शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST

खेड : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील पथदीप आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची वीज कापण्याचा कार्यक्रम महावितरणकडून सुरू आहे. ग्रामपंचायत ...

खेड : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील पथदीप आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची वीज कापण्याचा कार्यक्रम महावितरणकडून सुरू आहे. ग्रामपंचायत भागातील पथदीपांचे वीज बिल जिल्हा परिषद अदा करते व देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतीने करायची आहे. पण, जिल्हा परिषदेमार्फत वीज बिल अदा न केल्याने काही ठिकाणी ग्रामीण भागातील वीज वितरणकडून ही कार्यवाही केली जात आहे. ही कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी खेड तालुका भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिनेश पोफळकर यांनी केली आहे.

याबाबत माहिती देताना पोफळकर म्हणाले, जिल्हा परिषद कार्यालयात थकबाकीचा कोणताही ताळमेळ मिळत नाही. चौदाव्या वित्त आयोगाचे अनुदानही काही ग्रामपंचायतींना मिळाले नाही. ही धक्कादायक व गंभीर बाब आहे. याबाबत राज्य शासनातर्फे तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर ६ ऑगस्टपासून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील दिवाबत्ती आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची वीज देयकाच्या थकबाकीसंदर्भात वीजपुरवठा खंडित करण्यात यावा, असे आदेश महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने काढले आहेत.

जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती तसेच महावितरणकडून थकबाकी वीज बिलाची ताळमेळ घेण्यासाठी व कार्यवाहीवर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून मुदतीत तपशील महावितरणला प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करावा, म्हणून सूचना करण्यात आल्या होत्या. पण महावितरण व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा समन्वय नसल्याने स्थानिक पातळीवर लाईट मीटर कट करून वीज खंडित होत असल्याचे पूर्ण जिल्ह्यातील काही ठिकाणी दिसत आहे.

पाणीपुरवठा, वीज किंवा पथदीप हे ग्रामीण भागातील शेतकरी लोकांना खूप गरजेचे आहे. गावाची व वाड्या-वस्त्यांवर अशा उपयुक्त योजना ग्रामीण भागात बंद पडत चालल्या आहेत. गणपती, दसरा, दिवाळी या सणातच नेमकी कार्यवाही केली जात असल्याने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने पथदीपांचा खंडित केलेली वीजपुरवठा तातडीने चालू करावा व वीज खंडित करण्याचा कार्यक्रम थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.