शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता

By admin | Updated: August 1, 2014 23:21 IST

धनदांडग्यांना संरक्षण : वृक्षतोडीवर नियंत्रण आणण्याची गरज

चिपळूण : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर आलेले अस्मानी संकट हे दुर्दैवी असून, या दुर्घटनेत अनेक निष्पाप जीवांचे हकनाक बळी गेले आहेत. या घटनेची कोकणात पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. निदान आता तरी सरकारने वृक्षतोडीवर कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी सह्याद्री वाचवा अभियानाचे निमंत्रक संजीव अणेराव यांनी केली आहे.सन २००९ पासून सह्याद्री वाचवा अभियानतर्फे कोकणात जंगलतोडविरोधी आंदोलन छेडल्यानंतर सरकारने कोकणातील चारही जिल्ह्यांत वृक्षतोड बंदी जारी करण्याची घोषणा १९ मार्च २०१० मध्ये विधिमंडळात केली. २२ एप्रिल रोजी वृक्षतोड बंदीच्या अंमलबजावणीलाही विधिमंडळाने राज्यातल्या प्रधान मुख्य वनरक्षकाच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने वृक्षतोड बंदीच्या अंमलबजावणीबाबत प्रभावी उपाययोजना सुचविणारा व प्रचलीत कायद्यामध्ये आमुलाग्र बदल सुचविणारा अहवाल आॅक्टोबर २०१०मध्ये सरकारला सादर करण्यात आला. तब्बल ४ वर्षांचा कालावधी होऊनही हा अहवाल सरकारच्या महसूल व वन विभागाने जंगलमाफियांच्या दबावाला बळी पडून दडपून ठेवला आहे. या अहवालाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी अणेराव यांनी केली आहे. माळीण येथील घटनेतून शासन नेमका कोणता बोध घेते, याकडे निसर्गप्रेमींसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)विकासाच्या नावावर केली जाणारी बेलगाम बांधकामे, नैसर्गिक रचनेत केले जाणारे मानवनिर्मित बदल, वारेमाप जंगलतोड, शासकीय नियोजनाचा अभाव या कारणांमुळे ‘माळीण’सारख्या दुर्घटना घडतात. स्थानिक जनतेला पुनर्वसनाच्या नावाखाली बेदखल करायचे व विकासाच्या नावावर पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या धनदांडग्यांना मात्र संरक्षण द्यायचे, असे राजकारण्यांचे धोरण आहे.हे धोरण नैसर्गिक न्यायाच्या विरोधी आहे. सततच्या मानवी हस्तक्षेपामुळे अतिक्षीण होत असलेल्या निसर्गाचे पुनर्भरण करणे, हा यावरील उपाय होऊ शकतो.- संजीव अणेराव,निमंत्रक, सह्याद्री वाचवा अभियान