शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

राजापुरात पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:29 IST

Rain Ratnagiri Rajapru : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सोमवारी सकाळी ७.३० च्या दरम्याने एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे.

ठळक मुद्दे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा मुसळधार पावसामुळे अर्जुना, कोदवली नद्यांचे पाणी वाढले

विनोद पवारराजापूर : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सोमवारी सकाळी ७.३० च्या दरम्याने एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे.

रविवारी रात्री उशिरा जवाहर चौकामध्ये धडक देणार्‍या पुराच्या पाण्याने सोमवारी सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासाहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे. संततधारा पावसाने पूरस्थितीमध्ये वाढ होत असून, शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या पुराच्या पाण्याने व्यापार्‍यांची मात्र, त्रेधातिरपीट उडविली आहे.राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी माहिती देताना सांगितले की, पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एकजण वाहून गेला असून, त्याचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान तालुक्यातील जवळच्या सर्व गावांत कोणी बेपत्ता असल्यास तत्काळ माहिती पोलीस स्थानकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ आदी भाग पुराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तर, उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पूरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापार्‍यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. बाजारपेठेतील अनेक दुकानंमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पुराच्या पाण्याचा वेग आणि पातळी सातत्याने वाढत असल्याने सावध झालेल्या व्यापार्‍यांनी दुकानामध्ये पाणी घुसण्याच्या शक्यतेने तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी रात्रीच हलविला. त्यामुळे व्यापार्‍यांचे फारसे नुकसान झालेले नाही.

शहरानजीकच्या शीळ, गोठणेदोनिवडे, उन्हाळे, दोनिवडे, चिखलगाव, पन्हळेतर्फ राजापूर, गोवळ, शिवणे आदी गावांमधील भातशेती आणि गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या गावांमधीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरी