शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 13:02 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरू लागले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशानपुराचे पाणी ओसरू लागले

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरू लागले आहे.जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना व कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पुराचे पाणी राजापूर शहरात घुसले होते. तर चिपळूण येथील वाशिष्ठी नदीचेही पाणी वाढल्याने शहरातील काही भागात पुराचे पाणी आले होते. खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळी गाठली होती. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील गडनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन संगमेश्वर आणि माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र, पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शहरात शिरलेले पुराचे पाणी ओसरू लागले आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंडणगड तालुक्यात मौजे अडखळ येथील बंडू यशवंत हिलम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ४७ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.दापोली तालुक्यात मौजे भडवळे येथील ओंकार रामचंद्र खरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २५ हजार, चिपळूण तालुक्यातील मौजे कापसाळ येथील सुरेखा सुरेश साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुहागर तालुक्यात मौजे आरे येथील केतन नवनाथ भोसले (वय ३४) हे ११ जुलै २०२१ रोजी कातळवाडी नदीवर पोहण्यासाठी गेले असता बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच मौजे पडवे येथील वसंत गणपत राऊत यांच्या ३ म्हशी पऱ्यात पडून त्यातील १ मृत्यू व २ जखमी होऊन अंशत: १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.संगमेश्वर तालुक्यात मौजे कोळंबे येथील बंडू लिगांयत यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. मौजे पाटगाव येथील रामचंद्र सोनू पागार यांच्या विहिरीचे पावसामुळे अंशत: ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर राजापूर तालुक्यात मौजे तळवडे येथील बाबाजी गोरे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी