शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

गांजाचे आसाम ‘कनेक्शन’; अमली पदार्थ विक्रीप्रकरणी रत्नागितील २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव

By अरुण आडिवरेकर | Updated: November 10, 2023 12:58 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थाची विक्री राेखण्यासाठी पाेलिसांनी कडक माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेंतर्गत २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव ...

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थाची विक्री राेखण्यासाठी पाेलिसांनी कडक माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेंतर्गत २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तडीपारीची ही कार्यवाही झाल्यानंतर जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री थांबेल, असा विश्वास जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला.जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यात गांजा विक्रीप्रकरणी आतापर्यंत पाेलिसांनी आठजणांवर कारवाई केली. या कारवाईनंतर गुहागरात १ किलाे ३९० ग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला हाेता, तर, रत्नागिरी शहरातील कर्ला परिसरात ४२ ग्रॅमचे ब्राऊन हेराॅइन जप्त करण्यात आले हाेते.

ही अमली पदार्थांची हाेणारी तस्करी आणि विक्री राेखण्यासाठी पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यात धडक माेहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात आसाम, सातारा, पंढरपूर या भागांतून गांजा हा अमली पदार्थ आणला जात आहे. तर, मुंबईसारख्या ब्राऊन हेराॅइन हा अमली पदार्थ आणून त्याची विक्री केली जात असल्याचे तपास पुढे आले आहे. हा अमली पदार्थ काेणत्या मार्गाने जिल्ह्यात येत आहे, याचा शाेध घेतला जात आहे.अमली पदार्थाची ही तस्करी व विक्री राेखण्यासाठी पाेलिसांनी काहींच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. यामध्ये २५ जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच ही कार्यवाही पूर्ण हाेईल, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

गांजाचे आसाम ‘कनेक्शन’जिल्ह्यात आसाम भागातून माेठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. तेथील काही धागेदाेरेही हाती लागले आहेत. त्यादृष्टीने आता पाेलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच गांजा विक्रीच्या मुळापर्यंत पाेहाेचून जिल्ह्यातून अमली पदार्थ हद्दपार करणार असल्याचेही पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. आसपासच्या काही जिल्ह्यांतूनही रत्नागिरीत गांजा येतो. त्याचीही बारकाईने माहिती घेतली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस