शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:35 IST

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देराजापुरात २४ तासात १९० मिलीमीटरची नोंद अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे.मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. बुधवारीही जोर कायम होता. रात्रीही मेघगर्जना, विजांच्या लखलखाटात पाऊस सुरू होता. या २४ तासात राजापूर, लांजा, रत्नागिरी, दापोली आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. राजापुरात सर्वाधिक १९०, त्याखालोखाल लांजा १४६, रत्नागिरी १३९, दापोली १३० आणि संगमेश्वरमध्ये १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुहागर, मंडणगड, खेड, चिपळूण येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.या पावसाने मंडणगड-दापोली मार्गावरील पिसई गावाजवळ झाड पडले होते. मात्र, ते हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. या पावसाने संगमेश्वर तालुक्यात अनेक घरांचे नुकसान केले आहे. देवरूख येथील रेश्मा करंडे यांच्या घराचे अंशत: २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुचरी येथे महादेव मोरे व केशव मोरे यांच्या घराचे पूर्णत: ३,७२,०२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. बेलारी येथील आदर्श माध्यमिक विद्यामंदिरची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: ३५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. माखजन येथे शरद पोंक्षे यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. मावळुंगे येथे किरण ओगले यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या पंडयेवाडी येथील रस्त्यावर शीळ धरणाच्या पाईप लाईनकरिता रस्त्याच्या २ मोऱ्या काढल्याने भगवती मंदिर जवळ पाणी तुंबले होते.राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथील सदू म्हादे यांचा गोठा पडल्याने २ बैल जखमी झाले. सुहास म्हादे यांच्या गोठ्याचे अंशत: नुकसान झाले. गुरुवारीही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सकाळपासूनच सुरूवात झाली असून, या पावसाने वातावरणातील गारठा वाढू लागला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी