शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

पर्यटकांना भुरळ घालणारा रघुवीर घाट, रसाळगड पर्यटनासाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:19 IST

रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे.

खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा यांना जोडणारा व खेड तालुक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाटात दरड काेसळण्याचे प्रकार घडत आहेत. तर रसाळगड भागात रस्ता गतवर्षी खचला हाेता. त्यामुळे रघुवीर घाट व रसाळगड पर्यटकांसाठी प्रशासनाने १ जुलैपासून पुढील दोन महिन्यांसाठी बंद केला आहे.

तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे. या घाटामध्ये खेड तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी जुलै महिन्यापासून हजेरी लावतात. या घाटात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण व धुक्याची दाट चादर यासारख्या अनेक वैशिष्ट्यांनी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.मात्र, या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला असून, त्यामुळे चालत्या वाहनांवर दगड कोसळण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांचा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच काही पर्यटक हे घाटामध्ये मद्यप्राशन करतात, त्यामुळे तिथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला रसाळगड ही पावसाळी पर्यटनासाठी साहसी पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. मात्र, घेरा रसाळगड ते रसाळगड किल्ला जोडणारा रस्ता गतवर्षीच्या पावसाळ्यात खचण्याचे प्रकार घडले होते. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव याबाबतचे लेखी आदेश उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी संबंधित यंत्रणांना पाठवले आहेत.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील सुमारे वीस ते पंचवीस लहान-मोठी गावे ही भौगोलिक व रस्ता मार्गाने खेड शहर व तालुक्याशी जोडली गेली आहेत. या भागातील ग्रामस्थांना दैनंदिन अत्यावश्यक कारणांसाठी रघुवीर घाटातून प्रवास करण्यास सवलत देण्यात आली आहे. - राजश्री मोरे, उपविभागीय अधिकारी, खेड

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन