शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

शहराबाहेर मुरणाऱ्या पाण्याने ‘राजकीय थरार’

By admin | Updated: July 6, 2015 00:25 IST

रत्नागिरी नगरपालिका : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

रत्नागिरी : शहराबाहेर असलेल्या शिरगाव - तिवंडेवाडीतील ४१० फ्लॅटच्या इमारतींना नळजोडणी देण्यास शिवसेनेसह अन्य सदस्यांनी पालिका सभेत तीव्र विरोध दर्शवल्यानंतर ठराव स्थगित ठेवण्यात आला. मात्र, हा ठराव इतिवृत्तात मंजूर केल्याने पालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. हा ठराव ३०८ अन्वये रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या व शहराबाहेर मुरणाऱ्या या पाण्यामुळे आता पालिकेत ‘राजकीय थरार’ निर्माण झाला आहे. १८ मेच्या पालिका सभेच्या सुरूवातीलाच शिवसेनेतर्फे तिवंडेवाडी येथे नळजोडणी देण्यास विरोध असल्याचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर सभेत हा विषय चर्चेस आल्यानंतरही शिवसेनेसह अन्य नगरसेवकांनी या ठरावाला विरोध केला होता. आधी शहरातील लोकांना पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा. अनेक भागात नागरिकांचे पाण्याचे हाल होते आहेत. पाणी पुरवठा विस्कळीत आहे. जलवाहिन्या खराब झाल्या आहेत. असे असताना शहराबाहेर पाणी देण्यामागील नेमके प्रयोजन काय, असा सवालही करण्यात येत आहे. प्रत्यक्षात सभेच्या इतिवृत्तात ठराव मंजूर झाल्याचे दाखविण्यात आले. तसेच संबंधित ठिकाणी बिल्डरने जलवाहिनीही टाकली हे समजताच शिवसेनेचे नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना हा इतिवृत्तात मंजूर झालेला ठराव रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. त्यावेळी याबाबतची पूर्ण माहिती घेऊन चुकीच्या पध्दतीने ठराव झालेला असल्यास रद्द केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांना भेटलेल्या नगरसेवकांनी सांगितले. हा ठराव चुकीच्या पध्दतीने मंजूर झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात आणखीही काही नामंजूर ठराव इतिवृत्तात मंजूर तर झाले नाहीत ना, याबाबत शहरवासीयांत आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)सेना-भाजपातील दरी रुंदावली...रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे भाजपचे असून, त्यांचा सव्वा वर्षाचा अध्यक्षपदाचा कालावधी येत्या २४ जुलै २०१५ रोजी संपत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या मागणीनुसार सहा महिन्यांसाठी भाजपच्या नगराध्यक्षाला शिवसेनेने मुदतवाढ दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती तुटल्याने केवळ सहा महिन्यांसाठी नगराध्यक्षपद सव्वा वर्षानंतरही सोडण्यास मयेकर यांची तयारी नसल्याने शिवसेना आधीच संतप्त आहे. त्यामुळे भाजपची पालिकेत कोंडी करण्यासाठी शिवसेना सज्ज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.