शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

दुरुस्तीअभावी राजापूर पंचायत समिती इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

- जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांना करावे लागतेय कामकाज लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : सत्तेच्या माध्यमातून पदे उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी ...

- जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांना करावे लागतेय कामकाज

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : सत्तेच्या माध्यमातून पदे उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या विकासापेक्षा स्वहितच कसे साधले हे राजापूर तालुका पंचायत समितीची अखेरची घटका मोजणारी इमारत पाहिल्यावर निदर्शनास येते. या इमारतीला अखेरची घरघर लागली असून, गेले कित्येक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने या पावसात या इमारतीला पूर्ण गळती लागली आहे. या गळतीमुळे या इमारतीतील शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाला तलावाचे स्वरूप आले असून, महत्त्वपूर्ण अभिलेखही पावसामुळे भिजून इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या गळक्या इमारतीमुळे इलेक्ट्रिकल साहित्यामध्ये पाणी गेल्याने शॉकसर्किट होऊन गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींचा कारभार ज्या पंचायत समितीच्या इमारतीतून चालतो त्या इमारतीची झालेली दुरवस्था पाहिल्यावर हाच काय विकास, असा प्रश्न केला जात आहे. राजापूर तालुका पंचायत समितीची इमारत गेली कित्येक वर्षे नादुरुस्त आहे. या इमारतीत पंचायत समितीच्या आस्थापना, लेखा विभागासह ग्रामपंचायत, शिक्षण आणि कृषी विभागाची कार्यालये आहेत, तर याच इमारतीच्या परिसरात ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, एकात्मिक बालविकास प्रकल्प या विभागांची कार्यालये असून, सभापती व उपसभापतींची कार्यालयेही याच आवारात आहेत.

मात्र, पंचायत समितीची मूळ इमारत गेली कित्येक वर्षे नादुरुस्त आहे. या ठिकाणी एकच इमारत बांधावी आणि सर्व कार्यालये एकाच छताखाली आणावीत असा प्रस्ताव गेली कित्येक वर्षे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रस्तावाला मुहूर्त स्वरूप आजतागायत आलेले नाही, तर पंचायत समितीच्या या नादुरुस्त इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद व शासनाकडे वारंवार निधी मागूनही तो उपलब्ध झालेला नाही. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ ते ३० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. इमारत पूर्णपणे नादुरुस्त झाली असून कधीही पडण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आणि तालुका पंचायत समितीत शिवसेनेचीच सत्ता असूनही इमारत दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नाही अशी अवस्था आहे. पंचायत समितीच्या अख्यत्यारित येणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या इमारती दुरुस्तीसाठी गतवर्षी २० लाखांचा निधी उपलब्ध झाला; पण पंचायत समितीच्या मुख्य इमारतीसाठी नाही अशी सध्या अवस्था आहे.

या मुख्य इमारतीतील शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पूर्णपणे छप्पर मोडकळीस आल्याने पावसात गळती लागली असून, तलावाचे स्वरूप आले आहे, तर शिक्षण व ग्रामपंचायत विभागातील महत्त्वपूर्ण अभिलेखही या पावसात भिजत आहे. तर लेखा विभागातही तीच अवस्था आहे. गटविकास अधिकाऱ्यांचे दालन मात्र टकाटक आहे. कारण त्यावर दोनच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मात्र पंचायत समितीच्या मुख्य इमारतीला लागलेली गळती आणि भिजणारा अभिलेख याबाबत कुणीही बोलत नाही, अशी अवस्था आहे.

-----------------------

हाच काय विकास?

तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे नियोजन ज्या इमारतीतून केले जाते, त्या इमारतीची दुरवस्था पाहिल्यावर हाच काय विकास, असा अनेकांना प्रश्न पडतो. आज ग्रामीण भागात रस्ते वाहून जात आहेत. पाखाड्या पडत आहेत, संरक्षक भिंतीही ढासळत आहेत, त्यामुळे या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.