शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 19:39 IST

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीतील जुवाड भागातील एकूण १३ कुटुंबातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी, नातेवाईक यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे.तसेच दापोली तालुक्यात दुपारी दाभोळ येथील अमीरखान वजीरखान प्रभुलकर यांचे घराचे पडवी वर वाऱ्यामुळे माडाचे झाड पडून पडवीचे २८,०५० रुपयांचे नुकसान झाले आहे. आगरवायंगणी येथील शांताराम शंकर टेमकर यांचे जुन्या घराच्या कौलांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले, या घरात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली.मौजे उक्षी येथील सीताराम बाळ लिंग गुरव व दत्ताराम बाळ लिंग गुरव ह्यांच्या घराचं अतिवृष्टीमुळे घराचं चौथरा खचला असून, भिंतीना तडे गेले आहेत. कुटुंबात एकूण ५ सदस्य असून, स्थलांतर आवश्यक होते म्हणून शेजारी असलेले सुनंदा सावंत ह्यांच्या घरात राहण्याची सोय केली.मौजे पेंडखळे येथील शंकर राम चव्हाण व तुकाराम राम चव्हाण यांचे अतिवृष्टीमुळे व वादळामुळे घराचे पत्रे पूर्णतः उडून गेले आहेत. मौजे नायशी वारा पावसाने जयश्री रघुनाथ कोतवडेकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे असुर्डे - कासारवाडी येथील विलास भार्गव नरोटे यांचे घराचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झाले आहे.श्रीपत भिकु खेतले मुंढेतर्फ चिपळूण यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. तसेच पूर्व हसरेवाडी कोलकेवाडी येथील विष्णू धूधाजी कदम, गणपत रामा बंगाल यांच्या घराचा संरक्षण बांध कोसळून किरकोळ नुकसान झाले आहे.दापोली तालुक्यातील आसूद येथे छाया सूर्यवंदन मोरे यांचे घराचे पडविचे पावसाने कोसळून अंशतः नुकसान झाले आहे, कोणीही जखमी नाही. कुंभवे येथील शशिकांत बाबू झाडेकर यांचे घराचे पडवीवर शिवणचे झाड पडून नुकसान झाले. अबिदा अब्दल्ला हवा (रा. जामगे) याच्या घराच्या पडवीवर झाड पडल्याने पडवीचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी