शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रत्नागिरीत पावसाची गेल्या वर्षापेक्षाही पिछेहाटच

By शोभना कांबळे | Updated: September 21, 2023 14:05 IST

पावसासाठी विघ्नहर्त्याला साकडे

रत्नागिरी : गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अजुनही पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी चार महिन्यात ओलांडली नव्हती. मात्र, यंदा गेल्या वर्षीपेक्षाही पाऊस कमी असून वार्षिक सरासरीही पूर्ण करण्याची शक्यता कमी वाटू लागली आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाची परती सुरू होते. आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेने ९८ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ८५ टक्केच पाऊस पडला आहे.यंदा पावसाचे आगमन उशिराच झाले. जून, जुलै महिन्यात पावसाने निराशाच केली. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांची सरासरी पावसाने पूर्ण केली असली तरी आॅगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचे प्रमाण कमी झाले. आॅगस्ट महिन्यात जवळपास पाऊस झालाच नाही. गेल्या वर्षी पावसाने चार महिन्यांची वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत केवळ २९९१ मिलीमीटर (८९ टक्के) इतकाच पाऊस पडला होता. गत वर्षी २१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २९२१ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली होती. तर यंदा २८७७ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे.सप्टेंबर महिना संपायला जेमतेम आठ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षीही पाऊस गेल्यावर्षी प्रमाणेच वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता कमी झाली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या` (३३६४.२२ मिलीमीटर) ८५ टक्के (२८७७ मिलीमीटर) इतकाच पाऊस पडला आहे. गणेशाचे आगमन झाल्यापासून म्हणजेच तीन दिवस पावसाने जोरदार फटकेबाजी करायला सुरूवात केली असली तरी मधूनच कडाक्याचे ऊनही पडत आहे. बुधवार आणि गुरूवारी मात्र, पावसाची बऱ्यापैकी संततधार सुरू आहे. रात्री आणि सकाळी पावसाचा जोर चांगला असतो. यामुळे गणेशभक्तांची काहीवेळा अडचण होत असली तरी अजुनही पावसाची गरज असल्याने, पाऊस पडण्यासाठी विघ्नहर्त्याकडेही साकडे घातले जात आहे.

खेडच आघाडीवरगेल्यावर्षीही याच कालावधीत जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक (३४५० मिलीटर) पाऊस पडला होता. यंदाही सर्व तालुक्यांमध्ये खेडमध्ये सर्वात जास्त ३३४५ मिलीटर पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांमध्ये अजुनही पाऊस कमीच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस