शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचा

By admin | Updated: October 16, 2014 00:06 IST

तंटामुक्त समिती : प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी

मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी -केवळ तंटे मिटविणे एवढेच तंटामुक्त समित्यांचे काम नसून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे समित्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. ग्रामीण पातळीवर अंतर्गत संघर्ष वाढत जाऊन पुढे त्याचे रूपांतर तंट्यात होते. एकूणच वातावरण गढूळ होते. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी समित्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी धडपड सुरू असलेली दिसून येत आहे.अंतर्गत वाद झालेल्या मंडळीना एकत्र आणायचे, त्यांना वादापासून परावृत्त करायचे, म्हणजेच वादाचा प्रसंग टळतो. गढूळता निवळते.परिणमी पोलीस प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होतो. अशी शासनाची धारणा आहे. त्या कृतीला अनेक तंटामुक्त समित्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहेत. त्यामुळेच तंटामुक्त समित्यांना यश मिळत आहे. विविध प्रकारच्या तंट्यांमुळे गावातील शांतता भंग होते. एकमेकांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल केले जातात. तसेच जमिनीच्या तुकड्यावरून भावभावात होणारे वाद विकोपाला जाऊन वर्षानुवर्षे ही प्रकरणे न्यायालयात पडून राहतात. त्यामुळे कुटुंबातील, पिढ्यांमधील तेढ सुटण्याऐवजी वाढत जाते. आज अनेक कुटुंबातून असे कलह सुरू आहेत. त्यामुळे संबंधित बाबींचा विचार करून शासनाने कुठल्याही मुद्द्यावर वाद होण्यापूर्वीच दोन्ही पक्षकारांना एकत्र आणून त्यांच्यातील संघर्ष मिटविण्याचे अधिकार तंटामुक्त समित्यांना दिले आहेत. तंटामुक्त समित्यांनी कुठेही वाद आढळून आला, तर वाद घालणाऱ्यांना तत्काळ भेटायचे. वाद-विवादाचे परिणाम काय? पैसा व वेळेचा कसा अपव्यय होतो? न्याय केव्हा मिळतो? याबाबत सविस्तर माहिती संबंधितांना देऊन संघर्ष दूर करण्याचे काम या समित्यांकडे आहे. वादाचे गुन्ह्यात रूपांतर होणार नाही, याची काळजी घ्यायची. झाल्यास तो मिटवायचा. जेणेकरून नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्यांचे प्रमाण रोखता येईल, अशी शासनाची धारणा आहे. ठिकठिकाणच्या तंटामुक्त समित्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत विशेष प्रयत्न केल्यामुळे हे यश मिळाले आहे. त्यामुळे तंट्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. तंटामुक्त अभियानात प्रतिबंधात्मक उपायाचे दहा प्रकार सांगण्यात आले आहेत. त्यामधील प्रत्येक घटकानुसार गावातील तंटामुक्त समित्यांनी कामकाज करायचे व वाद होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायची. प्रत्येक तंटामुक्त समितीने त्याअंतर्गत कसे काम केले, त्याचे मूल्यांकन समित्यांकडून केले जाते. त्यासाठी एकूण ८० गुण ठेवलेले असतात. तंटामुक्त अभियान राबविणारी गावे असोत वा पुरस्कारप्राप्त गावे असोत. त्यांना त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल ७० ते ७५ गुण हमखास मिळतात. मात्र, काही गावे विशेष कामगिरी करीत असल्याने पैकीच्या पैकी गुण मिळवितात. एवढे गुण मिळविण्याठी योगदानदेखील तेवढेच द्यावे लागते. त्यामध्ये खरी कसोटी असते. समित्या वादाची प्रकरणे कशी हाताळतात, त्याकामी उर्वरित सदस्य कसे सहकार्य करतात, त्यावर समितीचे यश अवलंबून असते.तंटामुक्तअभियानगावात शांततेसाठी समित्यांचे प्रयत्न आवश्यक.नव्या अधिकाराचा फायदा. संघर्ष मिटविण्यासाठी समित्यांचे अधिक प्रयत्न.ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची. समन्वयातून रचला जातोय तंटामुक्तीचा इतिहास. कौटुंबीक कलहावर उपाय हवेत. जबाबदारीची जाणीव आवश्यक.