्या जिवितेस धोका असल्याने या शाळेतील विद्यार्थी अन्य जवळच्या शाळेत हलविण्याचा निर्णय  घेण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव आणि नेत्रा ठाकूर यांनी याला विरोध केला़, त्यामुळे ही शाळा आता इतिहास जमा होणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी