शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कडधान्ये, गळीत धान्यासाठी प्रयत्न, यावर्षी बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 16:37 IST

यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकºयांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.

ठळक मुद्देलांजा तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी सरसावलारब्बी हंगामात उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न

अनिल कासारे लांजा : यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.कोकणातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील मुख्य पीक म्हणजे भात आहे. पावसाने वेळेवर व समाधानकारक साथ दिली तर शेतकरी आपल्या शेतातून भात पिकाच्या रूपाने सोनं पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. मात्र, यावर्षी उशिरापर्यंत पडलेला पाऊस व त्यानंतर झालेली अतिवृष्टी, त्यातून शिल्लक राहिलेली भातशेती ऐन कापणीच्या वेळी क्यार वादळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातुन घास हिसकावला गेला आणि शेतकरी गर्भगळीत झाला. मायबाप सरकार नुकसान भरपाई कधी देणार, याकडे कोकणातील शेतकऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांचा कोकणातील आंबा, काजू पिकाला नेहमीच फटका बसतो. या भयावह परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांला दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ, तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना त्यासाठीचे मोफत बियाणे दिले आहे. भातपिकाच्या काढणीनंतर अगदी अंग ओलितावर सुध्दा हरभरा उत्पादन घेता येते. यातून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उचललेले हे पाऊस कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनीही या उपक्रमाला भरभरून साथ दिली आहे. सुमारे ३५ गावामधील शेतकरी यात सहभागी झाले असून, जवळपास २० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, ३० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, १० हेक्टर क्षेत्रावर मोहरी लागवड करण्यात येणार आहे.

या पिकांबाबत प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण १४ क्विंटल हरभरा, ३० क्विंटल भुईमूग व २० किलो मोहरी बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लांजा तालुक्यातील ३५ गावातील शेतकऱ्यांनी या लागवडीचा फायदा घेतला आहे. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गुरूदत्त काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेताना शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, याकडे विशेष लक्ष दिले आहे.शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणेबदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील खरीप पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना यासाठी मोफत बियाणे दिले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी