शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पर्यटकांना भुरळ घालणारा रघुवीर घाट, रसाळगड पर्यटनासाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:19 IST

रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे.

खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा यांना जोडणारा व खेड तालुक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाटात दरड काेसळण्याचे प्रकार घडत आहेत. तर रसाळगड भागात रस्ता गतवर्षी खचला हाेता. त्यामुळे रघुवीर घाट व रसाळगड पर्यटकांसाठी प्रशासनाने १ जुलैपासून पुढील दोन महिन्यांसाठी बंद केला आहे.

तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे. या घाटामध्ये खेड तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी जुलै महिन्यापासून हजेरी लावतात. या घाटात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण व धुक्याची दाट चादर यासारख्या अनेक वैशिष्ट्यांनी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.मात्र, या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला असून, त्यामुळे चालत्या वाहनांवर दगड कोसळण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांचा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच काही पर्यटक हे घाटामध्ये मद्यप्राशन करतात, त्यामुळे तिथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला रसाळगड ही पावसाळी पर्यटनासाठी साहसी पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. मात्र, घेरा रसाळगड ते रसाळगड किल्ला जोडणारा रस्ता गतवर्षीच्या पावसाळ्यात खचण्याचे प्रकार घडले होते. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव याबाबतचे लेखी आदेश उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी संबंधित यंत्रणांना पाठवले आहेत.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील सुमारे वीस ते पंचवीस लहान-मोठी गावे ही भौगोलिक व रस्ता मार्गाने खेड शहर व तालुक्याशी जोडली गेली आहेत. या भागातील ग्रामस्थांना दैनंदिन अत्यावश्यक कारणांसाठी रघुवीर घाटातून प्रवास करण्यास सवलत देण्यात आली आहे. - राजश्री मोरे, उपविभागीय अधिकारी, खेड

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन