शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

रत्नागिरीत पावसाची गेल्या वर्षापेक्षाही पिछेहाटच

By शोभना कांबळे | Updated: September 21, 2023 14:05 IST

पावसासाठी विघ्नहर्त्याला साकडे

रत्नागिरी : गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अजुनही पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी चार महिन्यात ओलांडली नव्हती. मात्र, यंदा गेल्या वर्षीपेक्षाही पाऊस कमी असून वार्षिक सरासरीही पूर्ण करण्याची शक्यता कमी वाटू लागली आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाची परती सुरू होते. आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेने ९८ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ८५ टक्केच पाऊस पडला आहे.यंदा पावसाचे आगमन उशिराच झाले. जून, जुलै महिन्यात पावसाने निराशाच केली. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांची सरासरी पावसाने पूर्ण केली असली तरी आॅगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचे प्रमाण कमी झाले. आॅगस्ट महिन्यात जवळपास पाऊस झालाच नाही. गेल्या वर्षी पावसाने चार महिन्यांची वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत केवळ २९९१ मिलीमीटर (८९ टक्के) इतकाच पाऊस पडला होता. गत वर्षी २१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २९२१ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली होती. तर यंदा २८७७ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे.सप्टेंबर महिना संपायला जेमतेम आठ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षीही पाऊस गेल्यावर्षी प्रमाणेच वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता कमी झाली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या` (३३६४.२२ मिलीमीटर) ८५ टक्के (२८७७ मिलीमीटर) इतकाच पाऊस पडला आहे. गणेशाचे आगमन झाल्यापासून म्हणजेच तीन दिवस पावसाने जोरदार फटकेबाजी करायला सुरूवात केली असली तरी मधूनच कडाक्याचे ऊनही पडत आहे. बुधवार आणि गुरूवारी मात्र, पावसाची बऱ्यापैकी संततधार सुरू आहे. रात्री आणि सकाळी पावसाचा जोर चांगला असतो. यामुळे गणेशभक्तांची काहीवेळा अडचण होत असली तरी अजुनही पावसाची गरज असल्याने, पाऊस पडण्यासाठी विघ्नहर्त्याकडेही साकडे घातले जात आहे.

खेडच आघाडीवरगेल्यावर्षीही याच कालावधीत जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक (३४५० मिलीटर) पाऊस पडला होता. यंदाही सर्व तालुक्यांमध्ये खेडमध्ये सर्वात जास्त ३३४५ मिलीटर पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांमध्ये अजुनही पाऊस कमीच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस