शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

कडधान्ये, गळीत धान्यासाठी प्रयत्न, यावर्षी बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 16:37 IST

यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकºयांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.

ठळक मुद्देलांजा तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी सरसावलारब्बी हंगामात उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न

अनिल कासारे लांजा : यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.कोकणातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील मुख्य पीक म्हणजे भात आहे. पावसाने वेळेवर व समाधानकारक साथ दिली तर शेतकरी आपल्या शेतातून भात पिकाच्या रूपाने सोनं पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. मात्र, यावर्षी उशिरापर्यंत पडलेला पाऊस व त्यानंतर झालेली अतिवृष्टी, त्यातून शिल्लक राहिलेली भातशेती ऐन कापणीच्या वेळी क्यार वादळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातुन घास हिसकावला गेला आणि शेतकरी गर्भगळीत झाला. मायबाप सरकार नुकसान भरपाई कधी देणार, याकडे कोकणातील शेतकऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांचा कोकणातील आंबा, काजू पिकाला नेहमीच फटका बसतो. या भयावह परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांला दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ, तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना त्यासाठीचे मोफत बियाणे दिले आहे. भातपिकाच्या काढणीनंतर अगदी अंग ओलितावर सुध्दा हरभरा उत्पादन घेता येते. यातून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उचललेले हे पाऊस कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनीही या उपक्रमाला भरभरून साथ दिली आहे. सुमारे ३५ गावामधील शेतकरी यात सहभागी झाले असून, जवळपास २० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, ३० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, १० हेक्टर क्षेत्रावर मोहरी लागवड करण्यात येणार आहे.

या पिकांबाबत प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण १४ क्विंटल हरभरा, ३० क्विंटल भुईमूग व २० किलो मोहरी बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लांजा तालुक्यातील ३५ गावातील शेतकऱ्यांनी या लागवडीचा फायदा घेतला आहे. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गुरूदत्त काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेताना शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, याकडे विशेष लक्ष दिले आहे.शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणेबदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील खरीप पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना यासाठी मोफत बियाणे दिले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी