शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:25 IST

rajapur, shiv sena, ratnagiri, politics मागील काही दिवस राजापूर तालुका शिवसेनेअंतर्गत खदखदत असलेल्या संघर्षाला अखेर तोंड फुटले आहे. तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सभापतींसह प्रशासनाला अंधारात ठेवून भू येथील पशुवैद्यकीय इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन परस्पर केल्याचा घणाघाती आरोप पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी केला आहे.

ठळक मुद्देराजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

राजापूर : मागील काही दिवस राजापूर तालुका शिवसेनेअंतर्गत खदखदत असलेल्या संघर्षाला अखेर तोंड फुटले आहे. तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सभापतींसह प्रशासनाला अंधारात ठेवून भू येथील पशुवैद्यकीय इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन परस्पर केल्याचा घणाघाती आरोप पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी केला आहे.अनेक वर्षे तालुकाप्रमुख पदी असलेल्या कुवळेकर यांनी पक्षवाढीसाठी काहीच केले नाही. ते तालुकाप्रमुख नाहीत तर तालुका संघटनेला कायमचे बसणारे कुलूप असून, कुवळेकर यांना पदावरून तत्काळ दूर करावे व नवीन तालुकाप्रमुख नियुक्त व्हावा, यासाठी आपण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी पत्रकारांना सांगितले.गेल्या काही दिवसांपासून राजापूर तालुका शिवसेनेंतर्गत कमालीचा संघर्ष खदखदत असून, पक्षाच्या काही बैठकांदरम्यान जोरदार वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संघटनेंतर्गत सरळसरळ गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे.नुकताच भू येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटनावरून सेनेतील वाद चव्हाट्यावर आला. राजापूरचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांच्यासह प्रशासनालाच अंधारात ठेवून कुवळेकर यांनी दवाखान्याचे उद्घाटन परस्पर केल्याने गुरव संतापले आहेत. राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार पंचायत समितीमधील विकासकामांची भूमिपूजने किंवा उद्घाटनांचे अधिकार सभापती व प्रशासनाचे असताना तालुकाप्रमुखांनी हे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.हस्तक्षेप करू देणार नाहीनुकत्याच झालेल्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेवरून झालेल्या वादालाही तालुकाप्रमुखच कारणीभूत होते. आपल्याला प्रभारी सभापतीपद मिळू नये, यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. आपण पंचायत समितीत असेपर्यंत तालुकाप्रमुख कुवळेकर यांना पंचायत समितीच्या कामात अजिबात हस्तक्षेप करू देणार नाही, असा इशारा प्रभारी सभापती गुरव यांनी दिला आहे.तालुकाप्रमुख बदलामागील दहा वर्षे प्रकाश कुवळेकर यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी काहीच केले नाही. उलट पक्षातील गटबाजी अधिक कशी वाढेल, यासाठीच प्रयत्न केल्याचा आरोप प्रभारी सभापती गुरव यांनी केला. आता तालुकाप्रमुख बदलणे गरजेचे असून, तेथे सक्षम व्यक्तीची निवड केली जावी, यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी