शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: March 18, 2016 23:43 IST

उपाययोजनांची गरज : राजापूर तालुक्यातील माय-लेकीच्या मृत्यूनंतर धोका कायम

राजापूर : ओझर धरणावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकींचा पाय घसरल्याने पाण्यात पडून मुत्यू झाल्यानंतर राजापूर तालुक्यातील अनेक उघड्या धरणांचा प्रश्न पुढे आला आहे. याबाबत शासन या उघड्या धरणांबाबत कोणती उपाययोजना करणार? असा सवाल जनसामान्यांतून विचारला जात आहे.राजापूर तालुक्यात सुमारे पंधरा ते वीस धरण प्रकल्प असून, काही पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. मात्र, यापैकी एकाही प्रकल्पाला बंदिस्त करण्यात आलेले नाही. हे सर्व धरण प्रकल्प उघडेच आहेत. त्यामुळे तेथे कुणीही कधीही व केव्हाही जाते हे अनेकदा दिसुन आले आहे. अशा उघड्या धरणांमुळे सुरक्षितताच धोक्यात आली आहे.पाणीटंचाईच्या काळात जेथे अशी धरणे आहेत तेथे पाणी भरण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ पाण्यासाठी याठिकाणी येतात. अशावेळी कोणताही विचार न करता सरळ हे ग्रामस्थ धरणात उतरतात. यापूर्वी तालुक्यात धरणात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही याबाबत संबंधित विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आणखी दोघांना जीव गमवावा लागला आहे. राजापूर तालुक्यात असे एकही धरण नाही की जे पूर्ण बंदीस्त आहे. याबाबत शासनाचे नक्की धोरण काय हे देखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अशी धरणे उघडी ठेवायची का? जर ती उघडी ठेवायची असतील, तर तेथील सुरक्षिततेची हमी कोण देणार? याचे उत्तर आता जनतेला मिळणे आवश्यक आहे. या धरणांतील जॅकवेल पूर्णंत: उघड्या असून, त्या बंदिस्त करणे आवश्यक आहे. काही प्रकल्प बांधून वीस ते पंचवीस वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे तेथील लोखंडी साहित्य व पत्रे गंजून गेले आहेत. अशा धरणांवर पाटबंधारे विभागाने आपला कर्मचारीही ठेवलेला नाही. केवळ माणसेच नाहीत तर पाळीव जनावरेही अशा उघड्या धरणांवर पाणी पिण्यासाठी जातात. तालुक्यातील एकाही धरणातून कालवे काढण्यात न आल्याने ज्या प्रमाणात येथील क्षेत्र सिंंचनाखाली यायला हवे होते ते अद्याप आलेले नाही. काहीवेळा तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पण धरणात साठणारा तुडुंब पाणीसाठा एक तर तसाच शिल्लक राहतो किंंवा उन्हाळ्यात सोडून दिला जातो. राजापूर तालुक्यातील माणसे पाण्याअभावी नाहीत तर पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडत आहेत, हेच धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. ओझरच्या घटनेनंतर शासन अशी सर्व धरणे बंदिस्त करणार का? हाच खरा सवाल आहे. (प्रतिनिधी)ओझर परिसरच सुन्न : माय-लेकीवर एकाचवेळी अंत्यसंस्कारओझर धरणात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या माय-लेकीवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी माय-लेकीवर झालेल्या अंत्यसंस्काराने संपूर्ण ओझर परिसरातील ग्रामस्थांत दु:खाचे वातावरण होते. ओझर धरणात बुडून मृत्यू पावलेल्या गावातील मनिषा महादेव कोकरे व त्यांची मुलगी संगिता या आपल्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर धरणावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यापूर्वीही कोकरे कुटुंबातील माणसे त्या धरणावर पाणी भरण्यासाठी जात असत. मात्र, बुधवार हा त्यांच्यासाठी घातवार ठरला व धरणातून पाणी भरताना पाय घसरलेल्या आपल्या मुलीला वाचवताना आईला देखील आपले प्राण गमवावे लागले. बुधवारी रात्रीच दोन्ही मृतदेहांचे शवविच्ेदन करण्यात येऊन ते नातेवाईकांच्या ताब्यात दण्यात आले. गुरुवारी त्या मृतदेहांवर एकाचवेळी अंतिम संस्कार करण्यात आले. धरण प्रकल्पतालुक्यात धरण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सुमोर १५ ते २० धरण प्रकल्पांचे काम करण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. याठिकाणी अपघातांचा धोका कायम आहे.