शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

राजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:25 IST

rajapur, shiv sena, ratnagiri, politics मागील काही दिवस राजापूर तालुका शिवसेनेअंतर्गत खदखदत असलेल्या संघर्षाला अखेर तोंड फुटले आहे. तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सभापतींसह प्रशासनाला अंधारात ठेवून भू येथील पशुवैद्यकीय इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन परस्पर केल्याचा घणाघाती आरोप पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी केला आहे.

ठळक मुद्देराजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

राजापूर : मागील काही दिवस राजापूर तालुका शिवसेनेअंतर्गत खदखदत असलेल्या संघर्षाला अखेर तोंड फुटले आहे. तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सभापतींसह प्रशासनाला अंधारात ठेवून भू येथील पशुवैद्यकीय इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन परस्पर केल्याचा घणाघाती आरोप पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी केला आहे.अनेक वर्षे तालुकाप्रमुख पदी असलेल्या कुवळेकर यांनी पक्षवाढीसाठी काहीच केले नाही. ते तालुकाप्रमुख नाहीत तर तालुका संघटनेला कायमचे बसणारे कुलूप असून, कुवळेकर यांना पदावरून तत्काळ दूर करावे व नवीन तालुकाप्रमुख नियुक्त व्हावा, यासाठी आपण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी पत्रकारांना सांगितले.गेल्या काही दिवसांपासून राजापूर तालुका शिवसेनेंतर्गत कमालीचा संघर्ष खदखदत असून, पक्षाच्या काही बैठकांदरम्यान जोरदार वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संघटनेंतर्गत सरळसरळ गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे.नुकताच भू येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटनावरून सेनेतील वाद चव्हाट्यावर आला. राजापूरचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांच्यासह प्रशासनालाच अंधारात ठेवून कुवळेकर यांनी दवाखान्याचे उद्घाटन परस्पर केल्याने गुरव संतापले आहेत. राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार पंचायत समितीमधील विकासकामांची भूमिपूजने किंवा उद्घाटनांचे अधिकार सभापती व प्रशासनाचे असताना तालुकाप्रमुखांनी हे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.हस्तक्षेप करू देणार नाहीनुकत्याच झालेल्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेवरून झालेल्या वादालाही तालुकाप्रमुखच कारणीभूत होते. आपल्याला प्रभारी सभापतीपद मिळू नये, यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. आपण पंचायत समितीत असेपर्यंत तालुकाप्रमुख कुवळेकर यांना पंचायत समितीच्या कामात अजिबात हस्तक्षेप करू देणार नाही, असा इशारा प्रभारी सभापती गुरव यांनी दिला आहे.तालुकाप्रमुख बदलामागील दहा वर्षे प्रकाश कुवळेकर यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी काहीच केले नाही. उलट पक्षातील गटबाजी अधिक कशी वाढेल, यासाठीच प्रयत्न केल्याचा आरोप प्रभारी सभापती गुरव यांनी केला. आता तालुकाप्रमुख बदलणे गरजेचे असून, तेथे सक्षम व्यक्तीची निवड केली जावी, यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी