शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

राजापूरच्या सौंदर्यात शिवस्मारकाची भर

By admin | Updated: February 19, 2016 00:18 IST

जवाहरचौक सुशोभिकरण : शिवपुतळ्याचा इतिहासही शिवरायांसारखाच खडतर...

राजापूर : शहरातील जवाहर चौक येथे असणारे शिवस्मारक म्हणजे राजापूरवासीयांची अस्मिता! ऊन, वारा, पाऊस अन् पूर यांचा सुमारे ६ दशके सामना करत मोठ्या दिमाखात राजापूर शहराच्या मध्यभागी उभ्या असणाऱ्या शिवपुतळ्याचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी राजापुरातील शिवप्रेमींमधून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे राजापूर नगर परिषदेने यावर्षी शिवस्मारकाच्या नूतनीकरणाला प्रारंभ केला आहे.सन १९६०च्या आसपास शिवप्रेमीच्या मनातील खंत ओळखून तत्कालीन नगराध्यक्ष शांताराम विठ्ठल नार्वेकर यांनी सभागृहात हा विषय मांडला व जवाहर चौकातील टिळेकर यांच्या तुलसी वृंदावनावर शिवपुतळा बसवण्याचे निश्चित केले. शासनाकडून राजापूर नगर परिषदेला शिवस्मारकासाठी निधीची तरतूदही लगेच करण्यात आली. राजापूर नगर परिषदेच्या दप्तरी शिवस्मारक १९६२ साली उभारण्यात आल्याची नोंद असली तरी साधारणत: १९६३ - ६४ च्या काळात शिवस्मारक उभे राहिल्याचे येथील जाणकार मंडळी सांगतात. त्याकाळात शिवस्मारकाचा विषय सभागृहात आल्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात त्याच जागेत शिवपुतळा कोठे बसवायचा, यावरून मोठे राजकारणही झाल्याचे अनेक जाणकार मंडळी सांगतात. जवाहर चौकात शिवस्मारक उभारण्याचे निश्चित करताना त्याठिकाणी पूर्णाकृती शिवपुतळा बसवण्याचेही निश्चित करण्यात आले होते. साधारणत: १९६३ - ६४ च्या काळात शिवपुतळ्याचे अनावरण करण्याचे ठरले. पूर्णाकृती शिवपुतळाही राजापुरात बंद पेटीतून दाखल झाला. मात्र, शिवपुतळा अनावरणच्या अगोदर शिवपुतळा पाहिल्यानंतर शिवपुतळ्याच्या बाबतीत काही अशुभ संकेत मिळाल्याने आता काय करायचे, असा प्रश्न नगर परिषद प्रशासन व शिवप्रेमी नागरिकांना पडला होता. त्याकाळी कार्यक्रम पुढे ढकलायचा, पुन्हा तेवढा संपर्क करणे, दळणवळण व दूरध्वनीची साधने उपलब्ध नसल्यामुळे शक्य नव्हते. शिवपुतळ्याच्या विषयावरून सभागृहात आधीच राजकारण झाल्यामुळे आता शिवस्मारक उभे राहिले नाही तर शिवस्मारक पुन्हा कधीच उभे राहू शकणार नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली होती.त्याकाळात महाराष्ट्राच्या सरकारवर पकड असणारे यशवंतराव चव्हाण व तात्या भूकर यांचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळे ही अडचण त्यांनी यशवंतरावांकडे बोलून दाखवली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कारखान्यात कोठे पूर्णाकृती शिवपुतळा तयार आहे का, याची माहिती घेतली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. अखेर यशवंतरावांनी आपल्या गावी बसवण्यासाठी नेण्यात आलेला अर्धाकृती शिवपुतळा देण्याचे मान्य केले. त्यानंतर तात्यांनी स्वत: साताऱ्यात जाऊन तो शिवपुतळा राजापुरात आणला अन् ठरल्या दिवशी, ठरल्यावेळी जवाहर चौकात शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गेली अनेक दशके जवाहर चौकात शिवपुतळा मोठ्या दिमाखात उभा आहे. ऊन, वारा, पाऊस अन् दरवर्षी राजापूर शहराला बसणारा पुराचा वेढा याचा सामना करत या शिवपुतळ्याने राजापुरातील अनेक गोड कडू घटना अनुभवल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजापुरातील शिवप्रेमींमधून शिवस्मारकाचे सुशोभिकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा विचार करुन नगर परिषदेने सुशोभिकरण हाती घेतले आहे. या कामासाठी राजापुरातील शिवप्रेमी नागरिकांची समिती गठीत करण्यात आली असून, त्या समितीच्या माध्यमातून उर्वरित निधी उभा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जागतिक बाजारपेठ : शिवस्मारकाची प्रतीक्षाचशिवकालीन युगानंतर ब्रिटिशकालीन युगात राजापूर ही जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास आली. या काळात राजापुरी पंचे, राजापुरी खोबरे अन् राजापुरी हळद जगाच्या पाठीवर पोहोचली. स्वराज्य निर्मितीत इंग्रजांनी बाधा आणण्याचे काम केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी राजापूरवर स्वारी करुन इंग्रजांची वखार लुटली. त्यावेळी राजापुरात शिवाजी महाराज स्वत: आल्याच्या नोंदी इतिहासात मिळतात, तर राजापूरच्या प्रसिध्द गंगाक्षेत्रीही महाराजांनी भेट दिल्याचे इतिहास सांगतो. याच राजापूरच्या स्वारीत महाराजांना स्वराज्यासाठी बाळाजी आवजीसारखे हिरे सापडले. पण, शिवकाळानंतर इंग्रज राजवटीनंतर संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखिल राजापूरमध्ये कुठेही शिवस्मारक नव्हते.स्मारकाच्या निधीत भरशिवस्मारक समितीने कलेल्या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिवस्मारकाच्या निधीमध्ये भर पडत आहे.