शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

राज ठाकरेंचा चिपळूण दौरा रद्द, मुंबईतील मेळाव्यात भूमिका मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:50 IST

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय

रत्नागिरी : बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ जुलैचा चिपळूण दाैरा पुढे ढकलला आहे. मुंबईतील मेळाव्यात ते आपली भूमिका मांडतील. त्यानंतर ते राज्याचा दाैरा करतील. त्याचवेळी ते जिल्हा दाैऱ्यावर येतील, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना दिली.मनसेच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (६ जुलै) रत्नागिरीत बैठक आयाेजित केली हाेती. या बैठकीनंतर वैभव खेडेकर पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी त्यांनी तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेणार आहेत. या सगळ्याला उत्तर या मेळाव्यात देतील, असे स्पष्ट केले.महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आजवर अनेक क्रांती झाल्या त्याचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. मात्र, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय करून टाकलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे आता नकाेसे झाले आहे. त्यामुळे एक संधी राज ठाकरे यांना द्यावी, अशी भूमिका जनतेने घेतली आहे, असे खेडेकर म्हणाले.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत त्यांना विचारले असता वैभव खेडेकर म्हणाले की, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय राज ठाकरेच घेऊ शकतात. याबाबत राज ठाकरे मुंबईतील मेळाव्यात बाेलतील. तिथून ही काेंडी फुटेल असे वाटते. ज्यापद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दाेन भिन्न विचारांचे सरकार बनू शकते किंवा भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार बनू शकते, तसेच या दाेन भावांनी एकत्र येण्याबाबतचा सूर उमटत आहे. राजकारणात काेणत्याही शक्यता नाकारता येत नाही, असेही खेडेकर म्हणाले.वेगळा पायंडा राज्यात पाहायला मिळतोय. पक्षाचे नेतृत्व, निष्ठा आणि चळवळ हे सगळे लयास जातील. राज्यात एक वेगळा पायंडा पडेल. या घडामाेडींवरून उच्च न्यायालय पक्षांतर्गत कायदा अधिक कडक करण्याबाबत विचार करेल, असेही खेडेकर म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaj Thackerayराज ठाकरे