शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वैधमापन शास्त्र कार्यालयाकडून २२९ जणांवर खटले; १० लाखाचा दंड वसूल

By शोभना कांबळे | Updated: February 13, 2024 19:11 IST

रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २९२ आस्थापनांना अचानक भेटी देत केली पाहणी

रत्नागिरी : येथील उपनियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालयाने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत २९२ आस्थापनांना अचानक भेटी दिल्या. यात २२९ जणांवर खटले नोंदविण्यात आले असून, १० लाख १२ हजार ३०० रूपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. तसेच वजने व मापन तोलन उपकरणे यांची पडताळणी व मुद्रांक शुल्क १ कोटी २९ लाख ३६ हजार ८९९ इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र प्रभारी उपनियंत्रक राम राठोड यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणा कार्यरत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिताचे जिल्हास्तरीय कार्यालय येथील जिल्हाधिकारी आवारात आहे. जिल्ह्यात तालुकास्तरीय निरीक्षक, वैध मापन शास्त्र कार्यालय रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण व दापोली येथे कार्यरत आहेत. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याकरिता मालवण, कणकवली व सांवतवाडी ही तीन कार्यालय आहेत.वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून वैध मापन शास्त्र कार्यालय अंतर्गत वजने व मापे यांची पडताळणी करणे, वजने मापे यांची तपासणी करणे व वजने मापे कायद्यांतर्गत वजनात व मापात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई केली जाते. याचबरोबर पॅक बंद वस्तूवरील उद्घोषणा तपासणी, छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करणे, तसेच या कायद्यांतर्गत नोंदविलेले खटले न्यायालयात दाखल करणे अपराध्यांविरुध्द न्यायालयीन प्रकिया पार पाडून, अपराध्यांस शिक्षा होईल अशी कारवाई करणे. असे कामकाज केले जाते.रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत एकूण २९२ आस्थापनांना अचानक भेटी देण्यात आल्या. यामध्ये एकूण २२९ एवढे खटले नोंद करण्यात आले. यांपैकी १६२ खटले निकाली काढण्यात आले. भेटी देऊन कारवाई वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून नियमित, अचानकपणे व ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने आस्थापनेस भेटी देउन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द जिल्ह्यात व्यापकपणे कारवाई करण्यात येत आहे. आठवडे बाजार, दैनंदिन बाजार पेठा, भाजी मार्केट, मच्छी मार्केट व इतर बाजारपेठेंमधील दुकानांना भेटी देऊन कारवाई करण्यात येत आहे.

व्यापाऱ्यांकडून वजने व मापे यांची फसवणूक होत असल्यास, वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे तक्रार करावी. आपल्या तक्रारीवर सात दिवसांच्या आत कारवाई करुन ग्राहकांना याबाबत कळविण्यात येईल. ग्राहक तक्रारींकरिता कोकण भवन ०२२२७५७४०७४ टोल फ्री क्रमांक 1800114000/1915, ई मेल aclmratnagiri@yahoo.in/dyclmms@yahoo.in/dyclmmscomplaint@yahoo.com यावर संपर्क करावा.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी