शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 13:02 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरू लागले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशानपुराचे पाणी ओसरू लागले

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरू लागले आहे.जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना व कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पुराचे पाणी राजापूर शहरात घुसले होते. तर चिपळूण येथील वाशिष्ठी नदीचेही पाणी वाढल्याने शहरातील काही भागात पुराचे पाणी आले होते. खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळी गाठली होती. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील गडनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन संगमेश्वर आणि माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र, पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शहरात शिरलेले पुराचे पाणी ओसरू लागले आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंडणगड तालुक्यात मौजे अडखळ येथील बंडू यशवंत हिलम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ४७ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.दापोली तालुक्यात मौजे भडवळे येथील ओंकार रामचंद्र खरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २५ हजार, चिपळूण तालुक्यातील मौजे कापसाळ येथील सुरेखा सुरेश साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुहागर तालुक्यात मौजे आरे येथील केतन नवनाथ भोसले (वय ३४) हे ११ जुलै २०२१ रोजी कातळवाडी नदीवर पोहण्यासाठी गेले असता बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच मौजे पडवे येथील वसंत गणपत राऊत यांच्या ३ म्हशी पऱ्यात पडून त्यातील १ मृत्यू व २ जखमी होऊन अंशत: १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.संगमेश्वर तालुक्यात मौजे कोळंबे येथील बंडू लिगांयत यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. मौजे पाटगाव येथील रामचंद्र सोनू पागार यांच्या विहिरीचे पावसामुळे अंशत: ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर राजापूर तालुक्यात मौजे तळवडे येथील बाबाजी गोरे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी