शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीला विधानसभेची किनार

By admin | Updated: September 23, 2014 00:13 IST

अंतर्गत विरोधकांना शह : अध्यक्षपद देऊन लांजातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न

रहिम दलाल- रत्नागिरी  -विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत विरोधकांना शह आणि मतांची गोळाबेरीज यावर लक्ष केंद्रीत करूनच जिल्हा परिषद अध्यक्षपदी जगदीश राजापकर, तर सतीश शेवडे यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. मागील अडीच वर्षे शिवसेना-भाजपा युती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून दूर होती. उपाध्यक्षपद आणि सर्व विषय समित्यांवर युतीचे सभापती होते. मात्र, अध्यक्षपद युतीकडे नसल्याची खंत सर्वच शिवसेना - भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनाला टोचत होती. मात्र, रविवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत युतीने संपूर्ण जिल्हा परिषदेवर आता कब्जा केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे. राजापूर - लांजा विधानसभा मतदार संघात स्थानिक उमेदवार पाहिजे. ही मागणी निवडणुकीच्या तोंडावर वाढू लागली होती. कधी नव्हे ते पक्षांतर्गत स्पर्धक वाढू लागल्याने विद्यमान आमदार राजन साळवी यांना डोकेदुखी ठरु लागली होती. जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्ता कदम यांनीही विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती. विरोधकांना शांत करण्यासाठी जिल्हा परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक समोर आल्याने आमदार साळवी यांनी आपली ताकद दाखवण्यामध्ये कुठचीही कसर बाकी ठेवलेली नाही. त्यातच लांजा तालुक्याला जिल्हा परिषदेच्या इतिहासात एकदाही अध्यक्षपद लाभलेले नाही. चिपळूण आणि दापोली तालुक्यातील इच्छुक असताना अध्यक्षपदाची माळ माजी सभापती जगदीश राजापकर यांच्या गळ्यात पडली. याचे श्रेय आमदार साळवी यांना जात असले तरी त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. राजापकरांच्या निवडीने कदम यांना शह आणि कधी नव्हे ते लांजा तालुक्याला अध्यक्षपद मिळाल्याने येथील विकासाला आणखी चालना मिळणार असल्याने जनतेचा विश्वास त्या माध्यमातून संपादन येणार आहे.माजी आमदार बाळ माने यांचा मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पाडाव झाला. मात्र, यावेळी त्यांनी सावध भूमिका घेत कोणत्याही समाजाला दुखावून चालणार नाही, याचा विचार करुनच त्यांनी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती आणि आपले विश्वासू सहकारी सतीश शेवडे यांना उपाध्यक्ष पदावर बसवले. तसेच भाजपामध्ये अजूनही आपली ताकद किती आहे, ते पक्षांतर्गत विरोधकांना शेवडे यांच्या निवडीने माजी आमदार माने यांनी दाखवून दिले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही आपल्या पथ्यावर कशी पडेल, हे गणित समोर ठेवूनच निवड करण्यात आली.