शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:57 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असली तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली नाही.

ठळक मुद्देराजापुरातील पूर ओसरला जिल्ह्यात सरासरी ८९.०७ मिलीमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असली तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली नाही.जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ८९.०७ मिलीमीटर तर एकूण ८०१.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात मंडणगड १०२.१० मिलीमीटर, दापोली ८९.२० मिलीमीटर, खेड ७०.७० मिलीमीटर, गुहागर ९४.८० मिलीमीटर, चिपळूण ७०.४० मिलीमीटर, संगमेश्वर ६७.६० मिलीमीटर, रत्नागिरी ८६.५० मिलीमीटर, लांजा १२०.७० मिलीमीटर, राजापूर ९९.६० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील मौजे गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने १९,६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे उजगाव येथील शंकर जानू गोरे यांच्या घराचे अतिवृष्टीने ८हजार रुपये व जनार्दन देवजी धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: २९,५०० रुपये नुकसान झाले आहे.गुहागर तालुक्यात मौजे वारदई गाव येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे पावसामुळे ३ लाख ५५ हजार रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर मौजे ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २७,६०० रुपये नुकसान झाले आहे.

मौजे कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा पावसामुळे बांध पडल्याने घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मौजे भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह सापडलाराजापूर तालुक्यातील अर्जुना नदीच्या पुरात सोमवारी (१२ जुलै) वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पडवे - बाणेवाडी येथे आढळला. हा मृतदेह बेपत्ता सहदेव खेमाजी सोडये (४०, रा. सोडयेवाडी, राजापूर) यांचाच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी ओळखले असल्याची माहिती नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली. या पावसाळ्यात आलेल्या पुराने राजापुरात पहिला बळी घेतला आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी