शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 19:39 IST

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीतील जुवाड भागातील एकूण १३ कुटुंबातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी, नातेवाईक यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे.तसेच दापोली तालुक्यात दुपारी दाभोळ येथील अमीरखान वजीरखान प्रभुलकर यांचे घराचे पडवी वर वाऱ्यामुळे माडाचे झाड पडून पडवीचे २८,०५० रुपयांचे नुकसान झाले आहे. आगरवायंगणी येथील शांताराम शंकर टेमकर यांचे जुन्या घराच्या कौलांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले, या घरात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली.मौजे उक्षी येथील सीताराम बाळ लिंग गुरव व दत्ताराम बाळ लिंग गुरव ह्यांच्या घराचं अतिवृष्टीमुळे घराचं चौथरा खचला असून, भिंतीना तडे गेले आहेत. कुटुंबात एकूण ५ सदस्य असून, स्थलांतर आवश्यक होते म्हणून शेजारी असलेले सुनंदा सावंत ह्यांच्या घरात राहण्याची सोय केली.मौजे पेंडखळे येथील शंकर राम चव्हाण व तुकाराम राम चव्हाण यांचे अतिवृष्टीमुळे व वादळामुळे घराचे पत्रे पूर्णतः उडून गेले आहेत. मौजे नायशी वारा पावसाने जयश्री रघुनाथ कोतवडेकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे असुर्डे - कासारवाडी येथील विलास भार्गव नरोटे यांचे घराचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झाले आहे.श्रीपत भिकु खेतले मुंढेतर्फ चिपळूण यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. तसेच पूर्व हसरेवाडी कोलकेवाडी येथील विष्णू धूधाजी कदम, गणपत रामा बंगाल यांच्या घराचा संरक्षण बांध कोसळून किरकोळ नुकसान झाले आहे.दापोली तालुक्यातील आसूद येथे छाया सूर्यवंदन मोरे यांचे घराचे पडविचे पावसाने कोसळून अंशतः नुकसान झाले आहे, कोणीही जखमी नाही. कुंभवे येथील शशिकांत बाबू झाडेकर यांचे घराचे पडवीवर शिवणचे झाड पडून नुकसान झाले. अबिदा अब्दल्ला हवा (रा. जामगे) याच्या घराच्या पडवीवर झाड पडल्याने पडवीचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी