शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता संघर्षाने राजापुर रिफायनरी प्रकल्प अस्थिरतेत; महायुतीला जनादेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:50 IST

महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचा पुन्हा चर्चेचा प्रस्ताव

राजापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश मिळाला असला तरी सत्ता स्थापनेवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ज्या मुद्द्यांवर या दोन पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रिफायनरी प्रकल्पाचादेखील विषय असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडला आहे.

तालुक्यातील नाणार परिसरात मागील दोन वर्षांहून अधिक काळ जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. स्थानिक पातळीपासून देश पातळीवर विविध प्रकारची आंदोलने झाली होती. भाजपवगळता अनेक पक्षांनी रिफायनरीला कडाडून विरोध केल्यामुळे राजकीय संघर्षही झाला होता. यामध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यात जसा संघर्ष झाला तसाच तो केंद्र व राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजप, शिवसेनेतदेखील झाला होता.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असहाय बनलेल्या भाजपला केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी शिवसेनेशी जुळवून घेताना रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करावी लागली होती. मात्र, केंद्रात मतदारांचा जबरदस्त कौल मिळत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते.त्यामुळे रिफायनरी प्रकल्प नाणारमधून बाहेर जाणार नाही, अशी आशा प्रकल्प समर्थकांना वाटत असतानाच निवडणुकीच्या पूर्वी महाजनादेश यात्रेनिमित्त राजापुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्प समर्थकांचा उत्साह पाहता पुन्हा चर्चा करावीशी वाटते.

आपण चर्चेसाठी पुन्हा येऊ, असे सूचक विधान करुन नव्याने वादाला खमंग फोडणी दिली होती. त्याचे प्रकल्प परिसरात जोरदार पडसाद उमटले होते. केंद्र व राज्यातील सत्तेतील सहकारी पक्ष शिवसेना जोरदार आक्रमक झाली होती. कोकणचा नाश करणारा विनाशकारी प्रकल्प पुन्हा येऊ देणार नाही, अशा गर्जना सेनानेत्यांकडून करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले आहेत. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीला जनाधार दिला आहे. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजप पुढे आला असला तरी त्या पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेशी जुळवून घेणे भाजपला क्रमप्राप्त आहे.

निवडणूक निकालानंतर शिवसेना, भाजपमध्ये समान सत्तेचा वाटा यावरुन विविध मते व्यक्त होऊ लागली आहेत. अन्य काही मुद्द्यांवरदेखील दोन्ही पक्षात मतभेद आहेत. त्यामध्ये रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दाही आहे.दोन्ही पक्षांसाठी हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे भाजपला महायुतीतून पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करायची असेल तर शिवसेनेकडून रिफायनरीच्या प्रश्नावर भाजपला कोंडीत पकडले जाईल व शिवसेना आपली वाघनखे बाहेर काढून रिफायनरी प्रकल्पाला कडाडून विरोध करताना तो प्रकल्प पुन्हा येऊ नये म्हणून प्रयत्न करणार हे निश्चित आहे. आता भाजप आता प्रकल्पाबाबत कोणती भूमिका घेणार, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेना कोंडी करणार?राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने सातत्याने विरोध केला आहे. या विरोधामुळेच त्या भागातील जनता शिवसेनेच्या पाठिशी राहिल्याचे दिसून आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी रिफायनरीवरून उठलेले वादळ शिवसेना आणि भाजप यांच्यात वादाचे कारण ठरले होते. रिफायनरी समर्थनार्थ भाजपची भूमिका, तर शिवसेनेची विरोधाची भूमिका यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते.हाच मुद्दा सत्ता स्थापनेच्या वेळी पुढे येण्याची चिन्ह असून, शिवसेना या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडू शकते.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना