शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

राजापूरच्या सौंदर्यात शिवस्मारकाची भर

By admin | Updated: February 19, 2016 00:18 IST

जवाहरचौक सुशोभिकरण : शिवपुतळ्याचा इतिहासही शिवरायांसारखाच खडतर...

राजापूर : शहरातील जवाहर चौक येथे असणारे शिवस्मारक म्हणजे राजापूरवासीयांची अस्मिता! ऊन, वारा, पाऊस अन् पूर यांचा सुमारे ६ दशके सामना करत मोठ्या दिमाखात राजापूर शहराच्या मध्यभागी उभ्या असणाऱ्या शिवपुतळ्याचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी राजापुरातील शिवप्रेमींमधून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे राजापूर नगर परिषदेने यावर्षी शिवस्मारकाच्या नूतनीकरणाला प्रारंभ केला आहे.सन १९६०च्या आसपास शिवप्रेमीच्या मनातील खंत ओळखून तत्कालीन नगराध्यक्ष शांताराम विठ्ठल नार्वेकर यांनी सभागृहात हा विषय मांडला व जवाहर चौकातील टिळेकर यांच्या तुलसी वृंदावनावर शिवपुतळा बसवण्याचे निश्चित केले. शासनाकडून राजापूर नगर परिषदेला शिवस्मारकासाठी निधीची तरतूदही लगेच करण्यात आली. राजापूर नगर परिषदेच्या दप्तरी शिवस्मारक १९६२ साली उभारण्यात आल्याची नोंद असली तरी साधारणत: १९६३ - ६४ च्या काळात शिवस्मारक उभे राहिल्याचे येथील जाणकार मंडळी सांगतात. त्याकाळात शिवस्मारकाचा विषय सभागृहात आल्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात त्याच जागेत शिवपुतळा कोठे बसवायचा, यावरून मोठे राजकारणही झाल्याचे अनेक जाणकार मंडळी सांगतात. जवाहर चौकात शिवस्मारक उभारण्याचे निश्चित करताना त्याठिकाणी पूर्णाकृती शिवपुतळा बसवण्याचेही निश्चित करण्यात आले होते. साधारणत: १९६३ - ६४ च्या काळात शिवपुतळ्याचे अनावरण करण्याचे ठरले. पूर्णाकृती शिवपुतळाही राजापुरात बंद पेटीतून दाखल झाला. मात्र, शिवपुतळा अनावरणच्या अगोदर शिवपुतळा पाहिल्यानंतर शिवपुतळ्याच्या बाबतीत काही अशुभ संकेत मिळाल्याने आता काय करायचे, असा प्रश्न नगर परिषद प्रशासन व शिवप्रेमी नागरिकांना पडला होता. त्याकाळी कार्यक्रम पुढे ढकलायचा, पुन्हा तेवढा संपर्क करणे, दळणवळण व दूरध्वनीची साधने उपलब्ध नसल्यामुळे शक्य नव्हते. शिवपुतळ्याच्या विषयावरून सभागृहात आधीच राजकारण झाल्यामुळे आता शिवस्मारक उभे राहिले नाही तर शिवस्मारक पुन्हा कधीच उभे राहू शकणार नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली होती.त्याकाळात महाराष्ट्राच्या सरकारवर पकड असणारे यशवंतराव चव्हाण व तात्या भूकर यांचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळे ही अडचण त्यांनी यशवंतरावांकडे बोलून दाखवली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कारखान्यात कोठे पूर्णाकृती शिवपुतळा तयार आहे का, याची माहिती घेतली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. अखेर यशवंतरावांनी आपल्या गावी बसवण्यासाठी नेण्यात आलेला अर्धाकृती शिवपुतळा देण्याचे मान्य केले. त्यानंतर तात्यांनी स्वत: साताऱ्यात जाऊन तो शिवपुतळा राजापुरात आणला अन् ठरल्या दिवशी, ठरल्यावेळी जवाहर चौकात शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गेली अनेक दशके जवाहर चौकात शिवपुतळा मोठ्या दिमाखात उभा आहे. ऊन, वारा, पाऊस अन् दरवर्षी राजापूर शहराला बसणारा पुराचा वेढा याचा सामना करत या शिवपुतळ्याने राजापुरातील अनेक गोड कडू घटना अनुभवल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजापुरातील शिवप्रेमींमधून शिवस्मारकाचे सुशोभिकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा विचार करुन नगर परिषदेने सुशोभिकरण हाती घेतले आहे. या कामासाठी राजापुरातील शिवप्रेमी नागरिकांची समिती गठीत करण्यात आली असून, त्या समितीच्या माध्यमातून उर्वरित निधी उभा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जागतिक बाजारपेठ : शिवस्मारकाची प्रतीक्षाचशिवकालीन युगानंतर ब्रिटिशकालीन युगात राजापूर ही जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास आली. या काळात राजापुरी पंचे, राजापुरी खोबरे अन् राजापुरी हळद जगाच्या पाठीवर पोहोचली. स्वराज्य निर्मितीत इंग्रजांनी बाधा आणण्याचे काम केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी राजापूरवर स्वारी करुन इंग्रजांची वखार लुटली. त्यावेळी राजापुरात शिवाजी महाराज स्वत: आल्याच्या नोंदी इतिहासात मिळतात, तर राजापूरच्या प्रसिध्द गंगाक्षेत्रीही महाराजांनी भेट दिल्याचे इतिहास सांगतो. याच राजापूरच्या स्वारीत महाराजांना स्वराज्यासाठी बाळाजी आवजीसारखे हिरे सापडले. पण, शिवकाळानंतर इंग्रज राजवटीनंतर संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखिल राजापूरमध्ये कुठेही शिवस्मारक नव्हते.स्मारकाच्या निधीत भरशिवस्मारक समितीने कलेल्या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिवस्मारकाच्या निधीमध्ये भर पडत आहे.