शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रात्रीस खेळ चाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:55 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून, गेल्या वर्षाच्या (जून २०२०) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये जिल्ह्यात सरासरी ८०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार पडण्यास सुरूवात केली़ सकाळपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रात्रीस खेळ चालेगतवर्षीपेक्षा सरासरी पावसाचे प्रमाण अधिक

रत्नागिरी : जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून, गेल्या वर्षाच्या (जून २०२०) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये जिल्ह्यात सरासरी ८०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार पडण्यास सुरूवात केली़ सकाळपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.गेल्या ३ आठवड्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात १११९.३ मिलीमीटर नोंदला गेला. मागील वर्षी या तालुक्यात याच कालावधीत ४६४.१२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात ७२६ मिलीमीटर (४६३.३२), दापोली ५३०.६ मिलीमीटर (५६०.६९), खेड १११९.३ मिलीमीटर (४६४.१२), गुहागर ९३३.५ मिलीमीटर (६५८.७), चिपळूण ७५२.७ मिलीमीटर (५६७.०६), संगमेश्वर ८४७.८ मिलीमीटर (७२७.१), रत्नागिरी ९३१ मिलीमीटर (७१८.८), लांजा ७२५.६ मिलीमीटर (६६७.४) आणि राजापूर तालुक्यात ६५८.५ मिलीमीटर (७६९.२५) इतका पाऊस पडला आहे़जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फक्त दापोली आणि राजापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पाऊस आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ६२१.८३ मिलीमीटरच्या सरासरीने ५५९६.४४ मिलीमीटर पाऊस झाला. चालू वर्षात ८०८.०२ मिलीमीटरच्या सरासरीने ७२७२.२० मिलीमीटर अर्थात १६९५.७६ मिलीमीटर सरासरी पाऊस अधिक आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे़ सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे श्रावणसरी कोसळत असल्याचा आनंद अनुभवावा लागत आहे़ मात्र, बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे़ रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे़ गुरूवारी सकाळी पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने सखली भागात साचलेले पाणी ओसरले होते़ पाऊस थांबताच स्त्रियांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करून घेतली़ 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी