शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

रत्नागिरी गॅस प्रकल्पातील वीज निर्मिती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 18:29 IST

गेली काही महिने प्रकल्पातील अधिकारी सातत्याने याबाबत केंद्रीय स्तरावर तसेच वरिष्ठ पातळीवर वीज निर्मितीत सातत्य राहून प्रकल्प सुरू राहावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अद्याप यावर कोणताही तोडगा न निघाल्याने महिन्याभरापूर्वी प्रकल्पातील स्थानिक कामगारांबरोबर नव्याने करार केलेला नाही.

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाचा रेल्वे बरोबरचा वीज पुरवठा करार ३१ मार्च राेजी संपणार असल्याने वीज निर्मिती बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प रिझर्वेशन (मेटेनन्स) मध्ये ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील वाढते भारनियमन लक्षात घेऊन तब्बल १,९३० मेगावॅट क्षमता असलेल्या कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असलेला रत्नागिरी गॅस प्रकल्प ऑक्टोबर २००५ मध्ये सुरू करण्यात आला. सुरुवातीच्या काळात बंद प्रकल्प सुरू करताना अनेक अडचणी आल्या. प्रकल्पातील तीन टप्प्यातून तब्बल एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती.

त्यानंतर २०१५ दरम्यान रिलायन्सकडून वीज निर्मितीसाठी आवश्यक गॅस पुरवठा बंद झाल्याने पहिल्यांदा वीज निर्मिती बंद ठेवून काही महिने प्रकल्प प्रिझर्वेशन स्थितीत ठेवण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये विशेष लक्ष देऊन प्रकल्पातून होणारी ५०० मेगावॅट वीज निर्मिती रेल्वेने घ्यावी, असा तोडगा काढला हाेता. याबाबतचा करार मार्च २०२२ राेजी संपत आहे.

गेली काही महिने प्रकल्पातील अधिकारी सातत्याने याबाबत केंद्रीय स्तरावर तसेच वरिष्ठ पातळीवर वीज निर्मितीत सातत्य राहून प्रकल्प सुरू राहावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अद्याप यावर कोणताही तोडगा न निघाल्याने महिन्याभरापूर्वी प्रकल्पातील स्थानिक कामगारांबरोबर नव्याने करार केलेला नाही. त्यानंतर दाभोळ पाॅवर वीज प्रकल्पापासून कार्यरत असलेल्या १९२ कामगारांपैकी सध्या कार्यरत असलेल्या १२८ कामगारांनाही ३१ मार्चपर्यंत कमी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

प्रकल्पात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील एक हजाराहून अधिक कामगार कार्यरत आहेत. प्रकल्प प्रिझर्वेशन स्थितीत गेल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात स्थानिक कामगारांना कमी करण्याची शक्यता असल्याने स्थानिक कामगारांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे.

याबाबत प्रकल्पाचे अधिकारी जॉन फिलिप्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांंनी सांगितले की, आजपर्यंत प्रकल्पाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. कोणत्याही वेळी वरिष्ठ पातळीवरून निर्णय आल्यास प्रकल्प सुरू राहील. अन्यथा रात्री १२ नंतर पुढील ठोस निर्णय होईपर्यंत १ एप्रिलपासून प्रकल्प मेंटेनन्ससाठी प्रिझर्वेशनमध्ये ठेवण्यात येईल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीज