शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: March 18, 2016 23:43 IST

उपाययोजनांची गरज : राजापूर तालुक्यातील माय-लेकीच्या मृत्यूनंतर धोका कायम

राजापूर : ओझर धरणावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकींचा पाय घसरल्याने पाण्यात पडून मुत्यू झाल्यानंतर राजापूर तालुक्यातील अनेक उघड्या धरणांचा प्रश्न पुढे आला आहे. याबाबत शासन या उघड्या धरणांबाबत कोणती उपाययोजना करणार? असा सवाल जनसामान्यांतून विचारला जात आहे.राजापूर तालुक्यात सुमारे पंधरा ते वीस धरण प्रकल्प असून, काही पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. मात्र, यापैकी एकाही प्रकल्पाला बंदिस्त करण्यात आलेले नाही. हे सर्व धरण प्रकल्प उघडेच आहेत. त्यामुळे तेथे कुणीही कधीही व केव्हाही जाते हे अनेकदा दिसुन आले आहे. अशा उघड्या धरणांमुळे सुरक्षितताच धोक्यात आली आहे.पाणीटंचाईच्या काळात जेथे अशी धरणे आहेत तेथे पाणी भरण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ पाण्यासाठी याठिकाणी येतात. अशावेळी कोणताही विचार न करता सरळ हे ग्रामस्थ धरणात उतरतात. यापूर्वी तालुक्यात धरणात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही याबाबत संबंधित विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आणखी दोघांना जीव गमवावा लागला आहे. राजापूर तालुक्यात असे एकही धरण नाही की जे पूर्ण बंदीस्त आहे. याबाबत शासनाचे नक्की धोरण काय हे देखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अशी धरणे उघडी ठेवायची का? जर ती उघडी ठेवायची असतील, तर तेथील सुरक्षिततेची हमी कोण देणार? याचे उत्तर आता जनतेला मिळणे आवश्यक आहे. या धरणांतील जॅकवेल पूर्णंत: उघड्या असून, त्या बंदिस्त करणे आवश्यक आहे. काही प्रकल्प बांधून वीस ते पंचवीस वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे तेथील लोखंडी साहित्य व पत्रे गंजून गेले आहेत. अशा धरणांवर पाटबंधारे विभागाने आपला कर्मचारीही ठेवलेला नाही. केवळ माणसेच नाहीत तर पाळीव जनावरेही अशा उघड्या धरणांवर पाणी पिण्यासाठी जातात. तालुक्यातील एकाही धरणातून कालवे काढण्यात न आल्याने ज्या प्रमाणात येथील क्षेत्र सिंंचनाखाली यायला हवे होते ते अद्याप आलेले नाही. काहीवेळा तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पण धरणात साठणारा तुडुंब पाणीसाठा एक तर तसाच शिल्लक राहतो किंंवा उन्हाळ्यात सोडून दिला जातो. राजापूर तालुक्यातील माणसे पाण्याअभावी नाहीत तर पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडत आहेत, हेच धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. ओझरच्या घटनेनंतर शासन अशी सर्व धरणे बंदिस्त करणार का? हाच खरा सवाल आहे. (प्रतिनिधी)ओझर परिसरच सुन्न : माय-लेकीवर एकाचवेळी अंत्यसंस्कारओझर धरणात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या माय-लेकीवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी माय-लेकीवर झालेल्या अंत्यसंस्काराने संपूर्ण ओझर परिसरातील ग्रामस्थांत दु:खाचे वातावरण होते. ओझर धरणात बुडून मृत्यू पावलेल्या गावातील मनिषा महादेव कोकरे व त्यांची मुलगी संगिता या आपल्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर धरणावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यापूर्वीही कोकरे कुटुंबातील माणसे त्या धरणावर पाणी भरण्यासाठी जात असत. मात्र, बुधवार हा त्यांच्यासाठी घातवार ठरला व धरणातून पाणी भरताना पाय घसरलेल्या आपल्या मुलीला वाचवताना आईला देखील आपले प्राण गमवावे लागले. बुधवारी रात्रीच दोन्ही मृतदेहांचे शवविच्ेदन करण्यात येऊन ते नातेवाईकांच्या ताब्यात दण्यात आले. गुरुवारी त्या मृतदेहांवर एकाचवेळी अंतिम संस्कार करण्यात आले. धरण प्रकल्पतालुक्यात धरण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सुमोर १५ ते २० धरण प्रकल्पांचे काम करण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. याठिकाणी अपघातांचा धोका कायम आहे.