शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 13:02 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरू लागले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशानपुराचे पाणी ओसरू लागले

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरू लागले आहे.जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना व कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पुराचे पाणी राजापूर शहरात घुसले होते. तर चिपळूण येथील वाशिष्ठी नदीचेही पाणी वाढल्याने शहरातील काही भागात पुराचे पाणी आले होते. खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळी गाठली होती. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील गडनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन संगमेश्वर आणि माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र, पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शहरात शिरलेले पुराचे पाणी ओसरू लागले आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंडणगड तालुक्यात मौजे अडखळ येथील बंडू यशवंत हिलम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ४७ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.दापोली तालुक्यात मौजे भडवळे येथील ओंकार रामचंद्र खरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २५ हजार, चिपळूण तालुक्यातील मौजे कापसाळ येथील सुरेखा सुरेश साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुहागर तालुक्यात मौजे आरे येथील केतन नवनाथ भोसले (वय ३४) हे ११ जुलै २०२१ रोजी कातळवाडी नदीवर पोहण्यासाठी गेले असता बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच मौजे पडवे येथील वसंत गणपत राऊत यांच्या ३ म्हशी पऱ्यात पडून त्यातील १ मृत्यू व २ जखमी होऊन अंशत: १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.संगमेश्वर तालुक्यात मौजे कोळंबे येथील बंडू लिगांयत यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. मौजे पाटगाव येथील रामचंद्र सोनू पागार यांच्या विहिरीचे पावसामुळे अंशत: ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर राजापूर तालुक्यात मौजे तळवडे येथील बाबाजी गोरे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी