शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तिवरे धरणफुटीग्रस्त कुटुंबीयांना वीज खंडित हाेण्याचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर तेथील बाधित कुटुंबांचे ताप्तुरते पुनर्वसन कंटेनरमध्ये करण्यात आले होते. येथे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर तेथील बाधित कुटुंबांचे ताप्तुरते पुनर्वसन कंटेनरमध्ये करण्यात आले होते. येथे वीजपुरवठ्यापोटी ६६ हजारांची रक्कम थकीत होती. ती प्रशासनाकडून भरण्याचा निर्णय जिल्ह्याच्या दिशा समितीच्या बैठकीत झाला होता. वीजबिल माफ होणार असल्याने पुनर्वसित कुटुंबांनी खासदार तसेच राजकीय पुढाऱ्यांचा सत्कारही केला. मात्र, गेल्या दोन महिन्यांत पुढाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली असून, बाधित कुटुबीयांना घरात अंधाराचा सामना करावा लागण्याचा धोका कायम आहे.

तालुक्यातील तिवरे धरणफुटीनंतर धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंदवाडी जमीनदोस्त झाली. त्यानंतर पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली. अलोरे येथे बाधित कुटुंबीयांसाठी घरांचे बांधकाम सुरू आहे. येत्या दीड-दोन महिन्यात घरांचे बांधकाम मार्गी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी बाधित कुटुंबीयांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा काही कुटुंबीयांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला. तर काही लोकांची कंटेनरमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली. या कंटेनरमध्ये महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात आला. मात्र, वीजबिल कोणी भरायचे यावरून थकीत वीजबिल वाढत गेले. थकीत बिलाची रक्कम जमा होत नसल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला होता. थकीत बिल भरण्यास बाधित कुटुंबांनी नकार दिला.

दोन महिन्यांपूर्वी खासदार विनायक राऊत तिवरे येथे गेल्यानंतर थकीत बिलाविषयी चर्चा केली. वीजबिलाचा भार बाधित कुटुंबांवर पडणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या दिशा समितीच्या बैठकीत तहसील कार्यालयाने वीजबिल भरण्याचा निर्णय झाला व तशा सूचनाही देण्यात आल्या. वीजबिलाची झळ बसणार नसल्याने बाधित कुटुंबीयांनी खासदार तसेच स्थानिक पुढारी व लोकप्रतिनिधींचे सत्कार केले. वाडीत बिल माफ होणार असल्याची दवंडी पिटवण्यात आली. या घटनेला २ महिने झाले तरी थकीत बिलाचा पत्ता नाही. ६६ हजारांचे थकीत बिल आता ७० हजारांवर पोहोचले आहे. दिशा समितीने बिल भरण्याचा निर्णय घेतला असला, तरी अद्याप बाधित कुटुंबांना थकीत बिलाची दिशा मिळालेली नाही.

पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी गेल्या मासिक सभेत आपल्या गणातील थकीत बिलाचा मुद्दा मांडला होता. त्यावर बुधवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत महावितरणचे पालशेतकर यांनी सांगितले की, तिवरे येथील पुनर्वसन वसाहतीमधील थकीत बिलाची रक्कम महावितरणकडे जमा झालेली नाही. तसेच याविषयीचा पत्रव्यवहारही आमच्याकडे कोणी केलेला नाही.

--------------------------

तिवरे धरणफुटीनंतर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. ते अजूनही सुरूच आहे. वीजबिल प्रशासन भरणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. मात्र, तहसीलदारांच्या नावे असलेले ७० हजार ६०० रूपये थकीत वीजबिल बुधवारीच महावितरणकडून ग्रामस्थांना मिळाले आहे. थकीत बिलामुळे फेब्रुवारीत भर उन्हाळ्यात आठवडाभर वीजपुरवठा खंडित झाला होता. आता भर पावसाळ्यात बाधित कुटुंबांच्या घरात पुन्हा अंधार नको, एवढीच आमची अपेक्षा आहे.

- तानाजी चव्हाण, तिवरे