शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या शासकीय रूग्णालयात रक्ताचा तुटवडा, प्रसुति, शस्त्रक्रिया, डायलिसीससह विविध रूग्णांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 19:19 IST

रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजाराचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा लागतो.

ठळक मुद्देरक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी जीवन अमृत सेवेत (ब्लड आॅन कॉल) ही रक्तपेढी कोल्हापूर परिमंडळात प्रथम

रत्नागिरी : येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत.जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजाराचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलिसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो.

रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच स्वैच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्त संकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते.

वार्षिक २००० पिशव्या इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० पिशव्या इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करीत आहे. म्हणूनच जीवन अमृत सेवेत (ब्लड आॅन कॉल) ही रक्तपेढी कोल्हापूर परिमंडळात प्रथम क्रमांकावर आहे.सध्या या रूग्णालयात विविध साथींच्या आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुति, डायलिसीस रूग्ण, विविध शस्त्रक्रिया व इतर आजारांचे रूग्ण वाढल्याने या रक्तपेढीला अचानक रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

विविध रक्तगटांच्या १५ आणि तांबड्या पेशींच्या ३३ पिशव्याच सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डालिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. काही दुर्मीळ गटाचे रक्त उपलब्धच नसल्याने आणखीनच समस्या निर्माण झाली आहे. रक्तसंकलनासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.विविध गटांच्या रक्ताचा तुटवडा निर्माण होताच या रक्तपेढीतील तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून आवाहन करण्यास सुरूवात केली. त्यामुळे आज शुक्रवारी दिवसभरात १७ रक्तदात्यांनी या रक्तपेढीत जाऊन स्वेच्छेने रक्तदान केले. यात शहरातील गवळीवाडा येथील काही तरूण तसेच नगरसेवक प्रशांत साळुंखे यांचा समावेश होता.

या रक्तपेढीची समस्या जाणून घेऊन दात्यांनी सहकार्याचा हात पुढे करावा. व जिल्हा रूग्णालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत स्वेच्छेने रक्तदान करून रूग्णसेवेस हातभार लावावा, असे आवाहन रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे.तुटवडा असलेले रक्तगटसध्या या रक्तपेढीकडे बी पॉझिटीव्ह, बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह या गटाचा रक्तसाठा शिल्लक नाही. तसेच ए निगेटिव्ह, आणि एबी निगेटिव्ह साठीच्या तांबड्या पेशींचाही तुटवडा आहे.सोशल मीडियाचा वापरजिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत त विविध रक्तगटांचा तुटवडा जाणवू लागल्याने सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत विविध रक्तदाते तसेच संस्था पुढे आल्या आहेत. अत्यावश्यक रूग्णांना तातडीच्या रक्ताची गरज लागते हे लक्षात घेऊन १ ते ३ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. येथील प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे या रक्तपेढीत रविवार, ३ डिसेंबर रोजी रक्तदान महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल