शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रत्नागिरीत पावसाची गेल्या वर्षापेक्षाही पिछेहाटच

By शोभना कांबळे | Updated: September 21, 2023 14:05 IST

पावसासाठी विघ्नहर्त्याला साकडे

रत्नागिरी : गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अजुनही पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी चार महिन्यात ओलांडली नव्हती. मात्र, यंदा गेल्या वर्षीपेक्षाही पाऊस कमी असून वार्षिक सरासरीही पूर्ण करण्याची शक्यता कमी वाटू लागली आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाची परती सुरू होते. आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेने ९८ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ८५ टक्केच पाऊस पडला आहे.यंदा पावसाचे आगमन उशिराच झाले. जून, जुलै महिन्यात पावसाने निराशाच केली. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांची सरासरी पावसाने पूर्ण केली असली तरी आॅगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचे प्रमाण कमी झाले. आॅगस्ट महिन्यात जवळपास पाऊस झालाच नाही. गेल्या वर्षी पावसाने चार महिन्यांची वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत केवळ २९९१ मिलीमीटर (८९ टक्के) इतकाच पाऊस पडला होता. गत वर्षी २१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २९२१ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली होती. तर यंदा २८७७ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे.सप्टेंबर महिना संपायला जेमतेम आठ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षीही पाऊस गेल्यावर्षी प्रमाणेच वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता कमी झाली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या` (३३६४.२२ मिलीमीटर) ८५ टक्के (२८७७ मिलीमीटर) इतकाच पाऊस पडला आहे. गणेशाचे आगमन झाल्यापासून म्हणजेच तीन दिवस पावसाने जोरदार फटकेबाजी करायला सुरूवात केली असली तरी मधूनच कडाक्याचे ऊनही पडत आहे. बुधवार आणि गुरूवारी मात्र, पावसाची बऱ्यापैकी संततधार सुरू आहे. रात्री आणि सकाळी पावसाचा जोर चांगला असतो. यामुळे गणेशभक्तांची काहीवेळा अडचण होत असली तरी अजुनही पावसाची गरज असल्याने, पाऊस पडण्यासाठी विघ्नहर्त्याकडेही साकडे घातले जात आहे.

खेडच आघाडीवरगेल्यावर्षीही याच कालावधीत जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक (३४५० मिलीटर) पाऊस पडला होता. यंदाही सर्व तालुक्यांमध्ये खेडमध्ये सर्वात जास्त ३३४५ मिलीटर पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांमध्ये अजुनही पाऊस कमीच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस