शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे : ऊर्मिला चिखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST

दापाेली : आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनाच्या धर्तीवर स्थानिक उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत हाेणार आहे. तसेच असंघटीत ...

दापाेली : आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनाच्या धर्तीवर स्थानिक उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत हाेणार आहे. तसेच असंघटीत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्याेजक, स्वयंसहायता गट, शेतकरी, उत्पादक, कंपनी तसेच सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी कार्यरत राहणार असून, यामध्ये शेतकऱ्यांना ३५ टक्केपर्यंत अनुदान मिळेल, अशी माहिती आत्माच्या प्रकल्प उपसंचालक ऊर्मिला चिखले यांनी दिली.

शासनाच्या कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी दापाेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाला संचालक डॉ. संजय भावे, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक ऊर्मिला चिखले, तालुका कृषी अधिकारी प्रदीप थेटे, जिल्हा संसाधनचे अमर पाटील, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंदार खानाेलकर, ग्रामोदय शेतकरी उत्पादक कंपनीचे विनय महाजन उपस्थित होते.

डॉ. संजय भावे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी अन्नधन्याचे मूल्यवर्धन करावे. तसेच दापोली येथे विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत फळप्रक्रिया तसेच अन्नप्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात याचा शेतकऱ्यांनी फायदा करुन घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. मंदार खानविलकर यांनी कोकणातील दुर्लक्षित फळपीके ब त्यांचे फळप्रक्रियेतील महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सांगितले की, ग्राहकांमध्ये आरोग्याप्रती जागरुकता निर्माण झाली असून, त्यांना आरोग्यवर्धक, आकर्षक पॅकिंग केलेले पदार्थांना बाजारात मागणी आहे.

अमर पाटील यांनी सांगितले की, एक जिल्हा एक उत्पादनांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा पिकाची निवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना आंबा प्रक्रियेमध्ये काम करावयाचे आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांचे घरगुती स्वरुपात असंघटीत उद्याेग असतील तर त्यांना त्या उद्याेगाचे नुतनीकरण करणे, क्षमता वाढ करण्यासाठी या योजनेअंतगत शेतकरी अर्ज करु शकतात. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी सुभाष अबगुल यांनी केले. कृषी अधिकारी प्रदीप थेटे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्यासह आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश कोरके यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी घरगुती प्रक्रियादार, उमेद अंतर्गत स्थापन करण्यात आलेले स्वयंसहाय्यता गटांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.