शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

रत्नागिरीत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 11:14 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. असे असतानाच आज पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.वातावरण बदलाचे  परिणाम वारंवार दिसून येत आहेत. गेल्या दशकभरात नोव्हेंबर महिन्यातील पावसाचं प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रझ येथील पर्जन्यमापकामध्ये २४.७ मिमी पावसाची नोंद नोव्हेंबर महिन्यात झाली आहेत. अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवसांसाठी 'यलो अ‌लर्ट' जारी केला आहे.

मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, त्याप्रमाणे जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पावासाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात ३ डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा इशारा आयएमडीनं दिला आहे. महाराष्ट्रात आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, धूळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस