शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:35 IST

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देराजापुरात २४ तासात १९० मिलीमीटरची नोंद अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे.मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. बुधवारीही जोर कायम होता. रात्रीही मेघगर्जना, विजांच्या लखलखाटात पाऊस सुरू होता. या २४ तासात राजापूर, लांजा, रत्नागिरी, दापोली आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. राजापुरात सर्वाधिक १९०, त्याखालोखाल लांजा १४६, रत्नागिरी १३९, दापोली १३० आणि संगमेश्वरमध्ये १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुहागर, मंडणगड, खेड, चिपळूण येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.या पावसाने मंडणगड-दापोली मार्गावरील पिसई गावाजवळ झाड पडले होते. मात्र, ते हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. या पावसाने संगमेश्वर तालुक्यात अनेक घरांचे नुकसान केले आहे. देवरूख येथील रेश्मा करंडे यांच्या घराचे अंशत: २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुचरी येथे महादेव मोरे व केशव मोरे यांच्या घराचे पूर्णत: ३,७२,०२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. बेलारी येथील आदर्श माध्यमिक विद्यामंदिरची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: ३५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. माखजन येथे शरद पोंक्षे यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. मावळुंगे येथे किरण ओगले यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या पंडयेवाडी येथील रस्त्यावर शीळ धरणाच्या पाईप लाईनकरिता रस्त्याच्या २ मोऱ्या काढल्याने भगवती मंदिर जवळ पाणी तुंबले होते.राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथील सदू म्हादे यांचा गोठा पडल्याने २ बैल जखमी झाले. सुहास म्हादे यांच्या गोठ्याचे अंशत: नुकसान झाले. गुरुवारीही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सकाळपासूनच सुरूवात झाली असून, या पावसाने वातावरणातील गारठा वाढू लागला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी