शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:57 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असली तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली नाही.

ठळक मुद्देराजापुरातील पूर ओसरला जिल्ह्यात सरासरी ८९.०७ मिलीमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असली तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली नाही.जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ८९.०७ मिलीमीटर तर एकूण ८०१.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात मंडणगड १०२.१० मिलीमीटर, दापोली ८९.२० मिलीमीटर, खेड ७०.७० मिलीमीटर, गुहागर ९४.८० मिलीमीटर, चिपळूण ७०.४० मिलीमीटर, संगमेश्वर ६७.६० मिलीमीटर, रत्नागिरी ८६.५० मिलीमीटर, लांजा १२०.७० मिलीमीटर, राजापूर ९९.६० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील मौजे गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने १९,६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे उजगाव येथील शंकर जानू गोरे यांच्या घराचे अतिवृष्टीने ८हजार रुपये व जनार्दन देवजी धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: २९,५०० रुपये नुकसान झाले आहे.गुहागर तालुक्यात मौजे वारदई गाव येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे पावसामुळे ३ लाख ५५ हजार रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर मौजे ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २७,६०० रुपये नुकसान झाले आहे.

मौजे कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा पावसामुळे बांध पडल्याने घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मौजे भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह सापडलाराजापूर तालुक्यातील अर्जुना नदीच्या पुरात सोमवारी (१२ जुलै) वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पडवे - बाणेवाडी येथे आढळला. हा मृतदेह बेपत्ता सहदेव खेमाजी सोडये (४०, रा. सोडयेवाडी, राजापूर) यांचाच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी ओळखले असल्याची माहिती नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली. या पावसाळ्यात आलेल्या पुराने राजापुरात पहिला बळी घेतला आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी