शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: March 18, 2016 23:43 IST

उपाययोजनांची गरज : राजापूर तालुक्यातील माय-लेकीच्या मृत्यूनंतर धोका कायम

राजापूर : ओझर धरणावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकींचा पाय घसरल्याने पाण्यात पडून मुत्यू झाल्यानंतर राजापूर तालुक्यातील अनेक उघड्या धरणांचा प्रश्न पुढे आला आहे. याबाबत शासन या उघड्या धरणांबाबत कोणती उपाययोजना करणार? असा सवाल जनसामान्यांतून विचारला जात आहे.राजापूर तालुक्यात सुमारे पंधरा ते वीस धरण प्रकल्प असून, काही पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. मात्र, यापैकी एकाही प्रकल्पाला बंदिस्त करण्यात आलेले नाही. हे सर्व धरण प्रकल्प उघडेच आहेत. त्यामुळे तेथे कुणीही कधीही व केव्हाही जाते हे अनेकदा दिसुन आले आहे. अशा उघड्या धरणांमुळे सुरक्षितताच धोक्यात आली आहे.पाणीटंचाईच्या काळात जेथे अशी धरणे आहेत तेथे पाणी भरण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ पाण्यासाठी याठिकाणी येतात. अशावेळी कोणताही विचार न करता सरळ हे ग्रामस्थ धरणात उतरतात. यापूर्वी तालुक्यात धरणात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही याबाबत संबंधित विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आणखी दोघांना जीव गमवावा लागला आहे. राजापूर तालुक्यात असे एकही धरण नाही की जे पूर्ण बंदीस्त आहे. याबाबत शासनाचे नक्की धोरण काय हे देखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अशी धरणे उघडी ठेवायची का? जर ती उघडी ठेवायची असतील, तर तेथील सुरक्षिततेची हमी कोण देणार? याचे उत्तर आता जनतेला मिळणे आवश्यक आहे. या धरणांतील जॅकवेल पूर्णंत: उघड्या असून, त्या बंदिस्त करणे आवश्यक आहे. काही प्रकल्प बांधून वीस ते पंचवीस वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे तेथील लोखंडी साहित्य व पत्रे गंजून गेले आहेत. अशा धरणांवर पाटबंधारे विभागाने आपला कर्मचारीही ठेवलेला नाही. केवळ माणसेच नाहीत तर पाळीव जनावरेही अशा उघड्या धरणांवर पाणी पिण्यासाठी जातात. तालुक्यातील एकाही धरणातून कालवे काढण्यात न आल्याने ज्या प्रमाणात येथील क्षेत्र सिंंचनाखाली यायला हवे होते ते अद्याप आलेले नाही. काहीवेळा तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पण धरणात साठणारा तुडुंब पाणीसाठा एक तर तसाच शिल्लक राहतो किंंवा उन्हाळ्यात सोडून दिला जातो. राजापूर तालुक्यातील माणसे पाण्याअभावी नाहीत तर पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडत आहेत, हेच धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. ओझरच्या घटनेनंतर शासन अशी सर्व धरणे बंदिस्त करणार का? हाच खरा सवाल आहे. (प्रतिनिधी)ओझर परिसरच सुन्न : माय-लेकीवर एकाचवेळी अंत्यसंस्कारओझर धरणात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या माय-लेकीवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी माय-लेकीवर झालेल्या अंत्यसंस्काराने संपूर्ण ओझर परिसरातील ग्रामस्थांत दु:खाचे वातावरण होते. ओझर धरणात बुडून मृत्यू पावलेल्या गावातील मनिषा महादेव कोकरे व त्यांची मुलगी संगिता या आपल्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर धरणावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यापूर्वीही कोकरे कुटुंबातील माणसे त्या धरणावर पाणी भरण्यासाठी जात असत. मात्र, बुधवार हा त्यांच्यासाठी घातवार ठरला व धरणातून पाणी भरताना पाय घसरलेल्या आपल्या मुलीला वाचवताना आईला देखील आपले प्राण गमवावे लागले. बुधवारी रात्रीच दोन्ही मृतदेहांचे शवविच्ेदन करण्यात येऊन ते नातेवाईकांच्या ताब्यात दण्यात आले. गुरुवारी त्या मृतदेहांवर एकाचवेळी अंतिम संस्कार करण्यात आले. धरण प्रकल्पतालुक्यात धरण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सुमोर १५ ते २० धरण प्रकल्पांचे काम करण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. याठिकाणी अपघातांचा धोका कायम आहे.