शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीअभावी राजापूर पंचायत समिती इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

- जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांना करावे लागतेय कामकाज लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : सत्तेच्या माध्यमातून पदे उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी ...

- जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांना करावे लागतेय कामकाज

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : सत्तेच्या माध्यमातून पदे उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या विकासापेक्षा स्वहितच कसे साधले हे राजापूर तालुका पंचायत समितीची अखेरची घटका मोजणारी इमारत पाहिल्यावर निदर्शनास येते. या इमारतीला अखेरची घरघर लागली असून, गेले कित्येक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने या पावसात या इमारतीला पूर्ण गळती लागली आहे. या गळतीमुळे या इमारतीतील शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाला तलावाचे स्वरूप आले असून, महत्त्वपूर्ण अभिलेखही पावसामुळे भिजून इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या गळक्या इमारतीमुळे इलेक्ट्रिकल साहित्यामध्ये पाणी गेल्याने शॉकसर्किट होऊन गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींचा कारभार ज्या पंचायत समितीच्या इमारतीतून चालतो त्या इमारतीची झालेली दुरवस्था पाहिल्यावर हाच काय विकास, असा प्रश्न केला जात आहे. राजापूर तालुका पंचायत समितीची इमारत गेली कित्येक वर्षे नादुरुस्त आहे. या इमारतीत पंचायत समितीच्या आस्थापना, लेखा विभागासह ग्रामपंचायत, शिक्षण आणि कृषी विभागाची कार्यालये आहेत, तर याच इमारतीच्या परिसरात ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, एकात्मिक बालविकास प्रकल्प या विभागांची कार्यालये असून, सभापती व उपसभापतींची कार्यालयेही याच आवारात आहेत.

मात्र, पंचायत समितीची मूळ इमारत गेली कित्येक वर्षे नादुरुस्त आहे. या ठिकाणी एकच इमारत बांधावी आणि सर्व कार्यालये एकाच छताखाली आणावीत असा प्रस्ताव गेली कित्येक वर्षे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रस्तावाला मुहूर्त स्वरूप आजतागायत आलेले नाही, तर पंचायत समितीच्या या नादुरुस्त इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद व शासनाकडे वारंवार निधी मागूनही तो उपलब्ध झालेला नाही. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ ते ३० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. इमारत पूर्णपणे नादुरुस्त झाली असून कधीही पडण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आणि तालुका पंचायत समितीत शिवसेनेचीच सत्ता असूनही इमारत दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नाही अशी अवस्था आहे. पंचायत समितीच्या अख्यत्यारित येणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या इमारती दुरुस्तीसाठी गतवर्षी २० लाखांचा निधी उपलब्ध झाला; पण पंचायत समितीच्या मुख्य इमारतीसाठी नाही अशी सध्या अवस्था आहे.

या मुख्य इमारतीतील शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पूर्णपणे छप्पर मोडकळीस आल्याने पावसात गळती लागली असून, तलावाचे स्वरूप आले आहे, तर शिक्षण व ग्रामपंचायत विभागातील महत्त्वपूर्ण अभिलेखही या पावसात भिजत आहे. तर लेखा विभागातही तीच अवस्था आहे. गटविकास अधिकाऱ्यांचे दालन मात्र टकाटक आहे. कारण त्यावर दोनच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मात्र पंचायत समितीच्या मुख्य इमारतीला लागलेली गळती आणि भिजणारा अभिलेख याबाबत कुणीही बोलत नाही, अशी अवस्था आहे.

-----------------------

हाच काय विकास?

तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे नियोजन ज्या इमारतीतून केले जाते, त्या इमारतीची दुरवस्था पाहिल्यावर हाच काय विकास, असा अनेकांना प्रश्न पडतो. आज ग्रामीण भागात रस्ते वाहून जात आहेत. पाखाड्या पडत आहेत, संरक्षक भिंतीही ढासळत आहेत, त्यामुळे या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.