शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

राजापूरच्या सौंदर्यात शिवस्मारकाची भर

By admin | Updated: February 19, 2016 00:18 IST

जवाहरचौक सुशोभिकरण : शिवपुतळ्याचा इतिहासही शिवरायांसारखाच खडतर...

राजापूर : शहरातील जवाहर चौक येथे असणारे शिवस्मारक म्हणजे राजापूरवासीयांची अस्मिता! ऊन, वारा, पाऊस अन् पूर यांचा सुमारे ६ दशके सामना करत मोठ्या दिमाखात राजापूर शहराच्या मध्यभागी उभ्या असणाऱ्या शिवपुतळ्याचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी राजापुरातील शिवप्रेमींमधून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे राजापूर नगर परिषदेने यावर्षी शिवस्मारकाच्या नूतनीकरणाला प्रारंभ केला आहे.सन १९६०च्या आसपास शिवप्रेमीच्या मनातील खंत ओळखून तत्कालीन नगराध्यक्ष शांताराम विठ्ठल नार्वेकर यांनी सभागृहात हा विषय मांडला व जवाहर चौकातील टिळेकर यांच्या तुलसी वृंदावनावर शिवपुतळा बसवण्याचे निश्चित केले. शासनाकडून राजापूर नगर परिषदेला शिवस्मारकासाठी निधीची तरतूदही लगेच करण्यात आली. राजापूर नगर परिषदेच्या दप्तरी शिवस्मारक १९६२ साली उभारण्यात आल्याची नोंद असली तरी साधारणत: १९६३ - ६४ च्या काळात शिवस्मारक उभे राहिल्याचे येथील जाणकार मंडळी सांगतात. त्याकाळात शिवस्मारकाचा विषय सभागृहात आल्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात त्याच जागेत शिवपुतळा कोठे बसवायचा, यावरून मोठे राजकारणही झाल्याचे अनेक जाणकार मंडळी सांगतात. जवाहर चौकात शिवस्मारक उभारण्याचे निश्चित करताना त्याठिकाणी पूर्णाकृती शिवपुतळा बसवण्याचेही निश्चित करण्यात आले होते. साधारणत: १९६३ - ६४ च्या काळात शिवपुतळ्याचे अनावरण करण्याचे ठरले. पूर्णाकृती शिवपुतळाही राजापुरात बंद पेटीतून दाखल झाला. मात्र, शिवपुतळा अनावरणच्या अगोदर शिवपुतळा पाहिल्यानंतर शिवपुतळ्याच्या बाबतीत काही अशुभ संकेत मिळाल्याने आता काय करायचे, असा प्रश्न नगर परिषद प्रशासन व शिवप्रेमी नागरिकांना पडला होता. त्याकाळी कार्यक्रम पुढे ढकलायचा, पुन्हा तेवढा संपर्क करणे, दळणवळण व दूरध्वनीची साधने उपलब्ध नसल्यामुळे शक्य नव्हते. शिवपुतळ्याच्या विषयावरून सभागृहात आधीच राजकारण झाल्यामुळे आता शिवस्मारक उभे राहिले नाही तर शिवस्मारक पुन्हा कधीच उभे राहू शकणार नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली होती.त्याकाळात महाराष्ट्राच्या सरकारवर पकड असणारे यशवंतराव चव्हाण व तात्या भूकर यांचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळे ही अडचण त्यांनी यशवंतरावांकडे बोलून दाखवली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कारखान्यात कोठे पूर्णाकृती शिवपुतळा तयार आहे का, याची माहिती घेतली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. अखेर यशवंतरावांनी आपल्या गावी बसवण्यासाठी नेण्यात आलेला अर्धाकृती शिवपुतळा देण्याचे मान्य केले. त्यानंतर तात्यांनी स्वत: साताऱ्यात जाऊन तो शिवपुतळा राजापुरात आणला अन् ठरल्या दिवशी, ठरल्यावेळी जवाहर चौकात शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गेली अनेक दशके जवाहर चौकात शिवपुतळा मोठ्या दिमाखात उभा आहे. ऊन, वारा, पाऊस अन् दरवर्षी राजापूर शहराला बसणारा पुराचा वेढा याचा सामना करत या शिवपुतळ्याने राजापुरातील अनेक गोड कडू घटना अनुभवल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजापुरातील शिवप्रेमींमधून शिवस्मारकाचे सुशोभिकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा विचार करुन नगर परिषदेने सुशोभिकरण हाती घेतले आहे. या कामासाठी राजापुरातील शिवप्रेमी नागरिकांची समिती गठीत करण्यात आली असून, त्या समितीच्या माध्यमातून उर्वरित निधी उभा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जागतिक बाजारपेठ : शिवस्मारकाची प्रतीक्षाचशिवकालीन युगानंतर ब्रिटिशकालीन युगात राजापूर ही जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास आली. या काळात राजापुरी पंचे, राजापुरी खोबरे अन् राजापुरी हळद जगाच्या पाठीवर पोहोचली. स्वराज्य निर्मितीत इंग्रजांनी बाधा आणण्याचे काम केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी राजापूरवर स्वारी करुन इंग्रजांची वखार लुटली. त्यावेळी राजापुरात शिवाजी महाराज स्वत: आल्याच्या नोंदी इतिहासात मिळतात, तर राजापूरच्या प्रसिध्द गंगाक्षेत्रीही महाराजांनी भेट दिल्याचे इतिहास सांगतो. याच राजापूरच्या स्वारीत महाराजांना स्वराज्यासाठी बाळाजी आवजीसारखे हिरे सापडले. पण, शिवकाळानंतर इंग्रज राजवटीनंतर संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखिल राजापूरमध्ये कुठेही शिवस्मारक नव्हते.स्मारकाच्या निधीत भरशिवस्मारक समितीने कलेल्या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिवस्मारकाच्या निधीमध्ये भर पडत आहे.