शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला, आता तब्येत सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात जवळपास सर्वत्रच पावसाने विश्रांती घेतली आहे. एक दोन आठवड्यात पावसाळी वातावरण असल्याने काहीसा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यात जवळपास सर्वत्रच पावसाने विश्रांती घेतली आहे. एक दोन आठवड्यात पावसाळी वातावरण असल्याने काहीसा गारवा होता. परंतु गेल्या तीन-चार दिवसांत अचानक पाऊस थांबला असून कडाक्याच्या उन्हाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे तापसरी, पडसे, डोकेदुखी, सर्दी-खोकला हे विकार बळावू लागले आहेत.

यंदा पाऊस अधिक पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार पावसाचा प्रवास तसा होऊ लागला होता. १६ मे रोजी झालेल्या ताैक्ते वादळाच्या प्रभावाने १ जूनपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलै महिन्यातही पावसाने अतिवृष्टी धरली. त्यामुळे या महिन्यात १८१५ मिलीमीटर इतका पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा प्रमाण कमी झाले.

ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस

- रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलीमीटर पाऊस पडतो.

- जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलीमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते.

- ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, यंदा २५ ऑगस्टपर्यंत केवळ ३६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

वातावरण बदलले काळजी घ्या...

- जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यात पाऊस अधिक पडतो.

- यंदा जून आणि जुलै महिन्यातील सरासरी पावसाने ओलांडली. २० ते २४ जुलै या कालावधीत झालेल्या पावसाने अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण केली.

- ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अधिकच कमी होऊ लागले आहे.

- गेल्या चार दिवसांत तर पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. अचानक वातावरण बदलले आहे.

- आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून कोरोना काळात तापसरी, सर्दी खोकला, डोकेदुखी हेही आजार वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.