शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रात्रीस खेळ चाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:55 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून, गेल्या वर्षाच्या (जून २०२०) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये जिल्ह्यात सरासरी ८०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार पडण्यास सुरूवात केली़ सकाळपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रात्रीस खेळ चालेगतवर्षीपेक्षा सरासरी पावसाचे प्रमाण अधिक

रत्नागिरी : जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून, गेल्या वर्षाच्या (जून २०२०) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये जिल्ह्यात सरासरी ८०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार पडण्यास सुरूवात केली़ सकाळपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.गेल्या ३ आठवड्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात १११९.३ मिलीमीटर नोंदला गेला. मागील वर्षी या तालुक्यात याच कालावधीत ४६४.१२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात ७२६ मिलीमीटर (४६३.३२), दापोली ५३०.६ मिलीमीटर (५६०.६९), खेड १११९.३ मिलीमीटर (४६४.१२), गुहागर ९३३.५ मिलीमीटर (६५८.७), चिपळूण ७५२.७ मिलीमीटर (५६७.०६), संगमेश्वर ८४७.८ मिलीमीटर (७२७.१), रत्नागिरी ९३१ मिलीमीटर (७१८.८), लांजा ७२५.६ मिलीमीटर (६६७.४) आणि राजापूर तालुक्यात ६५८.५ मिलीमीटर (७६९.२५) इतका पाऊस पडला आहे़जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फक्त दापोली आणि राजापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पाऊस आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ६२१.८३ मिलीमीटरच्या सरासरीने ५५९६.४४ मिलीमीटर पाऊस झाला. चालू वर्षात ८०८.०२ मिलीमीटरच्या सरासरीने ७२७२.२० मिलीमीटर अर्थात १६९५.७६ मिलीमीटर सरासरी पाऊस अधिक आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे़ सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे श्रावणसरी कोसळत असल्याचा आनंद अनुभवावा लागत आहे़ मात्र, बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे़ रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे़ गुरूवारी सकाळी पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने सखली भागात साचलेले पाणी ओसरले होते़ पाऊस थांबताच स्त्रियांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करून घेतली़ 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी