शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:35 IST

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देराजापुरात २४ तासात १९० मिलीमीटरची नोंद अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे.मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. बुधवारीही जोर कायम होता. रात्रीही मेघगर्जना, विजांच्या लखलखाटात पाऊस सुरू होता. या २४ तासात राजापूर, लांजा, रत्नागिरी, दापोली आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. राजापुरात सर्वाधिक १९०, त्याखालोखाल लांजा १४६, रत्नागिरी १३९, दापोली १३० आणि संगमेश्वरमध्ये १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुहागर, मंडणगड, खेड, चिपळूण येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.या पावसाने मंडणगड-दापोली मार्गावरील पिसई गावाजवळ झाड पडले होते. मात्र, ते हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. या पावसाने संगमेश्वर तालुक्यात अनेक घरांचे नुकसान केले आहे. देवरूख येथील रेश्मा करंडे यांच्या घराचे अंशत: २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुचरी येथे महादेव मोरे व केशव मोरे यांच्या घराचे पूर्णत: ३,७२,०२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. बेलारी येथील आदर्श माध्यमिक विद्यामंदिरची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: ३५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. माखजन येथे शरद पोंक्षे यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. मावळुंगे येथे किरण ओगले यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या पंडयेवाडी येथील रस्त्यावर शीळ धरणाच्या पाईप लाईनकरिता रस्त्याच्या २ मोऱ्या काढल्याने भगवती मंदिर जवळ पाणी तुंबले होते.राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथील सदू म्हादे यांचा गोठा पडल्याने २ बैल जखमी झाले. सुहास म्हादे यांच्या गोठ्याचे अंशत: नुकसान झाले. गुरुवारीही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सकाळपासूनच सुरूवात झाली असून, या पावसाने वातावरणातील गारठा वाढू लागला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी