शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सात जिल्ह्यांमध्ये एकाच अधिकाऱ्याकडे प्राथमिक व माध्यमिकचा कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:41 IST

राज्यातील शिक्षण विभागमधील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत राज्य शासनाच्या सहसचिवांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार रत्नागिरी, हिंगोली, बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर, वर्धा व गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार एकाच व्यक्तीकडे सोपविला आहे.

ठळक मुद्देसात जिल्ह्यांमध्ये एकाच अधिकाऱ्याकडे प्राथमिक व माध्यमिकचा कार्यभारशासनाचाच शिक्षण विभागाच्या कामकाजाला ब्रेक !

सागर पाटील टेंभ्ये : राज्यातील शिक्षण विभागमधील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत राज्य शासनाच्या सहसचिवांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार रत्नागिरी, हिंगोली, बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर, वर्धा व गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार एकाच व्यक्तीकडे सोपविला आहे.विशेष म्हणजे लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे उस्मानाबाद जिल्ह्याचा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा तर लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे उस्मानाबाद जिल्ह्याचा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

तसेच गडचिरोली, ठाणे, रत्नागिरी व बीड जिल्ह्यात उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे दोन्ही विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षण विभागात प्रथमच शासन आदेश काढला असल्याचे बोलले जात आहे.या आदेशामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कामकाजाला शासनानेच ब्रेक लावल्याची स्थित निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव यांनी नुकतेच अतिरिक्त कार्यभार बाबत जाहीर केलेल्या आदेशामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागातील कार्यभार अतिरिक्त बनला आहे.

जिल्ह्यातील शिक्षण विभागात केवळ एक पूर्णवेळ शिक्षणाधिकारी कार्यरत आहे, याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. यात भर म्हणून सध्या चाललेल्या कामकाजाला ब्रेक लावण्याचे काम शासन स्तरावरून केले जात आहे.सध्या संपूर्ण जिल्ह्यात केवळ एक शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व निरंतर या तिन्ही विभागांसाठी पूर्णवेळ शिक्षणाधिकारी कार्यरत असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात चार उपशिक्षणाधिकारी कार्यरत असणे आवश्यक आहे.

सध्या मात्र केवळ एक उपशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काहीअंशी फरकाने शिक्षण विभागाची अशीच दुरावस्था पाहायला मिळत आहे. दोन्ही विभागांच्या सुरळीत चाललेल्या कामाला या आदेशामुळे ब्रेक लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी