शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

सत्कार सोहळ्यात राजकीय टोलेबाजीचे पुष्पहार

By admin | Updated: February 19, 2015 23:46 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : एकमेकांना काढले चिमटे, चौकार, षटकारांची आतषबाजीं

रत्नागिरी : जिल्हा बॅँक कर्मचारी वेतनवाढ कराराच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेल्या जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी आज, गुरूवारी एकमेकांवर जोरदार टोलेबाजी केली. बोलायची संधी मिळालेल्या प्रत्येक नेत्याने एकमेकांना चिमटे काढल्याने चांगलाच कलगीतुरा रंगला. नेत्यांच्या हजरजबाबीपणामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मात्र हास्याचे फवारे उडाले.जिल्हा बॅकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात राजकीय फटकेबाजी रंगली. ऐन विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रंगलेलं हे राजकीय क्रिकेट अनेकांनी हसत हसत अनुभवलं. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. तानाजी चोरगे यांनी जोरदार आतषबाजी करत आमदार उदय सामंत, बाळ माने, यांच्यासह संयोजकांचीच विकेट काढली. सत्काराच्या निमित्ताने उभ्या केलेल्या स्वागत कमानीवर आमच्या फोटोवर भगवा झेंडा लावल्याने मोठीच पंचायत झाली, मात्र आज शिवजयंती असल्यामुळे कोणाच्या मनात शंका येऊ नये, असे सांगत कार्यक्रमावर असलेल्या शिवसेनेच्या प्रभावावर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले.आमदार उदय सामंत यांची विकेट काढताना ते म्हणाले, गेल्यावेळी तुम्ही वेगळया पक्षात होतात, त्यावेळी तुमचे सरकार होते, आता नवीन सरकार आहे, पण तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, तर पुढच्यावेळी दुसरेच सरकार असेल, पण तुम्ही त्या सरकारमध्ये असाल असे सांगत सामंत यांच्या पक्षांतरावर चिमटा काढला. सामंत यांना चिमटा काढताना माजी आमदार बाळ माने यांना राग आला असेल, असे सांगून त्यांचीही कोंडी केली. यावेळी त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याही फिरक्या घेतल्या.सुरूवातीला मनोगत व्यक्त करताना आमदार उदय सामंत यांनीही फटकेबाजी करताना जिल्हा बँकेने आमच्यासारख्या राजकीय लोकांना कर्ज दिले पाहिजे, असे सांगितले. याबाबत उदाहरण देताना ते म्हणाले, आपलीही पतपेढी असून लोकांना संस्थेने कर्ज दिले नाही, तर जाब विचारत आम्ही तुमचे मतदार आहोत, आम्हाला कर्ज दिले पाहिजे असे सांगतात. कर्ज दिल्यावर निवडणुकीवेळी आमचे कर्ज तुम्हीच फेडा नाहीतर मतदान करणार नाही, असे सांगतात, त्यामुळे आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांची सहकारी संस्था चालवताना गोची होत असल्याचे सांगितले.एकाच व्यासपीठावर उपस्थित असूनही, एकामेकांकडे न पाहणाऱ्या रत्नागिरीच्या आजी-माजी आमदारांनी भाषणात एकमेकांची नावे घेत आमचे मित्र असा उल्लेख केला. मात्र, दोघेही एकमेकांच्या भाषणावेळी मोबाईलशी चाळे करत होते. माजी आमदार बाळ माने यांनी तर आपल्या भाषणात भाजपा आणि शिवसेना सत्तेत एकत्र आल्याने आमदार सामंत आणि आपण एकत्र आलो असून, आमच्यात आता कोेणताही वाद होणार नसल्याचे सांगून षटकारच ठोकला. पण त्यांच्या या वाक्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सामंत आता आमच्यातच आहेत. त्यामुुळे आता एकत्रच काम करायचे आहे. बॅँक निवडणूक बिनविरोध होण्यात काही अडचण नाही, असाही शेरा माजी आमदार बाळ माने यांनी मारला.नेत्यांच्या या टोलेबाजीला उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटांनी दाद दिली. टाळ्यांचा कडकडाटामुळे सावरकर नाट्यगृह अक्षरश: दणाणून गेले. सुरूवातीपासून शेवटपर्यंत रंगलेल्या या मैफलितील हे राजकीय चौकार, षटकार चर्चेचा विषय ठरला आहे. हा आनंद शेकडो प्रेक्षकांनी लुटला. (प्रतिनिधी)