शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 16:27 IST

SureshPrabhu dapoli Ratnagiri : कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे. या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. सरकारी विकास मर्यादित असतो. भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासही झाला पाहिजे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

ठळक मुद्देविकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा : सुरेश प्रभूकोकणचा शाश्वत विकास परिसंवादाला प्रतिसाद

दापोली : कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे. या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. सरकारी विकास मर्यादित असतो. भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासही झाला पाहिजे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित कोकणचा शाश्वत विकास या परिसंवादाचा समारोप सुरेश प्रभू यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.पहिल्या दिवशी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, गद्रे मरिन्सचे दीपक गद्रे, प्रगतिशील शेतकरी विनायक महाजन, उद्योजक जयंत देसाई, माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, डॉ. प्रकाश शिंगारे सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, अभ्यासक डॉ. दीपक आपटे, डॉ. उमेश मुंडले हे मान्यवर सहभागी झाले. पर्यटन,पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण व पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानचे मिहीर महाजन, दीपक महाजन यांनी संयोजन केले. ऋतुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. मोठा पाऊस आपल्याबरोबर कस असलेली माती वाहून नेणार नाही,याकडे लक्ष दिले पाहिजे. काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पर्यटनातून काम मिळू शकते. व्यक्ती आणि गाव एकत्र असले पाहिजे, संवादाला कृती कार्यक्रमाची जोड देऊया, असे प्रभू म्हणाले.कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ संजय सावंत म्हणाले की,नैसर्गिक संकटात कोकणी माणूस खचून गेला असला तरी कोकणचे अर्थकारण जपण्यासाठी शेती जपली पाहिजे आणि ती करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवले पाहिजे. कोकणची तुटीची शेती फायद्यात आणली पाहिजे. चाकरमानी माणसांना गावाशी जोडून ठेवले पाहिजे. शाश्वत विकास होताना त्याचा वेग पेलणारा असला पाहिजे आणि लोकसहभाग असला पाहिजे. उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करून पिके घेतली पाहिजे, असे सांगितले. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतRatnagiriरत्नागिरी