शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्ये, गळीत धान्यासाठी प्रयत्न, यावर्षी बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 16:37 IST

यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकºयांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.

ठळक मुद्देलांजा तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी सरसावलारब्बी हंगामात उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न

अनिल कासारे लांजा : यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.कोकणातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील मुख्य पीक म्हणजे भात आहे. पावसाने वेळेवर व समाधानकारक साथ दिली तर शेतकरी आपल्या शेतातून भात पिकाच्या रूपाने सोनं पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. मात्र, यावर्षी उशिरापर्यंत पडलेला पाऊस व त्यानंतर झालेली अतिवृष्टी, त्यातून शिल्लक राहिलेली भातशेती ऐन कापणीच्या वेळी क्यार वादळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातुन घास हिसकावला गेला आणि शेतकरी गर्भगळीत झाला. मायबाप सरकार नुकसान भरपाई कधी देणार, याकडे कोकणातील शेतकऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांचा कोकणातील आंबा, काजू पिकाला नेहमीच फटका बसतो. या भयावह परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांला दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ, तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना त्यासाठीचे मोफत बियाणे दिले आहे. भातपिकाच्या काढणीनंतर अगदी अंग ओलितावर सुध्दा हरभरा उत्पादन घेता येते. यातून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उचललेले हे पाऊस कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनीही या उपक्रमाला भरभरून साथ दिली आहे. सुमारे ३५ गावामधील शेतकरी यात सहभागी झाले असून, जवळपास २० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, ३० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, १० हेक्टर क्षेत्रावर मोहरी लागवड करण्यात येणार आहे.

या पिकांबाबत प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण १४ क्विंटल हरभरा, ३० क्विंटल भुईमूग व २० किलो मोहरी बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लांजा तालुक्यातील ३५ गावातील शेतकऱ्यांनी या लागवडीचा फायदा घेतला आहे. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गुरूदत्त काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेताना शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, याकडे विशेष लक्ष दिले आहे.शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणेबदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील खरीप पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना यासाठी मोफत बियाणे दिले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी